शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपत आला तरी उजनी ८३ टक्क्यांवर रेंगाळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:24 IST

सोलापूर जिल्ह्यासह पुणे व नगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणारे उजनी धरण ४० वर्षांत ३४ वेळा शंभर टक्के भरले ...

सोलापूर जिल्ह्यासह पुणे व नगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणारे उजनी धरण ४० वर्षांत ३४ वेळा शंभर टक्के भरले आहे. चालू वर्षी मात्र पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटात दमदार पाऊस झाला नसल्याने उजनी धरण भरण्यास वेळ लागत आहे. शेतकरी व साखर कारखानदारीच्या दृष्टीने ही काळजीची बाब आहे. मात्र, उजनी धरणाच्या वरील बाजूस भीमा नदीवर असलेली पुणे जिल्ह्यातील दोन- तीन धरणे वगळता बहुतेक धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर परतीच्या पावसाने थोडा जोर धरला तरी उजनीच्या वरील धरणे भरल्याने ते पाणी सरळ उजनी धरणात येऊ शकेल व उजनी शंभर टक्के भरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

उजनी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ एवढी प्रचंड आहे. धरण शंभर टक्के भरले, असे आपण म्हणतो तेव्हा धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा असतो तर १११ टक्के भरलेले असते तेव्हा १२३ टीएमसी पाणीसाठा असतो. उजनी धरण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे पाणीसाठा असलेले धरण असले तरी तिसऱ्या क्रमांकाचे उपयुक्त पाणीसाठा असलेले धरण आहे. उजनी धरणाची पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसी असली तरी उपयुक्त साठा मात्र ५३.५७ टीएमसी एवढाच आहे.

सध्या उजनी धरण ८३ टक्के भरले आहे म्हणजे उपयुक्त जलसाठा ४४.४० टीएमसी एवढाच आहे. म्हणजे ५३.५७ टीएमसी एवढा उपयुक्त जलसाठा होण्यासाठी धरणात आणखी ९.१० टीएमसी पाणी येणे गरजेचे आहे.

काटेकोर नियोजन हवे

दुर्दैवाने धरण शंभर टक्के भरले नाही, तर मात्र भविष्यात धरणातील पाण्याचे शेती, औद्योगिक वसाहती तसेच पिण्यासाठी काटेकोर नियोजन होणे गरजेचे आहे. उजनी धरणातील ५३.५७ टीएमसी जलसाठ्यातूनच डाव्या व उजव्या अशा तब्बल ४३२ किमी कालव्याद्वारे जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. डाव्या कालव्याद्वारे ९६ हजार हेक्टर तर उजव्या कालव्याद्वारे ९१ हजार ८०० हेक्टर क्षेत्राला पाणी दिले जाते. याचबरोबर भीमा-सीना बोगदा योजना तसेच सीना-माढा उपसा सिंचन या योजनांद्वारे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या सर्व योजनांमुळे माढा, माळशिरस व पंढरपूर या तालुक्यांत उसाचे क्षेत्र वाढवून हरितपट्टा तयार झाला आहे. उजनी धरणाच्या पाणीसाठ्यावरच जिल्ह्यातील सुमारे ४० साखर कारखान्यांचे व त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे.