शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शत्रूबी व्हतोय दोस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:09 IST

विधानसभा निवडणूक; राजकीय टोलेबाजी

विलास जळकोटकर

राम राम मंडळी... आपल्या मºहाठी भाषेत एक म्हणय. ‘उचलली जीभ लावली टाळंला’ असंच काहीसं आपल्या जिल्ह्यात घडू लागलंय.एकतर आचारसंहिता लागू व्हायच्या पूर्वीपासून नुसता घोळ, घोळ अन् घोळ सुरुय. काल उमेदवारी दाखल करण्यापर्यंत हा गोंधळ सुरुच आहे. इलेक्शनचा घमसान आता वाढू लागलाय पारावरच्या कट्ट्यावर..., चहाच्या कँटीनवर... पानटपरी अन् सलूनमध्ये आता निवडणुकीच्या गप्पांत रंंग भरू लागलाय.  निवडणुकीच्या निमित्ताने अनेक किस्से, गमती-जमती घडू लागल्या आहेत.चला तर बघू काय चाललंय ...

अण्णा: राम राम तात्या... काय म्हनतंय इलेक्शन.तात्या:  अरं कशाचं काय समदीकडं धुसफूस चाललीय. कोनबी कुनाचा ऐकंना झालंय बग.अण्णा: अरं असंच असनार. समद्यालाच आता खुर्चीचं डव्हाळ लागलंय. तात्या:  अरं पन एवढ्या खुर्च्या आनायच्या कुठून(मध्येच नामू माळी म्हनतो कसा)नामू :  काय बी म्हना तात्या, औंदा समद्याच पुढाºयाची पंचायत झाली बग. तिकडं त्या भगवंताच्या बार्शीत ‘तू बडा मै बडा’ म्हणत कोणबी मागं हटलं नाह्य. जोरात घमशान हाय बग. मज्जाय बाबा तितं.तात्या:  त्ये खरं हाय रं, पन करमाळ्याच्या सैराट नगरात बी काय कमी घोळ नाह्य. भगवा घिऊन दिदीनं बाजी मारल्याय तर मामा आन् पैलवानांनी बी शड्डू ठोकलाय लेका. लई जोरात तिरंगी कुस्ती व्हनाराय म्हणत्यात तिकडं.अण्णा : ये वेड्या, तिरंगी नव्हं चौरंगी कुस्ती व्हनारं. (मध्येच तोंड खुपसत खालच्या आळीचा महादू पचकला)महादू: चवथा कोण वं अण्णा. अण्णा: आरं पल्लेदार मिशीवालं जयवंतरावतात्या/महादू: (एकाचवेळी) आरं तिच्या विसरलाव की.अण्णा: आरं तितलं राजकारनच येगळं हा बाबानू.तात्या: ये अण्णा तितलंच काय समदीकडं असंच असतंय. अण्णा: मर्दानू औंदाचं राजकारन येगळं झालय बग. कोन कुनावर मात करल आन् कोण चित व्हईल हे सांगणं कठीन हाय बग.तात्या: आता ह्येच बग की, गेल्या येळंला डोक्यावरच्या पांढºया टोप्या आन् उपरणं औंदा बदललंय का नाह्य.अण्णा: अरं मर्दानू मी त्येच सांगतूय. सारा पैशाचा आन् खुर्चीचा  खेळ हाय. तुमची-आमची कुनाला काय पडली नाह्य बगा.तात्या: त्यला जबाबदार बी आपुनच हाव. अण्णा: जाऊ द्या रं. समदे एकच असत्यात. आपल्याला येडं करत्यात. आता बग की, कालपतोर गळ्यात गळा घालून फिरणारी अण्णा, तात्या, नाना, आप्पा ही मंडळीची तोंडं तिकीट नाही मिळाली की कशी गरकन फिरल्याती. ज्यचं कधी जमलं ती बी सेल्फी दिऊन खोटं खोटं हसा लागल्याती. त्ये खरं हाय बाबा. राजकारनात कालचा शत्रू आजचा दोस्तबी व्हतो. जाऊ द्या आपल्याला काय करायचय. महादू (आळस देत) लई कट्टाळा आलाय बाबा. चला आता फक्कड चहा मारू म्हणतच कँटीनकडे वळतात....)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण