शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

तीन महिन्यांनंतरही बंधाऱ्यावरचे कठडे अन् रस्त्यांना मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST

वैराग : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते व बंधाऱ्याचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. ते ...

वैराग : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते व बंधाऱ्याचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. ते तत्काळ बसवावेत, अशी मागणी सभापती अनिल भोसले यांनी आमदार राजेंद्र राऊत व मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

तीन महिन्यांपूर्वी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत वैराग परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी बंधारे व छोटे-छोटे पाझरतलाव वाहून गेलेले आहेत. वैराग-उपळे या मार्गावर लाडोळे येथील बंधारा फुटून रस्ता वाहून गेला आहे. मोठमोठे दगड उघडे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत पुढे जावे लागते.

तसेत धामणगाव येथे नागझरी नदीवरील बंधाऱ्यांचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. हा बंधारा कोल्हापूर पद्धतीचा असून तीन मीटर अरुंद आहे. येथे लक्ष थोडेजरी विचलित झाले तर मोठा अनर्थ घडू शकतो. हे संरक्षक कठडे तत्काळ बसवावेत.

त्याचबरोबर जवळगाव मध्यम प्रकल्पामुळे येथे ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांची वाहने या भागात ऊस तोडणीसाठी आलेली आहेत. आंबेगाव, कासारी, जवळगाव, मिर्झनपूर, भालगाव, आंबाईची, ज्योतिबाची, चिंचखोपन येथून ट्रक, ट्रँक्टर अशी जड वाहने या मार्गावरून ऊस वाहतूक करतात. हा रस्ता संपूर्णपणे उखडून गेला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता दुरुस्त करावा, अशीही मागणी सभापती अनिल डिसले यांनी केले आहे. याशिवाय वैराग - मोहळ, वैराग - माढा, वैराग - तुळजापूर रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी डिसले यांनी आमदार राऊत व मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

---

फोटो : २९ बंधारा

धामणगाव येथे नागझरी नदीवरील बंधाऱ्यांचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत.