शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

आपत्ती तोंडावर... व्यवस्थापनाचा मात्र पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:20 IST

राज्यभर अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. संततधार सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी पसरत आहे. उजनी ...

राज्यभर अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. संततधार सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी पसरत आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणे भरून ओसंडत आहेत. उजनी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील भीमा, सीना, भोगावती, हरणा, बोरी नद्यांना कोणत्याही स्थितीत महापूर येण्याची शक्यता आहे. साहित्याविना पूरस्थितीवर मात करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची अवस्था दयनीय झाली आहे.

गेल्या दहा वर्षांत चार वेळा भीमा आणि सीना नद्यांना महापूर आल्याने नदीकाठच्या जनतेची अवस्था बिकट झाली आहे. मागील वर्षी सीना नदीने पात्र बदलले तर भीमेच्या पुरात मोठे नुकसान झाले. महिन्यापूर्वी लवंगी येथे तीन शाळकरी बालकांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. बचावाचे कोणतेही साहित्य जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे नाही याची प्रचिती त्याच वेळी आली होती. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे दोन कोटींच्या शोध आणि बचाव साहित्याची मागणी केल्याचे सांगण्यात आले होते. अद्यापपर्यंत मागणीची दखल घेण्यात आली नाही.

-------

मागणी केलेले शोध, बचाव साहित्य

रबर/ रेस्क्यू बोटी ( १३), सर्चलाइट (२६), लाइफबॉय (६५), सेफ्टी हेल्मेट (६५), मेगाफोन (२६), फ्लोटिंग पंप (५), ब्रीदिंग अप्रायटस (१३) या साहित्याच्या खरेदीसाठी दोन कोटींची मागणी करण्यात आली आहे. राज्य शासनाने मागणीची दखलच घेतली नाही.

-------

१० वर्षांपूर्वी साहित्य खरेदी

सोलापूर जिल्ह्यात वारंवार पूर परिस्थिती निर्माण होते. भीमा-सीना नदीच्या काठी मानवी वसाहती वाढल्या आहेत. महापुराने मनुष्य आणि जनावरे वाहून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यातून कोणताच बोध घेतला नाही. १० वर्षांपूर्वी शोध आणि बचाव साहित्य खरेदी केले होते. हे साहित्य जीर्ण होऊन नष्ट झाले, तरीही शासनाने दहा वर्षांत कोणतीच खरेदी केली नाही. यावरून आपत्ती व्यवस्थापन समितीचे गांभीर्य दिसून येते.

------

एप्रिल महिन्यांत राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे साहित्य खरेदीसाठी २ कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे. त्याचा वारंवार पाठपुरावा सुरू आहे.

- चंद्रकांत हेडगिरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सोलापूर

------

लवंगी येथील दुर्घटनेनंतर प्रशासनाने बोध घ्यायला हवा होता. महापूर सांगून येत नाही. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास मदतकार्य कसे करणार याबाबत शासन गंभीर नाही. दोन महिन्यांपूर्वी मी स्वतः सचिवांशी बोललो . पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालायला हवे. साहित्य खरेदीसाठी निधीची तातडीने तरतूद करायला हवी.

- सुभाष देशमुख, आमदार, दक्षिण सोलापूर

-----