शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

चपळगाव मंडलातील शेतकरी पीकविम्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:21 IST

चपळगाव मंडलातील चपळगावसह डोंबरजवळगे, नन्हेगाव, सिंदखेड, मोट्याळ, चुंगी, पितापूर, चपळगाववाडी, कुरनूर, बावकरवाडी, दर्शनाळ, बऱ्हाणपूर, बोरेगाव यासह इतर गावांतील बहुतांश ...

चपळगाव मंडलातील चपळगावसह डोंबरजवळगे, नन्हेगाव, सिंदखेड, मोट्याळ, चुंगी, पितापूर, चपळगाववाडी, कुरनूर, बावकरवाडी, दर्शनाळ, बऱ्हाणपूर, बोरेगाव यासह इतर गावांतील बहुतांश शेतकरी खरिपातील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर पीकविमा कंपनीकडून पंचनामे करण्यात आले, परंतु त्याची रक्कम मिळाली नाही. न्यायही मिळाला नाही. यावेळी कृषी उपसंचालक रवींद्र माने, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर, कृषी अधिकारी रामचंद्र माळी, सिद्धाराम भंडारकवठे, शशीकांत लादे, सदानंद भोसले, खंडू कोरे, प्रशांत पाटील, उत्तम भगत उपस्थित होते.

चपळगाव मंडलातील बहुतांश कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. पीकविमा मिळावा यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा व तालुका कृषी अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री यांच्याकडे न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा केला आहे, असे सरपंच उमेश पाटील यांनी सांगितले.

कोट ::::::

चपळगाव मंडलातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी विमा कंपनीशी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षकांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी मागवून पाठपुरावा करणार आहे, असे तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर व जिल्हा कृषी अधिकारी जयवंत कवडे यांनी सांगितले.