शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वजाविषयी कृतज्ञता, श्रध्दा व्यक्त करण्यासाठी पितृपंधरावडा पाळा - सुनिल शास्त्री गुरूजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 18:36 IST

सोलापूर : भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास श्राध्दपक्ष म्हटले जाते़ याच भाद्रपद शुक्ल पोर्णिमेच्या दिवसात वडीधाºया मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते़ यादिवसात आपल्या पूर्वजाच्या नावाचा पितर बसवून श्राध्द, अन्नदान केल्याने आपल्या घरात सुख, समृध्दी, शांती लाभते असे मत सोलापूरचे प्रसिध्द शास्त्री सुनिल शास्त्री गुरूजी यांनी व्यक्त केलेपितृपक्ष ...

ठळक मुद्दे- पितृपक्ष पंधरावड्यात अन्नदान महत्वाचे- अन्नदान केल्याने समाधान, शांती, धनलाभ होतो- कुटुंबाच्या कल्याणासाठी पितृपक्ष पंधरावडा पाळा

सोलापूर : भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास श्राध्दपक्ष म्हटले जाते़ याच भाद्रपद शुक्ल पोर्णिमेच्या दिवसात वडीधाºया मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते़ यादिवसात आपल्या पूर्वजाच्या नावाचा पितर बसवून श्राध्द, अन्नदान केल्याने आपल्या घरात सुख, समृध्दी, शांती लाभते असे मत सोलापूरचे प्रसिध्द शास्त्री सुनिल शास्त्री गुरूजी यांनी व्यक्त केले

पितृपक्ष पंधरावडयाबद्दल माहिती देताना सुनिल शास्त्री यांनी सांगितले की, आपल्या पूर्वजाविषयी कृतज्ञता व श्रध्दा व्यक्त करण्याच्या काळास पितृपंधरवडा किंवा श्राध्दपक्ष म्हणतात़ ज्या प्रमाणे आपण आपल्या कुलदैवतांची पूजा केल्याने समाधान, शांती प्राप्त होते असे वाटते त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या नावाचा पितर बसवून श्राध्द केल्याने सुख, समृध्दी लाभते़  पितृपंधरावड्याची विधी करताना लोकांनी दक्षिणेच्या बाजुला तोंड करून आपल्या पूर्वजांची नावे घ्यावीत, अंगठयावरून पाणी सोडून पितृाचा ब्राम्हण व देवाचा ब्राम्हण असे दोघांना जेवण द्यावे, शिवाय अन्न लोकांना अन्नदान केल्यास उत्तमच़ याचकाळात पूर्वजाच्या चांगल्यासाठी छत्री, काठी, रोख स्वरूपातील पैसे दान स्वरूपात देतात.

ज्या लोकांना तिथी लक्षात येत नसेल तर पितृपंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी अमावास्या येते. तिला सर्वपित्री अमावास्या म्हटले जाते. या दिवशी श्राध्द करावे़ यादिवशी सूर्य, चंद्र यांची युती होते. सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो. श्राध्द पक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटूंबियांसोबत वास्तव्य करत असतात, असा उल्लेख पुराणात आहे. त्यांच्या संतुष्टीसाठी श्रेष्ठ ब्राह्मणांना जेवण, दान दिले जाते. श्राध्द पक्षात तिर्थस्थानी जाऊन त्रिपींड दान केले जाते. नारायण नागबलीची पूजा केली जाते. आपल्या कुटुंबात सुख- समुध्दी नांदावी म्हणून दानधर्म केले जात असतात.

जो कुटुंबप्रमुख हा पितृपंधरावडा पाळत नाही त्याच्या घरातील प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात, रोगराई होते, अपघात होतात, लक्ष्मी, धनाचा नाश होतो, कुलनाश होतो, मनातील इच्छा अपुरी राहते, स्वप्न भंग होतात असे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते असेही सुनिल शास्त्री गुरूजी यांनी सांगितले़

टॅग्स :Solapurसोलापूर