शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

उर्दू भाषेमध्ये खूप मोठी ताकद, अनिस चिश्ती यांचे मत,  उर्दू संमेलन जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:27 IST

देशात १६५२ भाषा बोलल्या जातात़ उर्दू ही एक त्यापैकी एक आहे़ देशाच्या अर्थसंकल्पाची सुरुवात ही उर्दूने केली जाते़ जगात अनेक ठिकाणचा कारभार हा उर्दूत चालतो़ इतक्या मोठ्या प्रमाणात भाषा देशात बोलल्या जात असल्या तरी उर्दू वा अन्य कोणत्याही भाषेबद्दल येथे तिरस्कार मात्र कोणी करताना दिसत नाही़

ठळक मुद्देअखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलनाच्या वतीने उर्दू दिनानिमित्त गिरीश चौधरी यांना उर्दू मित्र पुरस्कार तर सय्यद इक्बाल यांना जीवनगौरव पुरस्कार चिश्ती यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले़उर्दू ही एका जमातीची भाषा असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे़ ही भाषा सर्वांचीच असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे म्हणाले़अनिस चिश्ती यांनी माजी मुख्यमंत्री कै़ शंकरराव चव्हाण यांचे उच्च शिक्षण उर्दूमधून झाल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : देशात १६५२ भाषा बोलल्या जातात़ उर्दू ही एक त्यापैकी एक आहे़ देशाच्या अर्थसंकल्पाची सुरुवात ही उर्दूने केली जाते़ जगात अनेक ठिकाणचा कारभार हा उर्दूत चालतो़ इतक्या मोठ्या प्रमाणात भाषा देशात बोलल्या जात असल्या तरी उर्दू वा अन्य कोणत्याही भाषेबद्दल येथे तिरस्कार मात्र कोणी करताना दिसत नाही़ इतकी मोठी ताकद उर्दूमध्ये असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ, लेखक डॉ़ अनिस चिश्ती यांनी केले़अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलनाच्या वतीने उर्दू दिनानिमित्त गिरीश चौधरी यांना उर्दू मित्र पुरस्कार तर सय्यद इक्बाल यांना जीवनगौरव पुरस्कार चिश्ती यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले़ या प्रसंगी बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले़ गुरुवारी सायंकाळी डॉ़ निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमास पोलीस आयुक्त महादेव तांबडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते़ यावेळी अ़ भा़ उर्दू साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अ‍ॅड़ यू़ एऩ बेरिया, सचिव अखलाख अहेमद शेख, उपसचिव अश्पाक सातखेड, उपाध्यक्ष अब्दुल क य्युम, अब्दुल जब्बार शेख यांची प्रमुख उपस्थिती होती़ रियाज वळसंगकर यांनी प्रास्ताविकेतून उर्दू कॉन्फरन्सचा इतिहास थोडक्यात मांडला़ प्रारंभी महाराष्ट्र उर्दू साहित्य पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल सोशल प्राथमिक उर्दू प्रशालेचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल आणि एजाज शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला़ यावेळी अनिस चिश्ती यांनी माजी मुख्यमंत्री कै़ शंकरराव चव्हाण यांचे उच्च शिक्षण उर्दूमधून झाल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली़ उर्दूतील प्रत्येक शब्द हा वजनदार आहे़ तो जपून वापरायला हवा़ या देशात खरोखरच उर्दू भाषेला प्रोत्साहन दिले जात असल्याचेही ते म्हणाले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्पाक सातखेड यांनी केले तर आभार अखलाख शेख यांनी मानले़ यावेळी विकार शेख, डॉ़ गुलाम दस्तगीर, नासर आळंदकर, डॉ़ इक्बाल तांबोळी, प्रा़ शफी चोपदार, मुमताज शेख, अय्युब नल्लामद्दू आदी उपस्थित होते़ -----------------------उर्दू ही सर्वांचीच भाषा : तांबडेयावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना उर्दू ही एका जमातीची भाषा असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे़ ही भाषा सर्वांचीच असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे म्हणाले़ महाराष्ट्रातील मराठी माणूस जरी उर्दू बोलू, लिहू शकत नसला तरी ती समजू शकतो हेच मोठे वैैशिष्ट्य या भाषेचे मानले पाहिजे़ उर्दू समजून घ्या, जाणून घ्या आणि शिकूनही घ्या, असेही ते म्हणाले़ 

टॅग्स :Solapurसोलापूर