शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

पावसाळा संपत आला तरी उजनी ८३ टक्क्यांवर रेंगाळले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:24 IST

सोलापूर जिल्ह्यासह पुणे व नगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणारे उजनी धरण ४० वर्षांत ३४ वेळा शंभर टक्के भरले ...

सोलापूर जिल्ह्यासह पुणे व नगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलवणारे उजनी धरण ४० वर्षांत ३४ वेळा शंभर टक्के भरले आहे. चालू वर्षी मात्र पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटात दमदार पाऊस झाला नसल्याने उजनी धरण भरण्यास वेळ लागत आहे. शेतकरी व साखर कारखानदारीच्या दृष्टीने ही काळजीची बाब आहे. मात्र, उजनी धरणाच्या वरील बाजूस भीमा नदीवर असलेली पुणे जिल्ह्यातील दोन- तीन धरणे वगळता बहुतेक धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर परतीच्या पावसाने थोडा जोर धरला तरी उजनीच्या वरील धरणे भरल्याने ते पाणी सरळ उजनी धरणात येऊ शकेल व उजनी शंभर टक्के भरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

उजनी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता १२३ एवढी प्रचंड आहे. धरण शंभर टक्के भरले, असे आपण म्हणतो तेव्हा धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा असतो तर १११ टक्के भरलेले असते तेव्हा १२३ टीएमसी पाणीसाठा असतो. उजनी धरण महाराष्ट्रातील सर्वांत मोठे पाणीसाठा असलेले धरण असले तरी तिसऱ्या क्रमांकाचे उपयुक्त पाणीसाठा असलेले धरण आहे. उजनी धरणाची पाणीसाठवण क्षमता १२३ टीएमसी असली तरी उपयुक्त साठा मात्र ५३.५७ टीएमसी एवढाच आहे.

सध्या उजनी धरण ८३ टक्के भरले आहे म्हणजे उपयुक्त जलसाठा ४४.४० टीएमसी एवढाच आहे. म्हणजे ५३.५७ टीएमसी एवढा उपयुक्त जलसाठा होण्यासाठी धरणात आणखी ९.१० टीएमसी पाणी येणे गरजेचे आहे.

काटेकोर नियोजन हवे

दुर्दैवाने धरण शंभर टक्के भरले नाही, तर मात्र भविष्यात धरणातील पाण्याचे शेती, औद्योगिक वसाहती तसेच पिण्यासाठी काटेकोर नियोजन होणे गरजेचे आहे. उजनी धरणातील ५३.५७ टीएमसी जलसाठ्यातूनच डाव्या व उजव्या अशा तब्बल ४३२ किमी कालव्याद्वारे जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा केला जातो. डाव्या कालव्याद्वारे ९६ हजार हेक्टर तर उजव्या कालव्याद्वारे ९१ हजार ८०० हेक्टर क्षेत्राला पाणी दिले जाते. याचबरोबर भीमा-सीना बोगदा योजना तसेच सीना-माढा उपसा सिंचन या योजनांद्वारे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या सर्व योजनांमुळे माढा, माळशिरस व पंढरपूर या तालुक्यांत उसाचे क्षेत्र वाढवून हरितपट्टा तयार झाला आहे. उजनी धरणाच्या पाणीसाठ्यावरच जिल्ह्यातील सुमारे ४० साखर कारखान्यांचे व त्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी व कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे.