शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांची दिवाळी अंधारातच

By admin | Updated: October 22, 2016 18:07 IST

दिवाळी सण तोंडावर आला असताना एकाही साखर कारखान्याने दिवाळीचा हप्ता जाहीर केला नसून शेतक-यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब बोचर, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २२ -  दिवाळी सण तोंडावर आला असताना एकाही साखर कारखान्याने दिवाळीचा हप्ता जाहीर केला नाही. जिल्हा बँक कर्ज देण्यास तयार नाही आणि पाऊस पडल्याने नवीन उसाची लागण करण्यासाठी पैशाची चणचण असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, राज्यात ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची दिवाळी यंदा अंधारातच होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
गतवर्षी पाऊस न झाल्याने उभा ऊस जळून गेला पण दिवाळीअगोदर पाऊस झाल्याने नव्याने ऊस लागवडीसाठी शेतकरी सरसावला आहे. पण हातात पैसा नसल्याने दिवाळी करायची की उसाची लागवड करायची असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा आहे. 
जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या अडचणीत असल्याने बँकेने कर्जवाटप बंद केले आहे. शेतकर्‍यांची चोहोबाजूने आर्थिक नाकाबंदी झाली असून, अशा परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांच्या मदतीला सरकार,साखर कारखाने किंवा बँका आल्या नाही तर ऊस लागवडीवर परिणाम होऊन पुढील वर्षाच्या गळितावरही त्याचा परिणाम होणार आहे. एफआरपी न देणारे साखर कारखाने हे जिल्हा बँकेचे थकबाकीदार असल्याने या कारखान्यांमुळे जिल्हा बँकही अडचणीत आली आहे. जिल्हा बॅँकेने कर्ज बंद केल्याने ग्रामीण भागातील आर्थिक नाड्या थंड झाल्या आहेत. हे आर्थिक दुष्ट चक्र पुढील वर्षाच्या गाळपावर किंवा जिल्ह्यातील साखर उद्योगावर परिणामकारक होऊ शकते. सोलापूर जिल्ह्यातील ३८ साखर कारखान्यांनी गतवर्षी एक कोटी १८ लाख मे.टन. उसाचे गाळप केले आहे. ३८ पैकी ३0 साखर कारखान्यांनी शासन नियमाप्रमाणे एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना अदा केली आहे. उर्वरित आठ साखर कारखान्यांकडे सुमारे ९२ कोटी रुपये शेतकर्‍यांची एफआरपी थकीत आहे. दिवाळीसाठी दरवर्षी साखर कारखाने एक हप्ता जाहीर करतात पण यंदा अद्याप एकाही कारखान्याने तशी घोषणा केली नाही. उसाचे बिल न मिळाल्याने संतापलेल्या पाच शेतकर्‍यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न करून असंतोषाला वाट मोकळी करून दिली होती. तसाच असंतोष जिल्ह्यातील इतर शेतकर्‍यांमध्येही खदखदत आहे. 
 
सरकारने हस्तक्षेप करावा
राज्यातील मोजक्या जिल्हा बँका सोडल्या तर सर्वच बँका अडचणीत असून सरकारने यावर मार्ग काढला पाहिजे. सरकार राष्ट्रीयीकृत बँकांची कज्रे माफ करते मग जिल्हा बँकांना मदत करण्यात वावगे काय आहे. किमान छोट्या शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्याइतपत पतपुरवठा जिल्हा बँकांना करणे गरजेचे आहे. अन्यथा साखर कारखानदारीबरोबरच सगळा डोलारा कोसळण्याचे संकट उभे आहे.
- भाई एस. एम. पाटील