शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

जिल्ह्यात मघा नक्षत्राचा सर्वदूर पाऊस, खरिपाला दिलासा : शेतकरी वर्ग सुखावला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 14:52 IST

सोलापूर दि २१ : अनेक दिवसांनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने मघा नक्षत्रात शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या या पावसाची रिपरिप रविवारी सकाळपर्यंत सुरुच होती. मघा नक्षत्राच्या पावसाने शेतकºयांसह खरिपाला दिलासा दिला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत बसलेला बळीराजा या पावसाने सुखावला आहे. सोलापूर शहरातही मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : अनेक दिवसांनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने मघा नक्षत्रात शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या या पावसाची रिपरिप रविवारी सकाळपर्यंत सुरुच होती. मघा नक्षत्राच्या पावसाने शेतकºयांसह खरिपाला दिलासा दिला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत बसलेला बळीराजा या पावसाने सुखावला आहे. सोलापूर शहरातही मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, बार्शी, माढा, मोहोळ, अक्कलकोट, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली आहे. भिज पाऊस म्हणून मघाने लावलेल्या हजेरीने शेतकºयांच्या चेहºयावर कमी प्रमाणात का होईना आनंद दिसत आहे. जूनच्या पहिल्या सप्ताहानंतर पडलेल्या पावसाने दडी मारली. पाऊस थांबल्याने गावागावांमधील विहिरी आटू लागल्या होत्या तर हातातोंडाला आलेली पिके माना टाकू लागल्या होत्या. या पावसाने नाले, ओढे, विहिरीत पाणी आले असून, खरीप पिकांना तूर्त तरी जीवदान मिळाले आहे. -----------------सांगोल्यात सर्वत्र संततधार सांगोला : ‘अखेर’ मघा नक्षत्र पावले असून, शनिवारी मध्यरात्रीपासून सांगोला शहर व तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती़ या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा तर मिळालाच पण रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. १२ तासांहून अधिक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. बैलपोळा सणाच्या पूर्वसंध्येला मघा नक्षत्राचा पाऊस पडल्यामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मघा नक्षत्र २८ आॅगस्टपर्यंत असल्याने या कालावधीत पर्जन्यवृष्टी होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने वर्तवले आहे. -----------------मोहोळमध्ये शेतकरी आनंदीमोहोळ : दीर्घ विश्रांतीनंतर तालुक्यात सर्वदूर पडलेल्या मघा नक्षत्राच्या पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उडीद, मका, तूर, सोयाबीन आदी खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मृग नक्षत्राच्या दमदार सुरुवातीनंतर दोन वर्षांच्या दुष्काळाच्या झळा विसरायला लावल्या होत्या. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी मशागती करून ठेवल्या होत्या. काहींनी खरीप पेरण्या केल्या तर काही शेतकºयांनी उसाची जोरदार तयारी केली होती. काही शेतकºयांनी कांद्याची रोपे टाकली आहेत. सध्या कांद्याचा चढता भाव लक्षात घेता कांद्याची जास्तीत जास्त लागवड होईल हा अंदाज करीत तसे नियोजन केले होते .--------------अक्कलकोटमध्ये २३ मि. मी. पाऊसअक्कलकोट : शनिवारी रात्रीपासून अक्कलकोट शहर व तालुक्यात झालेल्या रिमझिम पावसाने बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तडवळे मंडळात सर्वाधिक २३ मि़मी़ पावसाची तर करजगी मंडळात केवळ दोन मि़मी़ पावसाची नोंद झाली असून, रविवारी दिवसभर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच होती. जून महिन्यात वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने खरीप पेरणी वेळेवर झाली अन् पिकेही जोमाने आली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके माना टाकू लागल्या. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला होता. पेरणीनंतर गायब झालेल्या पावसामुळे शेतकºयांच्या हातून खरीप हंगाम निसटला असला तरी जनावरांच्या चारा-पाण्यासाठी पावसाची अत्यंत गरज होती. अक्कलकोटला १४ मि़मी़, चपळगावला १३, वागदरीला १६ मि़मी़, किणीला १५, मैंदर्गीला १३, दुधनीला १४ मि़मी़, जेऊरला ७ , तडवळे मंडळात २३ मि़मी़ तर करजगी येथे दोन मि़मी़पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान रब्बी हंगामासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचे शेतकºयांतून बोलले जात आहे. --------------माढा तालुक्यात वीजपुरवठा खंडितमाढा : शहर व परिसरात शनिवारी रात्रीपासून सुरु झालेली पावसाची रिपरिप रविवारी दिवसभर सुरु होती. माढा तालुक्यात  सर्वदूर पाऊस पडला. शनिवारी पाऊस पडत असताना तालुक्यातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. माढा शहर व परिसरातील शेतकरी पावसाची वाट पाहत बसले होते. शेतातील पिके पाण्याअभावी जळून चालले होते. शनिवार व रविवारी सरासरी २० तास पाऊस सुरु होता़ बैलपोळ्याच्या मुहूर्तावर पावसाने आगमन केल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात इतर भागातही संततधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.