शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

सोलापुरातील पावणेआठ लाख शिधापत्रिकाधारक विचारतायेत, तूरडाळ कधी मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 17:39 IST

डिसेंबरपासून वाटप बंद : शासन-रेशन दुकानदारांमध्ये समन्वयाचा अभाव

सोलापूर : जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून डिसेंबरपासून तूर डाळ वाटप बंद आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांची अडचण झाली आहे. शिधापत्रिकाधारक रेशन दुकानदारांकडे तूर डाळची मागणी करतात, तर रेशनदुकानदार शासनाकडे बोट दाखवितात. तूर डाळ मागणीवरून दोघांमध्ये खटकेदेखील उडताहेत. अनेक ठिकाणी अरेरावीच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यात एकूण पावणेआठ लाख शिधापत्रिकाधारक आहेत. या सर्वांना तूर डाळीची अपेक्षा आहे.

मार्च ते नोव्हेंबरदरम्यान सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ आणि तूर डाळ मोफत मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वांनाच मोफत धान्य वाटले. यातून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत होता. मागील दोन महिन्यांपासून मोफत धान्य वाटप बंद झाले. त्यामुळे तूर डाळदेखील मिळेना. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. बहुतांश नागरिकांचे रोजगार पूर्वपदावर अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे सरकारकडून आणखी काही महिने मोफत धान्य दिले गेले पाहिजे, अशी मागणी लाखो शिधापत्रिकाधारकांची आहे.

  • जिल्ह्यात एकूण शिधापत्रिकाधारक - ७,८५,७१२
  • अन्नसुरक्षा लाभार्थी (पिवळे आणि केशरी मिक्स ) - ३,५९,०२४
  • पिवळे शिधापत्रिकाधारक - ६३,१६६
  • केसरी शिधापत्रिकाधारक - ३,६३,५२२
  • पांढरे शिधापत्रिकाधारक - ४०,०००
  •  

ग्राहकांकडून तूर डाळीची मागणी होत आहे. सरकारकडून नियतन मंजूर नसल्यामुळे तूर डाळ वाटप बंद आहे. त्यामुळे ग्राहक नाराजी व्यक्त करतात. कोरोना काळात मोफत धान्य वाटप झाले. दुकानदारांनी जिवाची पर्वा न करता धान्य वाटले. ग्रामीण भागातील दुकानदारांना याचे कमिशन मिळाले नाही. त्यामुळे दुकानदार अडचणीत आहेत.

- सुनील पेंटर

अध्यक्ष- सोलापूर जिल्हा रेशन दुकानदार संघटना

काय मिळते

रेशन दुकानावर प्रति शिधापत्रिकाधारकास एक किलो तूर डाळ मिळत होती. सध्या बंद आहे, तसेच प्रति माणसी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ सध्या मिळतोय. जिल्ह्यातील १८५४ दुकानांवर धान्य वाटप होतोय.

सर्वत्र तक्रारी

सरकार तूर डाळीचे नियतन मंजूर करीत नसल्यामुळे तूर डाळ वाटप बंद आहे. त्यामुळे तूरडाळ कधी मिळणार, अशा तक्रारी दुकानदारांकडे येत आहेत. दुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे. कोरोना काळात वाटप झालेल्या धान्याचे कमिशन शहरातील दुकानदारांना मिळाले आहे; पण ग्रामीण भागातील दुकानदारांना कमिशन मिळालेले नाही, असे का, असा सवालदेखील रेशन दुकानदार संघटनेकडून विचारला जात आहे. अधिकारी वर्गाकडून निष्पक्ष कामकाज होत नसल्याचा आरोपदेखील संघटनेकडून होत आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरgram panchayatग्राम पंचायत