शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

कार्यकर्त्यांची घडी विस्कटू देऊ नका, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे आवाहन, स्व़ ब्रम्हदेवदादा माने यांना सोलापूरात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 15:53 IST

राजकारणात राग गिळला पाहिजे, ब्रह्मदेवदादांनी तत्त्व जोपासण्यासाठी नातेवाईकांची पर्वा केली नाही, दादांनी मांडलेला विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्रित कार्यकर्त्यांची घडी विस्कटू देऊ नका, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

ठळक मुद्देस्व. ब्रह्मदेवदादा माने यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे बोलत होतेच्जि. प. चे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी दिलीपराव यांनी आता स्वभावात बदल करण्याची गरज भाषणात बोलून दाखवली बेलाटी-तिºहे येथील ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात प्रथम दादांच्या पुतळ्याला प्रमुखांनी अभिवादन केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : राजकारणात राग गिळला पाहिजे, ब्रह्मदेवदादांनी तत्त्व जोपासण्यासाठी नातेवाईकांची पर्वा केली नाही, दादांनी मांडलेला विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्रित कार्यकर्त्यांची घडी विस्कटू देऊ नका, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.स्व. ब्रह्मदेवदादा माने यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. बेलाटी-तिºहे येथील ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात प्रथम दादांच्या पुतळ्याला प्रमुखांनी अभिवादन केले. राजकारणासोबत शिक्षणाचे केंद्र असणाºया ब्रह्मदेवदादांनी बँक, व्याख्यानमाला सुरू केली. राजकारणात चाणाक्षपणा हवा असतो अन् तो दिलीपरावांकडे असल्याचे शिंदे म्हणाले. बळीराम साठे यांनी भाषणात एकत्रित राजकारण करण्याच्या मांडलेल्या विचाराचा धागा पकडून एकमेकांची तोंडे न बघणारे दक्षिण तालुक्यातील नेतेही एकत्रित आल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला. जिल्ह्यात गट तटाचे राजकारण १९८० मध्ये सुरू झाले. तालुक्यात राजकारण कधी बळीराम साठे, कधी ब्रह्मदेवदादा तर कधी गंगाराम घोडके सरकारसोबत काम केल्याचे शिंदे यांनी सांगितले.  कष्टकºयांसाठी लढणाºया ब्रह्मदेवदादांनी बँक, शिक्षण संस्था उभारली, दिलीपरावांनी त्यात भरच टाकली असे आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी यावेळी सांगितले. परिणामाची पर्वा न करता घेतलेल्या निर्णयाशी दादा पक्के असायचे असेही आ. म्हेत्रे म्हणाले. सत्तेला नमस्कार करणारे अनेक राजकारणात आहेत, सत्ता नसताना आज माझ्यासोबत आहात, दादांसोबतही होता, असे भावूकपणे माजी आ. दिलीप माने यांनी सांगितले. पृथ्वीराज माने यांनी दादांनी उभारलेला समाज परिवर्तनाचा लढा पुढे सुरू ठेवू या, असे यावेळी बोलताना सांगितले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले, आ. प्रणिती शिंदे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे, प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, जयश्री माने, माजी महापौर अलका राठोड, सुशीला आबुटे, जयकुमार माने, धनंजय भोसले,  शैलजा राठोड, राजेंद्र सुपाते, प्रवीण डोंगरे, अविनाश मार्तंडे, जितेंद्र                 साठे, सुनील काटकर, शिवलिंग पाटील, चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, गोपाळ कोरे, गुरुनाथ म्हेत्रे, बाबासाहेब पाटील, भारत जाधव, विनोद भोसले, महादेव चाकोते, दिलीप कोल्हे उपस्थित होते. -------------------------दिलीपरावांमुळे एकजूटच्जि. प. चे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी दिलीपराव यांनी आता स्वभावात बदल करण्याची गरज भाषणात बोलून दाखवली होती. हा धागा पकडून सुशीलकुमार शिंदे यांनी ‘काका, आता दिलीपराव फारच बदलले आहेत. म्हणूनच दक्षिण तालुक्यातील सर्वच मंडळी या व्यासपीठावर दिसत असल्याचे सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे