शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेती करावी, मकरंद अनासपुर यांचे आवाहन, कासाळ ओढ्यावर जलपूजन, लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 11:40 IST

जोपर्यंत जनशक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत गावचा विकास अशक्य आहे, असे असले तरी आजच्या काळात आपण माणुसकी विसरत चाललो आहोत. माणसाचे आयुष्य फार कमी राहिले आहे. तुम्ही आज जे काम केले ते पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल.

ठळक मुद्देनाम फाउंडेशनच्या माध्यमातून कटफळ गावची दुष्काळी परिस्थिती बदलून टाकली१५० एकर क्षेत्र आले ओलिताखालीजि. प. शाळेत डिजिटल शाळेची सुरुवात

आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि ८ : जोपर्यंत जनशक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत गावचा विकास अशक्य आहे, असे असले तरी आजच्या काळात आपण माणुसकी विसरत चाललो आहोत. माणसाचे आयुष्य फार कमी राहिले आहे. तुम्ही आज जे काम केले ते पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल. कासाळ ओढ्यात ५०४ टीसीएम जलसाठा तयार झाल्याने शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेतीचा प्रयोग करावा. यापुढे गावातील युवकांनी प्रत्येक कामात संवाद साधून जलसंधारणाची कामे करावीत. तरच हिवरे बाजार, राळेगणसिद्धीसारखा आपल्याला बदल झालेला दिसेल, असे सांगून नाम फाउंडेशन नेहमी तुमच्या बरोबर असेल, असा विश्वास नाम फाउंडेशनचे संस्थापक, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिला. कटफळ (ता. सांगोला) येथील गावची अर्थवाहिनी असलेल्या सात कि. मी. कासाळ ओढ्याचे लोकसहभाग, नाम फाउंडेशन, जनशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून पुनरुज्जीवनामुळे ओढ्यावरील पाच बंधाºयांसह ओढ्यात सुमारे ५०४ टीसीएम पाणीसाठा झाला आहे. या पाण्याचे जलपूजन व लोकार्पण सोहळा नाम फाउंडेशनचे संस्थापक, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाण्याची खणानारळांनी ओटी भरून जलपूजन करताच नाम फाउंडेशनचा विजय असो, जनशक्ती संघटनेचा विजय असो, असा नारा देण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, तहसीलदार संजय पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, उपसंचालक जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, नाम फाउंडेशनचे राजाभाऊ शेळके, सभापती मायाक्का यमगर, सरपंच प्रा. सरिता भिंगे, चंद्रकांत देशमुख, प्रा. नानासाहेब लिगाडे, जि. प. सदस्य गोविंद जरे, अ‍ॅड. सचिन देशमुख, माजी सरपंच उत्तम खांडेकर, महुदचे सरपंच बाळासाहेब ढाळे, उपसरपंच दिलीप नागणे, रवींद्र कदम, उद्योजक विठ्ठल बागल, मच्छिंद्र खरात, अ‍ॅड. धनंजय मेटकरी यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, युवक, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मकरंद अनासपुरे यांनी जनशक्ती फाउंडेशनने गावात महिला संवाद केंद्र सुरू करून महिलांच्या समस्या याच केंद्रामार्फत सोडवाव्यात. या केंद्रातून महिलांना रोजगार चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करावेत. या कामात नाम फाउंडेशन तुमच्या पाठीशी असेल, असे सांगितले. या गावातील जो युवक हुंडा घेईल, तो नामर्द असेल. युवकांनी हुंडा न घेता महिलेचा आदर करावा, असा मौलिक सल्लाही अनासपुरे यांनी दिला. ओढा परिसरपरिसर हिरवागार करा, तो मी पाहण्यास जरूर येईन, असे आश्वासनही अनासपुरे यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी  भोसले, कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, चंद्रकांत देशमुख, राजाभाऊ शेळके, मारुती पुजारी आदींनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक उपसरपंच प्रा. संतोष सावंत यांनी केले. सूत्रसंचालन आबासाहेब खरात यांनी केले, तर अ‍ॅड. विजयसिंह खरात यांनी आभार मानले.-------------------कटफळचा बाजारपेठेत दबदबानाम फाउंडेशनच्या माध्यमातून कटफळ गावची दुष्काळी परिस्थिती बदलून टाकली. या कामात मकरंद अनासपुरे यांचा सिंहाचा वाटा आहे. आता आम्ही ३ हजार ३०० एकर वन क्षेत्रावर सीसीटी तयार करून पावसाळ्यात पडणारे पाणी गावातच अडवून गाव कसे पाणीदार होईल, यासाठी काम करणार आहोत. आज पाण्यामुळे आमच्या भागात फळे, भाजीपाल्याच्या दर्जेदार उत्पादनामुळे कटफळचा बाजारपेठेत दबदबा वाढल्याचे जनशक्ती फाउंडेशनचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.------------------जि. प. शाळेत डिजिटल शाळेची सुरुवात- या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दिवसानिमित्त कटफळ परिसरात जि. प. प्राथ. शाळेत डिजिटल शाळा उपक्रमास सुरुवात केली. उद्योजक नवनाथ हांडे यांच्या सहकार्यातून मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते शाळेला संगणक संच भेट देऊन विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. --------------१५० एकर क्षेत्र आले ओलिताखाली- आपल्या गावातील लोक गावातच कसे राहतील, ही उमेद घेऊन गावातील मारुती मंदिरात नाम फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आणि बघता-बघता गावातील सर्वांनी मतभेद विसरून कासाळ ओढा पुनरुज्जीवन केल्याने १५० एकर क्षेत्र सुपीक होऊन ओलिताखाली आले आहे. हे एकीचे बळ असल्याचे प्रा. संतोष सावंत यांनी सांगितले.