शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांनंतरही बंधाऱ्यावरचे कठडे अन् रस्त्यांना मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST

वैराग : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते व बंधाऱ्याचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. ते ...

वैराग : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते व बंधाऱ्याचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. ते तत्काळ बसवावेत, अशी मागणी सभापती अनिल भोसले यांनी आमदार राजेंद्र राऊत व मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

तीन महिन्यांपूर्वी अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत वैराग परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी बंधारे व छोटे-छोटे पाझरतलाव वाहून गेलेले आहेत. वैराग-उपळे या मार्गावर लाडोळे येथील बंधारा फुटून रस्ता वाहून गेला आहे. मोठमोठे दगड उघडे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करीत पुढे जावे लागते.

तसेत धामणगाव येथे नागझरी नदीवरील बंधाऱ्यांचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. हा बंधारा कोल्हापूर पद्धतीचा असून तीन मीटर अरुंद आहे. येथे लक्ष थोडेजरी विचलित झाले तर मोठा अनर्थ घडू शकतो. हे संरक्षक कठडे तत्काळ बसवावेत.

त्याचबरोबर जवळगाव मध्यम प्रकल्पामुळे येथे ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांची वाहने या भागात ऊस तोडणीसाठी आलेली आहेत. आंबेगाव, कासारी, जवळगाव, मिर्झनपूर, भालगाव, आंबाईची, ज्योतिबाची, चिंचखोपन येथून ट्रक, ट्रँक्टर अशी जड वाहने या मार्गावरून ऊस वाहतूक करतात. हा रस्ता संपूर्णपणे उखडून गेला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता दुरुस्त करावा, अशीही मागणी सभापती अनिल डिसले यांनी केले आहे. याशिवाय वैराग - मोहळ, वैराग - माढा, वैराग - तुळजापूर रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी डिसले यांनी आमदार राऊत व मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

---

फोटो : २९ बंधारा

धामणगाव येथे नागझरी नदीवरील बंधाऱ्यांचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत.