शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

माळकावठे येथील जिराईत शेतीला शेतकरी कंपनीचे वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 12:13 IST

यशकथा : जिराईत शेतीत राबणाऱ्या माळकावठे (जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांमध्ये सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीने आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.

- नारायण चव्हाण (सोलापूर)

वर्षानुवर्षे जिराईत शेतीत राबणाऱ्या माळकावठे (जि. सोलापूर) येथील शेतकऱ्यांमध्ये सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीने आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. विविध कृषिविषयक योजना राबवून कंपनीने माळकवठे गावाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकला आहे .

तीन वर्षांपूर्वी हणमंत कुलकर्णी यांनी सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. कृषी विभागाकडे तिची नोंदणी केली. निव्वळ शेतीवर अवलंबून असलेल्या तरुणांना एकत्र करीत त्यांनी शेतविकासाचा ध्यास घेतला. गावातील अनेकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले; परंतु कुलकर्णी यांनी नियोजनपूर्वक काम करीत माळकवठ्याच्या शेतविकासाचा आराखडा तयार करून कृषिविभागाकडे सादर केला. त्यासाठी त्यांनी सोलापूर च्या ‘आत्मा ' चे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांची मदत घेतली. पहिल्याच वर्षी त्यांनी ७०० शेतकरी सभासद केले.

कृषिविभागाने सोलापूर अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या कृषी विकास आराखड्याला मान्यता दिली. स्प्रींकलर संच, शेततळी,  पाईपलाईन, पाणबुडी मोटारी, शेततळ्यासाठी प्लास्टिक आच्छादन, ताडपत्री, कृषी औजारे, ट्रॅक्टर, बी बियाणे आदींचे अनुदानावर वाटप केले. शेतीला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे भकास माळकवठे गावचे रूप हळूहळू पालटू लागले.

आता या गावात शेतकरी कंपनीच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. दाळमिलची उभारणी करण्यात आली आहे. त्यासाठी डाळीची प्रतवारी करणारी मशीन घेतली. परिसरातील शेतकऱ्यांना तूर, हरभरा यांपासून डाळ करण्याची सोय झाल्याने त्यांना मोठा आर्थिक लाभ होत आहे. कंपनीची आर्थिक उलाढाल आणि विश्वासार्हता वाढत राहिल्याने शासनाकडून तूर हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. पहिल्याच वर्षी दक्षिण सोलापूर तालुक्यातील १६०० शेतक ऱ्यांनी या हमीभाव खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी आणली. त्यांची पायपीट वाचली शिवाय चांगला दर मिळाला. शेतमालाच्या साठवणुकीसाठी गोदाम बांधण्याची मागणी शेतकऱ्यांतून पुढे आली. आता कंपनीच्या मालकीचे प्रशस्त गोदाम आहे. व्यवस्थापन उत्तम असल्याने शेतकऱ्यांना कशाचीच चिंता नाही. 

दरवर्षी एकाच पिकाची निवड करून गावातील सर्व शेतकरी सभासद त्याच पिकाची लागवड करतात. कंपनीच्या वतीने त्यांना बी-बियाणे पुरवले जातात. त्याची निगा, रोगव्यवस्थापन, कीड व्यवस्थापन यावर कृषितज्ज्ञांचा बांधावर सल्ला दिला जातो. अधिक उत्पादनासाठी अभ्यास सहलीतून मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला जातो. काढणीनंतर शेतमालाची विक्रीव्यवस्था कंपनीकडून केली जाते. मुंबई, पुणे, बंगळुरू येथे हा शेतमाल पाठवला जात असल्याने त्याला दरही चांगला मिळतो. ही शेतकरी उत्पादक कंपनी माळकवठे गावातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी