शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

उर्दू भाषेमध्ये खूप मोठी ताकद, अनिस चिश्ती यांचे मत,  उर्दू संमेलन जीवनगौरव पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:27 IST

देशात १६५२ भाषा बोलल्या जातात़ उर्दू ही एक त्यापैकी एक आहे़ देशाच्या अर्थसंकल्पाची सुरुवात ही उर्दूने केली जाते़ जगात अनेक ठिकाणचा कारभार हा उर्दूत चालतो़ इतक्या मोठ्या प्रमाणात भाषा देशात बोलल्या जात असल्या तरी उर्दू वा अन्य कोणत्याही भाषेबद्दल येथे तिरस्कार मात्र कोणी करताना दिसत नाही़

ठळक मुद्देअखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलनाच्या वतीने उर्दू दिनानिमित्त गिरीश चौधरी यांना उर्दू मित्र पुरस्कार तर सय्यद इक्बाल यांना जीवनगौरव पुरस्कार चिश्ती यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले़उर्दू ही एका जमातीची भाषा असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे़ ही भाषा सर्वांचीच असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे म्हणाले़अनिस चिश्ती यांनी माजी मुख्यमंत्री कै़ शंकरराव चव्हाण यांचे उच्च शिक्षण उर्दूमधून झाल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : देशात १६५२ भाषा बोलल्या जातात़ उर्दू ही एक त्यापैकी एक आहे़ देशाच्या अर्थसंकल्पाची सुरुवात ही उर्दूने केली जाते़ जगात अनेक ठिकाणचा कारभार हा उर्दूत चालतो़ इतक्या मोठ्या प्रमाणात भाषा देशात बोलल्या जात असल्या तरी उर्दू वा अन्य कोणत्याही भाषेबद्दल येथे तिरस्कार मात्र कोणी करताना दिसत नाही़ इतकी मोठी ताकद उर्दूमध्ये असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ, लेखक डॉ़ अनिस चिश्ती यांनी केले़अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलनाच्या वतीने उर्दू दिनानिमित्त गिरीश चौधरी यांना उर्दू मित्र पुरस्कार तर सय्यद इक्बाल यांना जीवनगौरव पुरस्कार चिश्ती यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले़ या प्रसंगी बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले़ गुरुवारी सायंकाळी डॉ़ निर्मलकुमार फडकुले सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमास पोलीस आयुक्त महादेव तांबडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते़ यावेळी अ़ भा़ उर्दू साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अ‍ॅड़ यू़ एऩ बेरिया, सचिव अखलाख अहेमद शेख, उपसचिव अश्पाक सातखेड, उपाध्यक्ष अब्दुल क य्युम, अब्दुल जब्बार शेख यांची प्रमुख उपस्थिती होती़ रियाज वळसंगकर यांनी प्रास्ताविकेतून उर्दू कॉन्फरन्सचा इतिहास थोडक्यात मांडला़ प्रारंभी महाराष्ट्र उर्दू साहित्य पुरस्कार देऊन गौरविल्याबद्दल सोशल प्राथमिक उर्दू प्रशालेचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल आणि एजाज शेख यांचा विशेष सत्कार करण्यात आला़ यावेळी अनिस चिश्ती यांनी माजी मुख्यमंत्री कै़ शंकरराव चव्हाण यांचे उच्च शिक्षण उर्दूमधून झाल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली़ उर्दूतील प्रत्येक शब्द हा वजनदार आहे़ तो जपून वापरायला हवा़ या देशात खरोखरच उर्दू भाषेला प्रोत्साहन दिले जात असल्याचेही ते म्हणाले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्पाक सातखेड यांनी केले तर आभार अखलाख शेख यांनी मानले़ यावेळी विकार शेख, डॉ़ गुलाम दस्तगीर, नासर आळंदकर, डॉ़ इक्बाल तांबोळी, प्रा़ शफी चोपदार, मुमताज शेख, अय्युब नल्लामद्दू आदी उपस्थित होते़ -----------------------उर्दू ही सर्वांचीच भाषा : तांबडेयावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना उर्दू ही एका जमातीची भाषा असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे़ ही भाषा सर्वांचीच असल्याचे पोलीस आयुक्त महादेव तांबडे म्हणाले़ महाराष्ट्रातील मराठी माणूस जरी उर्दू बोलू, लिहू शकत नसला तरी ती समजू शकतो हेच मोठे वैैशिष्ट्य या भाषेचे मानले पाहिजे़ उर्दू समजून घ्या, जाणून घ्या आणि शिकूनही घ्या, असेही ते म्हणाले़ 

टॅग्स :Solapurसोलापूर