शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

तीन महिन्यांनंतरही बंधाऱ्यावरचे कठडे अन् रस्त्यांना मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST

वैराग : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते व बंधाऱ्याचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. ते ...

वैराग : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते व बंधाऱ्याचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. ते तत्काळ बसवावेत, अशी मागणी सभापती अनिल भोसले यांनी आमदार राजेंद्र राऊत व मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

तीन महिन्यांपूर्वी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत वैराग परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी बंधारे व छोटे-छोटे पाझरतलाव वाहून गेलेले आहेत. वैराग-उपळे या मार्गावर लाडोळे येथील बंधारा फुटून रस्ता वाहून गेला आहे. मोठमोठे दगड उघडे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत पुढे जावे लागते.

तसेत धामणगाव येथे नागझरी नदीवरील बंधाऱ्यांचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. हा बंधारा कोल्हापूर पद्धतीचा असून तीन मीटर अरुंद आहे. येथे लक्ष थोडेजरी विचलित झाले तर मोठा अनर्थ घडू शकतो. हे संरक्षक कठडे तत्काळ बसवावेत.

त्याचबरोबर जवळगाव मध्यम प्रकल्पामुळे येथे ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांची वाहने या भागात ऊस तोडणीसाठी आलेली आहेत. आंबेगाव, कासारी, जवळगाव, मिर्झनपूर, भालगाव, आंबाईची, ज्योतिबाची, चिंचखोपन येथून ट्रक, ट्रँक्टर अशी जड वाहने या मार्गावरून ऊस वाहतूक करतात. हा रस्ता संपूर्णपणे उखडून गेला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता दुरुस्त करावा, अशीही मागणी सभापती अनिल डिसले यांनी केले आहे. याशिवाय वैराग - मोहळ, वैराग - माढा, वैराग - तुळजापूर रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी डिसले यांनी आमदार राऊत व मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

---

फोटो : २९ बंधारा

धामणगाव येथे नागझरी नदीवरील बंधाऱ्यांचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत.