शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकºयांनी आता प्रयोगशील शेतीद्वारे विकास साधणे गरजेचे,  आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांचे मत, सोलापूर जिल्ह्यातील उत्कृष्ट गोपालक, कृ षीनिष्ठ, कृषीमित्र पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:00 IST

बळीराजा मोडून पडला तर देश कोलमडून पडेल, अशी भीती व्यक्त करीत प्रयोगशील शेती करुन विकास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले़ 

ठळक मुद्देजिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कै़ शंकरराव मोहिते-पाटील उत्कृष्ट गोपालक, पशुमित्र पुरस्कार, कृषीनिष्ठ शेतकरी व कृषीमित्र पुरस्कारांचे वितरण देशात तीन प्रकारचे शेतकरी आहेत़ एक कष्टाळू, दुसरा बांधावरचा आणि तिसरा केवळ सातबाºयावरचा़ आजचे पुरस्कार हे कष्टाळू शेतकºयांना मिळाले याचा आनंद आहे़ : आ़ म्हेत्रे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ५ : जगाचा पोशिंदा हा देशाचा राजा आहे़ मात्र त्याची अवस्था वाईट आहे़ दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाचे मोठे संकट त्याच्यावर ओढावले आहे़ जगाची अर्थव्यवस्था कोलमडली, परंतु भारताची मात्र कोलमडली नाही़ कारण भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीव्यवसायाशी निगडित आहे़ बळीराजा मोडून पडला तर देश कोलमडून पडेल, अशी भीती व्यक्त करीत प्रयोगशील शेती करुन विकास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले़ जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने कै़ शंकरराव मोहिते-पाटील उत्कृष्ट गोपालक, पशुमित्र पुरस्कार, कृषीनिष्ठ शेतकरी व कृषीमित्र पुरस्कारांचे वितरण  आ़ म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले़ याप्रसंगी ते बोलत होते़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि़प़चे उपाध्यक्ष शिवानंद पाटील होते़ व्यासपीठावर जि़पक़ृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील, अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे, जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड आदी उपस्थित होते.आ़ म्हेत्रे पुढे म्हणाले, देशात तीन प्रकारचे शेतकरी आहेत़ एक कष्टाळू, दुसरा बांधावरचा आणि तिसरा केवळ सातबाºयावरचा़ आजचे पुरस्कार हे कष्टाळू शेतकºयांना मिळाले याचा आनंद आहे़ बांधावर उभा राहून शेती करणारा देशाचा व पर्यायी आपला विकासही साधत नाही़ त्यासाठी दिवसरात्र कष्टच करावे लागतात़ शेतामध्ये काबाडकष्ट केल्यावरच शेतीचा विकास होतो़ यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की,  पशुपालन व्यवसाय जरी पारंपरिक असला तरी तो शेतीला जोडव्यवसाय म्हणूनच पाहिला जातोय. शेतीबरोबर उत्पादन आणि मार्केटिंगलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे़ यानंतर जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी मनोगतातून ज्या माणसाच्या घरात गाय आणि तिचे दूध, भाजीपाला असतो त्याच्या घरी सुख नांदत असते, असे ते म्हणाले़  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंगनाथ काकडे यांनी केले़---------------------- कृषीनिष्ठ पुरस्कार : निरज जाधव (अक्कलकोट), रावसाहेब भांगे (करमाळा), छाया बोराडे (माळशिरस), उत्कर्ष देशमुख (माढा), बाबासाहेब बेलदार (मंगळवेढा), नागेश घोलप (मोहोळ), विक्रांत हविनाळे (दक्षिण सोलापूर), तानाजी हाके (पंढरपूर), सूर्यकांत कोळेकर (सांगोला)़- उत्कृष्ट पशुपालक : शंकर जानराव (अक्कलकोट), किसनराव पाटील (बार्शी), पांडुरंग लोंढे (करमाळा), सतीश टोणपे (माढा), सविता पवार (मोहोळ), काशिलिंग वाघमोडे (मंगळवेढा), लक्ष्मण पाटील (सांगोला), सोमनाथ माळी (पंढरपूर), कांतुकुमार इंगळगी (दक्षिण सोलापूर), काशिनाथ गौडगुंडे (उत्तर सोलापूर), बाबासाहेब गोडसे (माळशिरस)़-  २०१६-१७ चे मानकरी :अशोक काजळे (अक्कलकोट), सदाशिव चव्हाण (बार्शी), अक्षय गायकवाड (करमाळा), नयन सुरवसे (माढा), अनिल माने (मोहोळ), भीमराव बनसोडे (मंगळवेढा), वनिता लवटे (सांगोला), नागनाथ घाडगे (पंढपरपूर), संजय देशमुख (उत्तर सोलापूर), दिलीप पवार (माळशिरस)़-  २०१८-१९ चे मानकरी : समर्थ भालके (अक्कलकोट), तुळशीदास खुने (बार्शी), प्रशांत कोपनर (करमाळा), रेणुका देशमुख (माढा), बिरा होनमाने (मोहोळ), रावसाहेब चौगुले (मंगळवेढा), मल्हारी बोरकर (सांगोला), माणिक उपासे (पंढरपूर), विलास खंडागळे (दक्षिण सोलापूर), राजाराम चव्हाण (उत्तर सोलापूर), लक्ष्मण बंडगर (माळशिरस)

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद