शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कारखानधारकांनो, धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करा, सदाभाऊ खोत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 12:09 IST

साखर कारखान्यांनी धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करणे गरजेचे आहे़ १ नोव्हेंबरपूर्वी कारखानदारांची बैठक बोलावून संवादातून योग्य मार्ग काढला जाईल. मार्ग निघाला नाही तर संघर्ष करण्यासाठी तयार राहा़ असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले़.

ठळक मुद्देबैलगाडी शर्यत सुरू ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारीसाखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरूमराठा, धनगर आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू

आॅनलाइन लोकमत सोलापूरमाळशिरस दि २४ : यावर्षी साखर कारखान्यांनी धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करणे गरजेचे आहे़ १ नोव्हेंबरपूर्वी कारखानदारांची बैठक बोलावून संवादातून योग्य मार्ग काढला जाईल. मार्ग निघाला नाही तर संघर्ष करण्यासाठी तयार राहा़ कपाळाला कुंकू लावून मी आलो नाही तर शेतकºयांसाठी कपाळाचे कुंकू पुसून मैदानात आलो आहे. जनतेचे प्रश्न सामंजस्याने व वेळप्रसंगी संघर्षाने सोडविण्यासाठी क्रांती संघटना काम करीत आहे, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले़ गोरडवाडी (ता़ माळशिरस) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते़यावेळी माजी सरपंच तुकाराम देशमुख, अ‍ॅड़ सोमनाथ वाघमोडे, जयवंत बगाडे, पं़ स़ सदस्य माऊली पाटील, अजय सकट, स्वप्नील वाघमारे, नगरसेवक मारुती देशमुख, रणजित मोटे, भगवान थोरात, डॉ़ तुकाराम ठवरे, पांडुरंग वाघमोडे, बाळासाहेब सरगर, साहेबराव देशमुख, श्रीलेखा पाटील, विकास धार्इंजे, सचिन पडळकर, सुरेश तरंगे, बाळासाहेब कर्णवर, भीमराव शेंडगे, भानुदास सालगुडे, भैय्याजी पुकळे, सुरेश वाघमोडे, सरपंच ज्ञानू कांबळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी साहेबराव बेंदगुडे, उपविभागीय अधिकारी रवींद्र कांबळे, तालुका अधिकारी नंदकुमार म्हसवडे, तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, मंत्रालय सहा़ अजय वगरे, ग्रामसेवक रवींद्र पवार यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते़प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने सदाभाऊ खोत यांचा सत्कार करण्यात आला़ गोरडवाडी गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाले असून शेवटच्या शौचालयाचा लोकार्पण यावेळी करण्यात आला़ याप्रसंगी जिल्ह्यातील पहिल्या रयत क्रांती संघटनेची शाखा स्थापन करून त्याचे उद्घाटन करण्यात आले़ पहिले तृतीयपंथी सरपंच ज्ञानू कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी दुकानदार संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जयवंत बगाडे, भाजपाचे पांडुरंग वाघमोडे, लक्ष्मण गोरड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच लक्ष्मण गोरड, रयत क्रांतीचे विष्णू गोरड, सरपंच भागवत कर्णवर, भिकाजी गोरड, रामचंद्र गोरड, खंडु कळसुले, पांडुरंग पिसे आदींनी परिश्रम घेतले़ प्रास्ताविक गोविंद कर्णवर यांनी केले तर आभार प्रा़ शरद कर्णवर यांनी मानले.-----------------------ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून धनगर आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत़ बैलगाडी शर्यत सुरू ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे़ कांदा चाळ, ठिबक सिंचन, रोगमुक्त बियाणे अशा कृषी खात्याच्या अनेक योजनांसाठी प्रयत्न सुरू आहेत़ साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ पुढील काळात प्रत्येक गणात शेतकरी मेळावे घेण्यात येणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले़