शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

माळकावठे येथील जिराईत शेतीला शेतकरी कंपनीचे वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 12:13 IST

यशकथा : जिराईत शेतीत राबणाऱ्या माळकावठे (जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांमध्ये सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीने आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.

- नारायण चव्हाण (सोलापूर)

वर्षानुवर्षे जिराईत शेतीत राबणाऱ्या माळकावठे (जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांमध्ये सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीने आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. विविध कृषिविषयक योजना राबवून कंपनीने माळकवठे गावाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकला आहे .

तीन वर्षांपूर्वी हणमंत कुलकर्णी यांनी सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. कृषी विभागाकडे तिची नोंदणी केली. निव्वळ शेतीवर अवलंबून असलेल्या तरुणांना एकत्र करीत त्यांनी शेतविकासाचा ध्यास घेतला. गावातील अनेकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले; परंतु कुलकर्णी यांनी नियोजनपूर्वक काम करीत माळकवठ्याच्या शेतविकासाचा आराखडा तयार करून कृषिविभागाकडे सादर केला. त्यासाठी त्यांनी सोलापूर च्या ‘आत्मा ' चे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांची मदत घेतली. पहिल्याच वर्षी त्यांनी ७०० शेतकरी सभासद केले.

कृषिविभागाने सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या कृषी विकास आराखड्याला मान्यता दिली. स्प्रींकलर संच, शेततळी,  पाईपलाईन, पाणबुडी मोटारी, शेततळ्यासाठी प्लास्टिक आच्छादन, ताडपत्री, कृषी औजारे, ट्रॅक्टर, बी बियाणे आदींचे अनुदानावर वाटप केले. शेतीला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे भकास माळकवठे गावचे रूप हळूहळू पालटू लागले.

आता या गावात शेतकरी कंपनीच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. दाळमिलची उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी डाळीची प्रतवारी करणारी मशीन घेतली. परिसरातील शेतकऱ्यांना तूर, हरभरा यांपासून डाळ करण्याची सोय झाल्याने त्यांना मोठा आर्थिक लाभ होत आहे. कंपनीची आर्थिक उलाढाल आणि विश्वासार्हता वाढत राहिल्याने शासनाकडून तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. पहिल्याच वर्षी दक्षिण सोलापूर तालुक्यातील १६०० शेतक ऱ्यांनी या हमीभाव खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी आणली. त्यांची पायपीट वाचली शिवाय चांगला दर मिळाला. शेतमालाच्या साठवणुकीसाठी गोदाम बांधण्याची मागणी शेतकऱ्यांतून पुढे आली. आता कंपनीच्या मालकीचे प्रशस्त गोदाम आहे. व्यवस्थापन उत्तम असल्याने शेतकऱ्यांना कशाचीच चिंता नाही. 

दरवर्षी एकाच पिकाची निवड करून गावातील सर्व शेतकरी सभासद त्याच पिकाची लागवड करतात. कंपनीच्या वतीने त्यांना बी-बियाणे पुरवले जातात. त्याची निगा, रोगव्यवस्थापन, कीड व्यवस्थापन यावर कृषितज्ज्ञांचा बांधावर सल्ला दिला जातो. अधिक उत्पादनासाठी अभ्यास सहलीतून मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला जातो. काढणीनंतर शेतमालाची विक्रीव्यवस्था कंपनीकडून केली जाते. मुंबई, पुणे, बंगळुरू येथे हा शेतमाल पाठवला जात असल्याने त्याला दरही चांगला मिळतो. ही शेतकरी उत्पादक कंपनी माळकवठे गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी