शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

शत्रूबी व्हतोय दोस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:09 IST

विधानसभा निवडणूक; राजकीय टोलेबाजी

विलास जळकोटकर

राम राम मंडळी... आपल्या मºहाठी भाषेत एक म्हणय. ‘उचलली जीभ लावली टाळंला’ असंच काहीसं आपल्या जिल्ह्यात घडू लागलंय.एकतर आचारसंहिता लागू व्हायच्या पूर्वीपासून नुसता घोळ, घोळ अन् घोळ सुरुय. काल उमेदवारी दाखल करण्यापर्यंत हा गोंधळ सुरुच आहे. इलेक्शनचा घमसान आता वाढू लागलाय पारावरच्या कट्ट्यावर..., चहाच्या कँटीनवर... पानटपरी अन् सलूनमध्ये आता निवडणुकीच्या गप्पांत रंंग भरू लागलाय.  निवडणुकीच्या निमित्ताने अनेक किस्से, गमती-जमती घडू लागल्या आहेत.चला तर बघू काय चाललंय ...

अण्णा: राम राम तात्या... काय म्हनतंय इलेक्शन.तात्या:  अरं कशाचं काय समदीकडं धुसफूस चाललीय. कोनबी कुनाचा ऐकंना झालंय बग.अण्णा: अरं असंच असनार. समद्यालाच आता खुर्चीचं डव्हाळ लागलंय. तात्या:  अरं पन एवढ्या खुर्च्या आनायच्या कुठून(मध्येच नामू माळी म्हनतो कसा)नामू :  काय बी म्हना तात्या, औंदा समद्याच पुढाºयाची पंचायत झाली बग. तिकडं त्या भगवंताच्या बार्शीत ‘तू बडा मै बडा’ म्हणत कोणबी मागं हटलं नाह्य. जोरात घमशान हाय बग. मज्जाय बाबा तितं.तात्या:  त्ये खरं हाय रं, पन करमाळ्याच्या सैराट नगरात बी काय कमी घोळ नाह्य. भगवा घिऊन दिदीनं बाजी मारल्याय तर मामा आन् पैलवानांनी बी शड्डू ठोकलाय लेका. लई जोरात तिरंगी कुस्ती व्हनाराय म्हणत्यात तिकडं.अण्णा : ये वेड्या, तिरंगी नव्हं चौरंगी कुस्ती व्हनारं. (मध्येच तोंड खुपसत खालच्या आळीचा महादू पचकला)महादू: चवथा कोण वं अण्णा. अण्णा: आरं पल्लेदार मिशीवालं जयवंतरावतात्या/महादू: (एकाचवेळी) आरं तिच्या विसरलाव की.अण्णा: आरं तितलं राजकारनच येगळं हा बाबानू.तात्या: ये अण्णा तितलंच काय समदीकडं असंच असतंय. अण्णा: मर्दानू औंदाचं राजकारन येगळं झालय बग. कोन कुनावर मात करल आन् कोण चित व्हईल हे सांगणं कठीन हाय बग.तात्या: आता ह्येच बग की, गेल्या येळंला डोक्यावरच्या पांढºया टोप्या आन् उपरणं औंदा बदललंय का नाह्य.अण्णा: अरं मर्दानू मी त्येच सांगतूय. सारा पैशाचा आन् खुर्चीचा  खेळ हाय. तुमची-आमची कुनाला काय पडली नाह्य बगा.तात्या: त्यला जबाबदार बी आपुनच हाव. अण्णा: जाऊ द्या रं. समदे एकच असत्यात. आपल्याला येडं करत्यात. आता बग की, कालपतोर गळ्यात गळा घालून फिरणारी अण्णा, तात्या, नाना, आप्पा ही मंडळीची तोंडं तिकीट नाही मिळाली की कशी गरकन फिरल्याती. ज्यचं कधी जमलं ती बी सेल्फी दिऊन खोटं खोटं हसा लागल्याती. त्ये खरं हाय बाबा. राजकारनात कालचा शत्रू आजचा दोस्तबी व्हतो. जाऊ द्या आपल्याला काय करायचय. महादू (आळस देत) लई कट्टाळा आलाय बाबा. चला आता फक्कड चहा मारू म्हणतच कँटीनकडे वळतात....)

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण