शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेती करावी, मकरंद अनासपुर यांचे आवाहन, कासाळ ओढ्यावर जलपूजन, लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 11:40 IST

जोपर्यंत जनशक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत गावचा विकास अशक्य आहे, असे असले तरी आजच्या काळात आपण माणुसकी विसरत चाललो आहोत. माणसाचे आयुष्य फार कमी राहिले आहे. तुम्ही आज जे काम केले ते पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल.

ठळक मुद्देनाम फाउंडेशनच्या माध्यमातून कटफळ गावची दुष्काळी परिस्थिती बदलून टाकली१५० एकर क्षेत्र आले ओलिताखालीजि. प. शाळेत डिजिटल शाळेची सुरुवात

आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि ८ : जोपर्यंत जनशक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत गावचा विकास अशक्य आहे, असे असले तरी आजच्या काळात आपण माणुसकी विसरत चाललो आहोत. माणसाचे आयुष्य फार कमी राहिले आहे. तुम्ही आज जे काम केले ते पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल. कासाळ ओढ्यात ५०४ टीसीएम जलसाठा तयार झाल्याने शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेतीचा प्रयोग करावा. यापुढे गावातील युवकांनी प्रत्येक कामात संवाद साधून जलसंधारणाची कामे करावीत. तरच हिवरे बाजार, राळेगणसिद्धीसारखा आपल्याला बदल झालेला दिसेल, असे सांगून नाम फाउंडेशन नेहमी तुमच्या बरोबर असेल, असा विश्वास नाम फाउंडेशनचे संस्थापक, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिला. कटफळ (ता. सांगोला) येथील गावची अर्थवाहिनी असलेल्या सात कि. मी. कासाळ ओढ्याचे लोकसहभाग, नाम फाउंडेशन, जनशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून पुनरुज्जीवनामुळे ओढ्यावरील पाच बंधाºयांसह ओढ्यात सुमारे ५०४ टीसीएम पाणीसाठा झाला आहे. या पाण्याचे जलपूजन व लोकार्पण सोहळा नाम फाउंडेशनचे संस्थापक, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाण्याची खणानारळांनी ओटी भरून जलपूजन करताच नाम फाउंडेशनचा विजय असो, जनशक्ती संघटनेचा विजय असो, असा नारा देण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, तहसीलदार संजय पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, उपसंचालक जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, नाम फाउंडेशनचे राजाभाऊ शेळके, सभापती मायाक्का यमगर, सरपंच प्रा. सरिता भिंगे, चंद्रकांत देशमुख, प्रा. नानासाहेब लिगाडे, जि. प. सदस्य गोविंद जरे, अ‍ॅड. सचिन देशमुख, माजी सरपंच उत्तम खांडेकर, महुदचे सरपंच बाळासाहेब ढाळे, उपसरपंच दिलीप नागणे, रवींद्र कदम, उद्योजक विठ्ठल बागल, मच्छिंद्र खरात, अ‍ॅड. धनंजय मेटकरी यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, युवक, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मकरंद अनासपुरे यांनी जनशक्ती फाउंडेशनने गावात महिला संवाद केंद्र सुरू करून महिलांच्या समस्या याच केंद्रामार्फत सोडवाव्यात. या केंद्रातून महिलांना रोजगार चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करावेत. या कामात नाम फाउंडेशन तुमच्या पाठीशी असेल, असे सांगितले. या गावातील जो युवक हुंडा घेईल, तो नामर्द असेल. युवकांनी हुंडा न घेता महिलेचा आदर करावा, असा मौलिक सल्लाही अनासपुरे यांनी दिला. ओढा परिसरपरिसर हिरवागार करा, तो मी पाहण्यास जरूर येईन, असे आश्वासनही अनासपुरे यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी  भोसले, कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, चंद्रकांत देशमुख, राजाभाऊ शेळके, मारुती पुजारी आदींनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक उपसरपंच प्रा. संतोष सावंत यांनी केले. सूत्रसंचालन आबासाहेब खरात यांनी केले, तर अ‍ॅड. विजयसिंह खरात यांनी आभार मानले.-------------------कटफळचा बाजारपेठेत दबदबानाम फाउंडेशनच्या माध्यमातून कटफळ गावची दुष्काळी परिस्थिती बदलून टाकली. या कामात मकरंद अनासपुरे यांचा सिंहाचा वाटा आहे. आता आम्ही ३ हजार ३०० एकर वन क्षेत्रावर सीसीटी तयार करून पावसाळ्यात पडणारे पाणी गावातच अडवून गाव कसे पाणीदार होईल, यासाठी काम करणार आहोत. आज पाण्यामुळे आमच्या भागात फळे, भाजीपाल्याच्या दर्जेदार उत्पादनामुळे कटफळचा बाजारपेठेत दबदबा वाढल्याचे जनशक्ती फाउंडेशनचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.------------------जि. प. शाळेत डिजिटल शाळेची सुरुवात- या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दिवसानिमित्त कटफळ परिसरात जि. प. प्राथ. शाळेत डिजिटल शाळा उपक्रमास सुरुवात केली. उद्योजक नवनाथ हांडे यांच्या सहकार्यातून मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते शाळेला संगणक संच भेट देऊन विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. --------------१५० एकर क्षेत्र आले ओलिताखाली- आपल्या गावातील लोक गावातच कसे राहतील, ही उमेद घेऊन गावातील मारुती मंदिरात नाम फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आणि बघता-बघता गावातील सर्वांनी मतभेद विसरून कासाळ ओढा पुनरुज्जीवन केल्याने १५० एकर क्षेत्र सुपीक होऊन ओलिताखाली आले आहे. हे एकीचे बळ असल्याचे प्रा. संतोष सावंत यांनी सांगितले.