शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कारखानधारकांनो, धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करा, सदाभाऊ खोत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 12:09 IST

साखर कारखान्यांनी धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करणे गरजेचे आहे़ १ नोव्हेंबरपूर्वी कारखानदारांची बैठक बोलावून संवादातून योग्य मार्ग काढला जाईल. मार्ग निघाला नाही तर संघर्ष करण्यासाठी तयार राहा़ असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले़.

ठळक मुद्देबैलगाडी शर्यत सुरू ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारीसाखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरूमराठा, धनगर आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू

आॅनलाइन लोकमत सोलापूरमाळशिरस दि २४ : यावर्षी साखर कारखान्यांनी धुराडे पेटण्यापूर्वी ऊस दर जाहीर करणे गरजेचे आहे़ १ नोव्हेंबरपूर्वी कारखानदारांची बैठक बोलावून संवादातून योग्य मार्ग काढला जाईल. मार्ग निघाला नाही तर संघर्ष करण्यासाठी तयार राहा़ कपाळाला कुंकू लावून मी आलो नाही तर शेतकºयांसाठी कपाळाचे कुंकू पुसून मैदानात आलो आहे. जनतेचे प्रश्न सामंजस्याने व वेळप्रसंगी संघर्षाने सोडविण्यासाठी क्रांती संघटना काम करीत आहे, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले़ गोरडवाडी (ता़ माळशिरस) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते़यावेळी माजी सरपंच तुकाराम देशमुख, अ‍ॅड़ सोमनाथ वाघमोडे, जयवंत बगाडे, पं़ स़ सदस्य माऊली पाटील, अजय सकट, स्वप्नील वाघमारे, नगरसेवक मारुती देशमुख, रणजित मोटे, भगवान थोरात, डॉ़ तुकाराम ठवरे, पांडुरंग वाघमोडे, बाळासाहेब सरगर, साहेबराव देशमुख, श्रीलेखा पाटील, विकास धार्इंजे, सचिन पडळकर, सुरेश तरंगे, बाळासाहेब कर्णवर, भीमराव शेंडगे, भानुदास सालगुडे, भैय्याजी पुकळे, सुरेश वाघमोडे, सरपंच ज्ञानू कांबळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी साहेबराव बेंदगुडे, उपविभागीय अधिकारी रवींद्र कांबळे, तालुका अधिकारी नंदकुमार म्हसवडे, तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, मंत्रालय सहा़ अजय वगरे, ग्रामसेवक रवींद्र पवार यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते़प्रारंभी ग्रामस्थांच्या वतीने सदाभाऊ खोत यांचा सत्कार करण्यात आला़ गोरडवाडी गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाले असून शेवटच्या शौचालयाचा लोकार्पण यावेळी करण्यात आला़ याप्रसंगी जिल्ह्यातील पहिल्या रयत क्रांती संघटनेची शाखा स्थापन करून त्याचे उद्घाटन करण्यात आले़ पहिले तृतीयपंथी सरपंच ज्ञानू कांबळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी दुकानदार संघटनेच्या वतीने सदाभाऊ खोत यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जयवंत बगाडे, भाजपाचे पांडुरंग वाघमोडे, लक्ष्मण गोरड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच लक्ष्मण गोरड, रयत क्रांतीचे विष्णू गोरड, सरपंच भागवत कर्णवर, भिकाजी गोरड, रामचंद्र गोरड, खंडु कळसुले, पांडुरंग पिसे आदींनी परिश्रम घेतले़ प्रास्ताविक गोविंद कर्णवर यांनी केले तर आभार प्रा़ शरद कर्णवर यांनी मानले.-----------------------ठळक मुद्देमराठा आरक्षणासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून धनगर आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत़ बैलगाडी शर्यत सुरू ठेवण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू आहे़ कांदा चाळ, ठिबक सिंचन, रोगमुक्त बियाणे अशा कृषी खात्याच्या अनेक योजनांसाठी प्रयत्न सुरू आहेत़ साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ पुढील काळात प्रत्येक गणात शेतकरी मेळावे घेण्यात येणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले़