शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

पावसाळा संपत आला तरी उजनी ८३ टक्क्यांवर रेंगाळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:24 IST

सोलापूर जिल्ह्यासह पुणे व नगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणारे उजनी धरण ४० वर्षांत ३४ वेळा शंभर टक्के भरले ...

सोलापूर जिल्ह्यासह पुणे व नगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणारे उजनी धरण ४० वर्षांत ३४ वेळा शंभर टक्के भरले आहे. चालू वर्षी मात्र पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटात दमदार पाऊस झाला नसल्याने उजनी धरण भरण्यास वेळ लागत आहे. शेतकरी व साखर कारखानदारीच्या दृष्टीने ही काळजीची बाब आहे. मात्र, उजनी धरणाच्या वरील बाजूस भीमा नदीवर असलेली पुणे जिल्ह्यातील दोन- तीन धरणे वगळता बहुतेक धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर परतीच्या पावसाने थोडा जोर धरला तरी उजनीच्या वरील धरणे भरल्याने ते पाणी सरळ उजनी धरणात येऊ शकेल व उजनी शंभर टक्के भरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

उजनी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ एवढी प्रचंड आहे. धरण शंभर टक्के भरले, असे आपण म्हणतो तेव्हा धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा असतो तर १११ टक्के भरलेले असते तेव्हा १२३ टीएमसी पाणीसाठा असतो. उजनी धरण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे पाणीसाठा असलेले धरण असले तरी तिसऱ्या क्रमांकाचे उपयुक्त पाणीसाठा असलेले धरण आहे. उजनी धरणाची पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसी असली तरी उपयुक्त साठा मात्र ५३.५७ टीएमसी एवढाच आहे.

सध्या उजनी धरण ८३ टक्के भरले आहे म्हणजे उपयुक्त जलसाठा ४४.४० टीएमसी एवढाच आहे. म्हणजे ५३.५७ टीएमसी एवढा उपयुक्त जलसाठा होण्यासाठी धरणात आणखी ९.१० टीएमसी पाणी येणे गरजेचे आहे.

काटेकोर नियोजन हवे

दुर्दैवाने धरण शंभर टक्के भरले नाही, तर मात्र भविष्यात धरणातील पाण्याचे शेती, औद्योगिक वसाहती तसेच पिण्यासाठी काटेकोर नियोजन होणे गरजेचे आहे. उजनी धरणातील ५३.५७ टीएमसी जलसाठ्यातूनच डाव्या व उजव्या अशा तब्बल ४३२ किमी कालव्याद्वारे जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. डाव्या कालव्याद्वारे ९६ हजार हेक्टर तर उजव्या कालव्याद्वारे ९१ हजार ८०० हेक्टर क्षेत्राला पाणी दिले जाते. याचबरोबर भीमा-सीना बोगदा योजना तसेच सीना-माढा उपसा सिंचन या योजनांद्वारे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या सर्व योजनांमुळे माढा, माळशिरस व पंढरपूर या तालुक्यांत उसाचे क्षेत्र वाढवून हरितपट्टा तयार झाला आहे. उजनी धरणाच्या पाणीसाठ्यावरच जिल्ह्यातील सुमारे ४० साखर कारखान्यांचे व त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे.