शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

रोजगार एक राष्ट्रीय समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 19:20 IST

देशाची राज्यघटना म्हणजे संविधान हे आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचे कल्याण करण्यासाठीच लिहिले आहे.

ठळक मुद्देरोजगाराचा संबंध जसा माणसाच्या विकासाशी आहे तसाच तो देशाच्या विकासाशीही आहेमाणूस आपला व आपल्या कुटुंबाचा विकास रोजगारामुळे करु शकतो

डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाची राज्यघटना म्हणजे संविधान हे आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाचे कल्याण करण्यासाठीच लिहिले आहे. हे संविधानाच्या उद्देशिकेतून समजून येते़ संविधानाच्या या उद्देशिकेमध्ये सर्व नागरिकांस न्याय, स्वातंत्र्य व समता देण्याचा संकल्प केलेला आहे. संविधानाचे कोणतेही पान वाचले तर त्यामध्ये लोककल्याणाचाच विचार ओतप्रोत भरलेला आढळून येतो. परंतु सदर लेख हा रोजगाराविषयीचा असल्याने समता या तत्वावर विचार करु़ देशामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी दर्जाची व संधीची समानता प्रत्येक नागरिकास मिळाली पाहिजे, अशी तरतूद संविधानात केलेली आहे. यामधील भाग चार ‘राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे’ या भागामध्ये ३८ ते ५१ कलमांचा अंतर्भाव आहे.

यामधील कलम ३८ (२) मध्ये राज्य हे उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता किमान पातळीवर आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करील आणि दर्जा, सुविधा व संधी यांच्याबाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे नमूद केले आहे़ सरकार रोजगार निर्मिती करते आहे काय? तर या प्रश्नाचे उत्तर कोणीही ‘नाही’ असेच देईल. संविधानातील लोककल्याणाची संकल्पना ही रोजगाराशिवाय सत्यात येऊच शकत नाही, हे विधान कोणीही खोडू शकणार नाही. आजच्या घडीला घराघरांत बेरोजगार मुले-मुली नैराश्याचे जीवन जगत आहेत. रोजगार नसल्यामुळे त्यांचे अतोनात हाल होताहेत.

दुसरीकडे प्रचंड महागाई वाढत आहे आणि रोजगार नसल्यामुळे, उत्पन्नाचे सारे मार्ग बंद झाल्यामुळे अशा महागाईच्या काळात लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. रोजगाराचा आणि माणसाच्या विकासाचा अत्यंत घनिष्ठ असा संबंध आहे. रोजगार असेल तर तो चांगल्या प्रकारचे अन्न खाऊ शकतो, चांगले पक्के घर बांधू शकतो, मुलांना चांगले शिक्षण देऊ शकतो, चार पैसे कमावू शकतो. अशाप्रकारे माणूस आपला व आपल्या कुटुंबाचा विकास रोजगारामुळे करु शकतो. माणसाचा विकास म्हणजे समाजाचा विकास, समाजाचा विकास म्हणजेच देशाचा विकास आहे. त्यामुळे रोजगाराचा संबंध जसा माणसाच्या विकासाशी आहे तसाच तो देशाच्या विकासाशीही आहे.

आपल्या देशाच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही बहुजनांची आहे, जी एससी/ एसटी/व्हीजेएनटी/ओबीसी/एसबीसी या संवर्गात समाविष्ट करुन डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांना आरक्षण व सवलती दिल्या. आजच्या घडीला वरील संवर्गातील, जाती-जमातीतील बहुजनांची जी शैक्षणिक व आर्थिक प्रगती झाली आहे ती केवळ संविधानातील आरक्षणाच्या तरतुदीमुळे झाली आहे.

आरक्षणामुळे शिक्षण मिळाले व शिक्षणामुळे रोजगार मिळाला आणि त्या रोजगारामुळेच बहुजनांची आर्थिक प्रगती झाली, हे आधी सर्वांनी समजून घ्यावे. म्हणजे रोजगार आहे तर विकास आहे, प्रगती आहे तर मग सरकार रोजगार निर्मिती का करत नाही ? यामागचे सत्य आपापल्या परीने समजून घेण्याचा प्रयत्न करावा. सरकार रोजगार निर्मिती करण्याऐवजी शासकीय कार्यालयातील आहे ती मंजूर पदे आकृतिबंध या गोंडस नावाखाली कमी करत आहे़ ही पदे कमी करण्याच्या कार्यक्रमाला आस्थापनेचा खर्च प्रचंड वाढला आहे व तो खर्च कमी करण्यासाठी आकृतिबंध राबवित आहे, असे कारण देत आहे़ अशाप्रकारे सरकारने रोजगार निर्मितीचा प्रश्नच निकालात काढला आहे.

आजमितीस कमी मनुष्यबळावर शासनाचे कामकाज सुरू आहे़ रोजगार नसल्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत़ या एवढ्या गंभीर समस्येकडे सरकारी कर्मचाºयांच्या संघटनांचेही लक्ष नसल्याचे दिसते आहे़ उलट सरकारच्या धोरणांविरोधात सरकारला धारेवर धरण्याचे काम कर्मचाºयांच्या संघटनांनी करणे लोकशाही सुदृढीकरणासाठी आवश्यक असते़ मात्र सध्या कर्मचाºयांच्या संघटनाही शांत आहेत जसे की सगळे आलबेल चालले आहे.

-मनीष बलभीम सुरवसे(लेखक हे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सचिव आहेत) 

टॅग्स :Solapurसोलापूरjobनोकरी