शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील शेतक-यांची दिवाळी अंधारातच

By admin | Updated: October 22, 2016 18:07 IST

दिवाळी सण तोंडावर आला असताना एकाही साखर कारखान्याने दिवाळीचा हप्ता जाहीर केला नसून शेतक-यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.

बाळासाहेब बोचर, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २२ -  दिवाळी सण तोंडावर आला असताना एकाही साखर कारखान्याने दिवाळीचा हप्ता जाहीर केला नाही. जिल्हा बँक कर्ज देण्यास तयार नाही आणि पाऊस पडल्याने नवीन उसाची लागण करण्यासाठी पैशाची चणचण असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, राज्यात ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची दिवाळी यंदा अंधारातच होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
गतवर्षी पाऊस न झाल्याने उभा ऊस जळून गेला पण दिवाळीअगोदर पाऊस झाल्याने नव्याने ऊस लागवडीसाठी शेतकरी सरसावला आहे. पण हातात पैसा नसल्याने दिवाळी करायची की उसाची लागवड करायची असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा आहे. 
जिल्हा मध्यवर्ती बँक सध्या अडचणीत असल्याने बँकेने कर्जवाटप बंद केले आहे. शेतकर्‍यांची चोहोबाजूने आर्थिक नाकाबंदी झाली असून, अशा परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांच्या मदतीला सरकार,साखर कारखाने किंवा बँका आल्या नाही तर ऊस लागवडीवर परिणाम होऊन पुढील वर्षाच्या गळितावरही त्याचा परिणाम होणार आहे. एफआरपी न देणारे साखर कारखाने हे जिल्हा बँकेचे थकबाकीदार असल्याने या कारखान्यांमुळे जिल्हा बँकही अडचणीत आली आहे. जिल्हा बॅँकेने कर्ज बंद केल्याने ग्रामीण भागातील आर्थिक नाड्या थंड झाल्या आहेत. हे आर्थिक दुष्ट चक्र पुढील वर्षाच्या गाळपावर किंवा जिल्ह्यातील साखर उद्योगावर परिणामकारक होऊ शकते. सोलापूर जिल्ह्यातील ३८ साखर कारखान्यांनी गतवर्षी एक कोटी १८ लाख मे.टन. उसाचे गाळप केले आहे. ३८ पैकी ३0 साखर कारखान्यांनी शासन नियमाप्रमाणे एफआरपीची रक्कम ऊस उत्पादकांना अदा केली आहे. उर्वरित आठ साखर कारखान्यांकडे सुमारे ९२ कोटी रुपये शेतकर्‍यांची एफआरपी थकीत आहे. दिवाळीसाठी दरवर्षी साखर कारखाने एक हप्ता जाहीर करतात पण यंदा अद्याप एकाही कारखान्याने तशी घोषणा केली नाही. उसाचे बिल न मिळाल्याने संतापलेल्या पाच शेतकर्‍यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न करून असंतोषाला वाट मोकळी करून दिली होती. तसाच असंतोष जिल्ह्यातील इतर शेतकर्‍यांमध्येही खदखदत आहे. 
 
सरकारने हस्तक्षेप करावा
राज्यातील मोजक्या जिल्हा बँका सोडल्या तर सर्वच बँका अडचणीत असून सरकारने यावर मार्ग काढला पाहिजे. सरकार राष्ट्रीयीकृत बँकांची कज्रे माफ करते मग जिल्हा बँकांना मदत करण्यात वावगे काय आहे. किमान छोट्या शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्याइतपत पतपुरवठा जिल्हा बँकांना करणे गरजेचे आहे. अन्यथा साखर कारखानदारीबरोबरच सगळा डोलारा कोसळण्याचे संकट उभे आहे.
- भाई एस. एम. पाटील