शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील पावणेआठ लाख शिधापत्रिकाधारक विचारतायेत, तूरडाळ कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 17:39 IST

डिसेंबरपासून वाटप बंद : शासन-रेशन दुकानदारांमध्ये समन्वयाचा अभाव

सोलापूर : जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून डिसेंबरपासून तूर डाळ वाटप बंद आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांची अडचण झाली आहे. शिधापत्रिकाधारक रेशन दुकानदारांकडे तूर डाळची मागणी करतात, तर रेशनदुकानदार शासनाकडे बोट दाखवितात. तूर डाळ मागणीवरून दोघांमध्ये खटकेदेखील उडताहेत. अनेक ठिकाणी अरेरावीच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात एकूण पावणेआठ लाख शिधापत्रिकाधारक आहेत. या सर्वांना तूर डाळीची अपेक्षा आहे.

मार्च ते नोव्हेंबरदरम्यान सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ आणि तूर डाळ मोफत मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वांनाच मोफत धान्य वाटले. यातून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत होता. मागील दोन महिन्यांपासून मोफत धान्य वाटप बंद झाले. त्यामुळे तूर डाळदेखील मिळेना. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. बहुतांश नागरिकांचे रोजगार पूर्वपदावर अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे सरकारकडून आणखी काही महिने मोफत धान्य दिले गेले पाहिजे, अशी मागणी लाखो शिधापत्रिकाधारकांची आहे.

  • जिल्ह्यात एकूण शिधापत्रिकाधारक - ७,८५,७१२
  • अन्नसुरक्षा लाभार्थी (पिवळे आणि केशरी मिक्स ) - ३,५९,०२४
  • पिवळे शिधापत्रिकाधारक - ६३,१६६
  • केसरी शिधापत्रिकाधारक - ३,६३,५२२
  • पांढरे शिधापत्रिकाधारक - ४०,०००
  •  

ग्राहकांकडून तूर डाळीची मागणी होत आहे. सरकारकडून नियतन मंजूर नसल्यामुळे तूर डाळ वाटप बंद आहे. त्यामुळे ग्राहक नाराजी व्यक्त करतात. कोरोना काळात मोफत धान्य वाटप झाले. दुकानदारांनी जिवाची पर्वा न करता धान्य वाटले. ग्रामीण भागातील दुकानदारांना याचे कमिशन मिळाले नाही. त्यामुळे दुकानदार अडचणीत आहेत.

- सुनील पेंटर

अध्यक्ष- सोलापूर जिल्हा रेशन दुकानदार संघटना

काय मिळते

रेशन दुकानावर प्रति शिधापत्रिकाधारकास एक किलो तूर डाळ मिळत होती. सध्या बंद आहे, तसेच प्रति माणसी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ सध्या मिळतोय. जिल्ह्यातील १८५४ दुकानांवर धान्य वाटप होतोय.

सर्वत्र तक्रारी

सरकार तूर डाळीचे नियतन मंजूर करीत नसल्यामुळे तूर डाळ वाटप बंद आहे. त्यामुळे तूरडाळ कधी मिळणार, अशा तक्रारी दुकानदारांकडे येत आहेत. दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना काळात वाटप झालेल्या धान्याचे कमिशन शहरातील दुकानदारांना मिळाले आहे; पण ग्रामीण भागातील दुकानदारांना कमिशन मिळालेले नाही, असे का, असा सवालदेखील रेशन दुकानदार संघटनेकडून विचारला जात आहे. अधिकारी वर्गाकडून निष्पक्ष कामकाज होत नसल्याचा आरोपदेखील संघटनेकडून होत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरgram panchayatग्राम पंचायत