शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मघा नक्षत्राचा सर्वदूर पाऊस, खरिपाला दिलासा : शेतकरी वर्ग सुखावला;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 14:52 IST

सोलापूर दि २१ : अनेक दिवसांनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने मघा नक्षत्रात शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या या पावसाची रिपरिप रविवारी सकाळपर्यंत सुरुच होती. मघा नक्षत्राच्या पावसाने शेतकºयांसह खरिपाला दिलासा दिला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत बसलेला बळीराजा या पावसाने सुखावला आहे. सोलापूर शहरातही मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : अनेक दिवसांनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने मघा नक्षत्रात शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या या पावसाची रिपरिप रविवारी सकाळपर्यंत सुरुच होती. मघा नक्षत्राच्या पावसाने शेतकºयांसह खरिपाला दिलासा दिला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत बसलेला बळीराजा या पावसाने सुखावला आहे. सोलापूर शहरातही मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, बार्शी, माढा, मोहोळ, अक्कलकोट, उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात मघा नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली आहे. भिज पाऊस म्हणून मघाने लावलेल्या हजेरीने शेतकºयांच्या चेहºयावर कमी प्रमाणात का होईना आनंद दिसत आहे. जूनच्या पहिल्या सप्ताहानंतर पडलेल्या पावसाने दडी मारली. पाऊस थांबल्याने गावागावांमधील विहिरी आटू लागल्या होत्या तर हातातोंडाला आलेली पिके माना टाकू लागल्या होत्या. या पावसाने नाले, ओढे, विहिरीत पाणी आले असून, खरीप पिकांना तूर्त तरी जीवदान मिळाले आहे. -----------------सांगोल्यात सर्वत्र संततधार सांगोला : ‘अखेर’ मघा नक्षत्र पावले असून, शनिवारी मध्यरात्रीपासून सांगोला शहर व तालुक्यात पावसाची संततधार सुरू होती़ या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा तर मिळालाच पण रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. १२ तासांहून अधिक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. बैलपोळा सणाच्या पूर्वसंध्येला मघा नक्षत्राचा पाऊस पडल्यामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मघा नक्षत्र २८ आॅगस्टपर्यंत असल्याने या कालावधीत पर्जन्यवृष्टी होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने वर्तवले आहे. -----------------मोहोळमध्ये शेतकरी आनंदीमोहोळ : दीर्घ विश्रांतीनंतर तालुक्यात सर्वदूर पडलेल्या मघा नक्षत्राच्या पावसाने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उडीद, मका, तूर, सोयाबीन आदी खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मृग नक्षत्राच्या दमदार सुरुवातीनंतर दोन वर्षांच्या दुष्काळाच्या झळा विसरायला लावल्या होत्या. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी मशागती करून ठेवल्या होत्या. काहींनी खरीप पेरण्या केल्या तर काही शेतकºयांनी उसाची जोरदार तयारी केली होती. काही शेतकºयांनी कांद्याची रोपे टाकली आहेत. सध्या कांद्याचा चढता भाव लक्षात घेता कांद्याची जास्तीत जास्त लागवड होईल हा अंदाज करीत तसे नियोजन केले होते .--------------अक्कलकोटमध्ये २३ मि. मी. पाऊसअक्कलकोट : शनिवारी रात्रीपासून अक्कलकोट शहर व तालुक्यात झालेल्या रिमझिम पावसाने बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तडवळे मंडळात सर्वाधिक २३ मि़मी़ पावसाची तर करजगी मंडळात केवळ दोन मि़मी़ पावसाची नोंद झाली असून, रविवारी दिवसभर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच होती. जून महिन्यात वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने खरीप पेरणी वेळेवर झाली अन् पिकेही जोमाने आली. मात्र त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके माना टाकू लागल्या. त्यामुळे या परिसरातील शेतकरी हवालदिल झाला होता. पेरणीनंतर गायब झालेल्या पावसामुळे शेतकºयांच्या हातून खरीप हंगाम निसटला असला तरी जनावरांच्या चारा-पाण्यासाठी पावसाची अत्यंत गरज होती. अक्कलकोटला १४ मि़मी़, चपळगावला १३, वागदरीला १६ मि़मी़, किणीला १५, मैंदर्गीला १३, दुधनीला १४ मि़मी़, जेऊरला ७ , तडवळे मंडळात २३ मि़मी़ तर करजगी येथे दोन मि़मी़पावसाची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने बळीराजा सुखावला आहे. दरम्यान रब्बी हंगामासाठी मोठ्या पावसाची गरज असल्याचे शेतकºयांतून बोलले जात आहे. --------------माढा तालुक्यात वीजपुरवठा खंडितमाढा : शहर व परिसरात शनिवारी रात्रीपासून सुरु झालेली पावसाची रिपरिप रविवारी दिवसभर सुरु होती. माढा तालुक्यात  सर्वदूर पाऊस पडला. शनिवारी पाऊस पडत असताना तालुक्यातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. माढा शहर व परिसरातील शेतकरी पावसाची वाट पाहत बसले होते. शेतातील पिके पाण्याअभावी जळून चालले होते. शनिवार व रविवारी सरासरी २० तास पाऊस सुरु होता़ बैलपोळ्याच्या मुहूर्तावर पावसाने आगमन केल्याने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात इतर भागातही संततधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.