शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांनी आता प्रयोगशील शेतीद्वारे विकास साधणे गरजेचे,  आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांचे मत, सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट गोपालक, कृ षीनिष्ठ, कृषीमित्र पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:00 IST

बळीराजा मोडून पडला तर देश कोलमडून पडेल, अशी भीती व्यक्त करीत प्रयोगशील शेती करुन विकास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले़ 

ठळक मुद्देजिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कै़ शंकरराव मोहिते-पाटील उत्कृष्ट गोपालक, पशुमित्र पुरस्कार, कृषीनिष्ठ शेतकरी व कृषीमित्र पुरस्कारांचे वितरण देशात तीन प्रकारचे शेतकरी आहेत़ एक कष्टाळू, दुसरा बांधावरचा आणि तिसरा केवळ सातबाºयावरचा़ आजचे पुरस्कार हे कष्टाळू शेतकºयांना मिळाले याचा आनंद आहे़ : आ़ म्हेत्रे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : जगाचा पोशिंदा हा देशाचा राजा आहे़ मात्र त्याची अवस्था वाईट आहे़ दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाचे मोठे संकट त्याच्यावर ओढावले आहे़ जगाची अर्थव्यवस्था कोलमडली, परंतु भारताची मात्र कोलमडली नाही़ कारण भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीव्यवसायाशी निगडित आहे़ बळीराजा मोडून पडला तर देश कोलमडून पडेल, अशी भीती व्यक्त करीत प्रयोगशील शेती करुन विकास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले़ जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कै़ शंकरराव मोहिते-पाटील उत्कृष्ट गोपालक, पशुमित्र पुरस्कार, कृषीनिष्ठ शेतकरी व कृषीमित्र पुरस्कारांचे वितरण  आ़ म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले़ याप्रसंगी ते बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि़प़चे उपाध्यक्ष शिवानंद पाटील होते़ व्यासपीठावर जि़पक़ृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील, अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड आदी उपस्थित होते.आ़ म्हेत्रे पुढे म्हणाले, देशात तीन प्रकारचे शेतकरी आहेत़ एक कष्टाळू, दुसरा बांधावरचा आणि तिसरा केवळ सातबाºयावरचा़ आजचे पुरस्कार हे कष्टाळू शेतकºयांना मिळाले याचा आनंद आहे़ बांधावर उभा राहून शेती करणारा देशाचा व पर्यायी आपला विकासही साधत नाही़ त्यासाठी दिवसरात्र कष्टच करावे लागतात़ शेतामध्ये काबाडकष्ट केल्यावरच शेतीचा विकास होतो़ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की,  पशुपालन व्यवसाय जरी पारंपरिक असला तरी तो शेतीला जोडव्यवसाय म्हणूनच पाहिला जातोय. शेतीबरोबर उत्पादन आणि मार्केटिंगलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे़ यानंतर जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी मनोगतातून ज्या माणसाच्या घरात गाय आणि तिचे दूध, भाजीपाला असतो त्याच्या घरी सुख नांदत असते, असे ते म्हणाले़  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ काकडे यांनी केले़---------------------- कृषीनिष्ठ पुरस्कार : निरज जाधव (अक्कलकोट), रावसाहेब भांगे (करमाळा), छाया बोराडे (माळशिरस), उत्कर्ष देशमुख (माढा), बाबासाहेब बेलदार (मंगळवेढा), नागेश घोलप (मोहोळ), विक्रांत हविनाळे (दक्षिण सोलापूर), तानाजी हाके (पंढरपूर), सूर्यकांत कोळेकर (सांगोला)़- उत्कृष्ट पशुपालक : शंकर जानराव (अक्कलकोट), किसनराव पाटील (बार्शी), पांडुरंग लोंढे (करमाळा), सतीश टोणपे (माढा), सविता पवार (मोहोळ), काशिलिंग वाघमोडे (मंगळवेढा), लक्ष्मण पाटील (सांगोला), सोमनाथ माळी (पंढरपूर), कांतुकुमार इंगळगी (दक्षिण सोलापूर), काशिनाथ गौडगुंडे (उत्तर सोलापूर), बाबासाहेब गोडसे (माळशिरस)़-  २०१६-१७ चे मानकरी :अशोक काजळे (अक्कलकोट), सदाशिव चव्हाण (बार्शी), अक्षय गायकवाड (करमाळा), नयन सुरवसे (माढा), अनिल माने (मोहोळ), भीमराव बनसोडे (मंगळवेढा), वनिता लवटे (सांगोला), नागनाथ घाडगे (पंढपरपूर), संजय देशमुख (उत्तर सोलापूर), दिलीप पवार (माळशिरस)़-  २०१८-१९ चे मानकरी : समर्थ भालके (अक्कलकोट), तुळशीदास खुने (बार्शी), प्रशांत कोपनर (करमाळा), रेणुका देशमुख (माढा), बिरा होनमाने (मोहोळ), रावसाहेब चौगुले (मंगळवेढा), मल्हारी बोरकर (सांगोला), माणिक उपासे (पंढरपूर), विलास खंडागळे (दक्षिण सोलापूर), राजाराम चव्हाण (उत्तर सोलापूर), लक्ष्मण बंडगर (माळशिरस)

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद