शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा संपत आला तरी उजनी ८३ टक्क्यांवर रेंगाळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:24 IST

सोलापूर जिल्ह्यासह पुणे व नगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणारे उजनी धरण ४० वर्षांत ३४ वेळा शंभर टक्के भरले ...

सोलापूर जिल्ह्यासह पुणे व नगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणारे उजनी धरण ४० वर्षांत ३४ वेळा शंभर टक्के भरले आहे. चालू वर्षी मात्र पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटात दमदार पाऊस झाला नसल्याने उजनी धरण भरण्यास वेळ लागत आहे. शेतकरी व साखर कारखानदारीच्या दृष्टीने ही काळजीची बाब आहे. मात्र, उजनी धरणाच्या वरील बाजूस भीमा नदीवर असलेली पुणे जिल्ह्यातील दोन- तीन धरणे वगळता बहुतेक धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर परतीच्या पावसाने थोडा जोर धरला तरी उजनीच्या वरील धरणे भरल्याने ते पाणी सरळ उजनी धरणात येऊ शकेल व उजनी शंभर टक्के भरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

उजनी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ एवढी प्रचंड आहे. धरण शंभर टक्के भरले, असे आपण म्हणतो तेव्हा धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा असतो तर १११ टक्के भरलेले असते तेव्हा १२३ टीएमसी पाणीसाठा असतो. उजनी धरण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे पाणीसाठा असलेले धरण असले तरी तिसऱ्या क्रमांकाचे उपयुक्त पाणीसाठा असलेले धरण आहे. उजनी धरणाची पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसी असली तरी उपयुक्त साठा मात्र ५३.५७ टीएमसी एवढाच आहे.

सध्या उजनी धरण ८३ टक्के भरले आहे म्हणजे उपयुक्त जलसाठा ४४.४० टीएमसी एवढाच आहे. म्हणजे ५३.५७ टीएमसी एवढा उपयुक्त जलसाठा होण्यासाठी धरणात आणखी ९.१० टीएमसी पाणी येणे गरजेचे आहे.

काटेकोर नियोजन हवे

दुर्दैवाने धरण शंभर टक्के भरले नाही, तर मात्र भविष्यात धरणातील पाण्याचे शेती, औद्योगिक वसाहती तसेच पिण्यासाठी काटेकोर नियोजन होणे गरजेचे आहे. उजनी धरणातील ५३.५७ टीएमसी जलसाठ्यातूनच डाव्या व उजव्या अशा तब्बल ४३२ किमी कालव्याद्वारे जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. डाव्या कालव्याद्वारे ९६ हजार हेक्टर तर उजव्या कालव्याद्वारे ९१ हजार ८०० हेक्टर क्षेत्राला पाणी दिले जाते. याचबरोबर भीमा-सीना बोगदा योजना तसेच सीना-माढा उपसा सिंचन या योजनांद्वारे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या सर्व योजनांमुळे माढा, माळशिरस व पंढरपूर या तालुक्यांत उसाचे क्षेत्र वाढवून हरितपट्टा तयार झाला आहे. उजनी धरणाच्या पाणीसाठ्यावरच जिल्ह्यातील सुमारे ४० साखर कारखान्यांचे व त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे.