शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेती करावी, मकरंद अनासपुर यांचे आवाहन, कासाळ ओढ्यावर जलपूजन, लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 11:40 IST

जोपर्यंत जनशक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत गावचा विकास अशक्य आहे, असे असले तरी आजच्या काळात आपण माणुसकी विसरत चाललो आहोत. माणसाचे आयुष्य फार कमी राहिले आहे. तुम्ही आज जे काम केले ते पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल.

ठळक मुद्देनाम फाउंडेशनच्या माध्यमातून कटफळ गावची दुष्काळी परिस्थिती बदलून टाकली१५० एकर क्षेत्र आले ओलिताखालीजि. प. शाळेत डिजिटल शाळेची सुरुवात

आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि ८ : जोपर्यंत जनशक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत गावचा विकास अशक्य आहे, असे असले तरी आजच्या काळात आपण माणुसकी विसरत चाललो आहोत. माणसाचे आयुष्य फार कमी राहिले आहे. तुम्ही आज जे काम केले ते पुढील पिढीसाठी प्रेरणादायी असेल. कासाळ ओढ्यात ५०४ टीसीएम जलसाठा तयार झाल्याने शेतकºयांनी एकत्र येऊन गटशेतीचा प्रयोग करावा. यापुढे गावातील युवकांनी प्रत्येक कामात संवाद साधून जलसंधारणाची कामे करावीत. तरच हिवरे बाजार, राळेगणसिद्धीसारखा आपल्याला बदल झालेला दिसेल, असे सांगून नाम फाउंडेशन नेहमी तुमच्या बरोबर असेल, असा विश्वास नाम फाउंडेशनचे संस्थापक, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिला. कटफळ (ता. सांगोला) येथील गावची अर्थवाहिनी असलेल्या सात कि. मी. कासाळ ओढ्याचे लोकसहभाग, नाम फाउंडेशन, जनशक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून पुनरुज्जीवनामुळे ओढ्यावरील पाच बंधाºयांसह ओढ्यात सुमारे ५०४ टीसीएम पाणीसाठा झाला आहे. या पाण्याचे जलपूजन व लोकार्पण सोहळा नाम फाउंडेशनचे संस्थापक, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पाण्याची खणानारळांनी ओटी भरून जलपूजन करताच नाम फाउंडेशनचा विजय असो, जनशक्ती संघटनेचा विजय असो, असा नारा देण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, तहसीलदार संजय पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, उपसंचालक जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, नाम फाउंडेशनचे राजाभाऊ शेळके, सभापती मायाक्का यमगर, सरपंच प्रा. सरिता भिंगे, चंद्रकांत देशमुख, प्रा. नानासाहेब लिगाडे, जि. प. सदस्य गोविंद जरे, अ‍ॅड. सचिन देशमुख, माजी सरपंच उत्तम खांडेकर, महुदचे सरपंच बाळासाहेब ढाळे, उपसरपंच दिलीप नागणे, रवींद्र कदम, उद्योजक विठ्ठल बागल, मच्छिंद्र खरात, अ‍ॅड. धनंजय मेटकरी यांच्यासह कृषी व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, युवक, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मकरंद अनासपुरे यांनी जनशक्ती फाउंडेशनने गावात महिला संवाद केंद्र सुरू करून महिलांच्या समस्या याच केंद्रामार्फत सोडवाव्यात. या केंद्रातून महिलांना रोजगार चांगल्या पद्धतीने उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करावेत. या कामात नाम फाउंडेशन तुमच्या पाठीशी असेल, असे सांगितले. या गावातील जो युवक हुंडा घेईल, तो नामर्द असेल. युवकांनी हुंडा न घेता महिलेचा आदर करावा, असा मौलिक सल्लाही अनासपुरे यांनी दिला. ओढा परिसरपरिसर हिरवागार करा, तो मी पाहण्यास जरूर येईन, असे आश्वासनही अनासपुरे यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी  भोसले, कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, चंद्रकांत देशमुख, राजाभाऊ शेळके, मारुती पुजारी आदींनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक उपसरपंच प्रा. संतोष सावंत यांनी केले. सूत्रसंचालन आबासाहेब खरात यांनी केले, तर अ‍ॅड. विजयसिंह खरात यांनी आभार मानले.-------------------कटफळचा बाजारपेठेत दबदबानाम फाउंडेशनच्या माध्यमातून कटफळ गावची दुष्काळी परिस्थिती बदलून टाकली. या कामात मकरंद अनासपुरे यांचा सिंहाचा वाटा आहे. आता आम्ही ३ हजार ३०० एकर वन क्षेत्रावर सीसीटी तयार करून पावसाळ्यात पडणारे पाणी गावातच अडवून गाव कसे पाणीदार होईल, यासाठी काम करणार आहोत. आज पाण्यामुळे आमच्या भागात फळे, भाजीपाल्याच्या दर्जेदार उत्पादनामुळे कटफळचा बाजारपेठेत दबदबा वाढल्याचे जनशक्ती फाउंडेशनचे मार्गदर्शक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.------------------जि. प. शाळेत डिजिटल शाळेची सुरुवात- या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दिवसानिमित्त कटफळ परिसरात जि. प. प्राथ. शाळेत डिजिटल शाळा उपक्रमास सुरुवात केली. उद्योजक नवनाथ हांडे यांच्या सहकार्यातून मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते शाळेला संगणक संच भेट देऊन विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. --------------१५० एकर क्षेत्र आले ओलिताखाली- आपल्या गावातील लोक गावातच कसे राहतील, ही उमेद घेऊन गावातील मारुती मंदिरात नाम फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आणि बघता-बघता गावातील सर्वांनी मतभेद विसरून कासाळ ओढा पुनरुज्जीवन केल्याने १५० एकर क्षेत्र सुपीक होऊन ओलिताखाली आले आहे. हे एकीचे बळ असल्याचे प्रा. संतोष सावंत यांनी सांगितले.