शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सोलापूर बाजार समितीची निवडणुक दिलेल्या मुदतीत होणार नाही , जिल्हा उपनिबंधकांनी प्राधिकरणाला कळविले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 16:11 IST

सोलापूर, बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हरकतीपासून ते निकालापर्यंत ७० दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक प्राधिकरणाला पाठवली आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.सोलापूर बाजार समितीची १६ एप्रिल व बार्शी बाजार समितीची निवडणूक ११ मार्चपर्यंत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेतआता बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतपत्रिका की ई.व्ही.एम. मशीनद्वारे मतदान होणार?

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : सोलापूर, बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हरकतीपासून ते निकालापर्यंत ७० दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक प्राधिकरणाला पाठवली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.सोलापूर बाजार समितीची १६ एप्रिल व बार्शी बाजार समितीची निवडणूक ११ मार्चपर्यंत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका होणार नाहीत, हे आता स्पष्ट दिसत असल्याने निवडणुका कधी होणार?, हे उच्च न्यायालयाला सांगावे लागणार आहे. मतदार यादीबाबत नियमावली नुकतीच आल्याने अद्याप प्रारुप मतदार यादीही तयार नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी अंदाजे किती कालावधी लागणार, हे कळविण्याच्या सूचना निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधकांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी साधारण मतदार यादीवर हरकतीपासून निवडणूक निकाल लागेपर्यंत ७० दिवस लागतील, असे कळविले आहे. निवडणूक प्राधिकरण यानुसार उच्च न्यायालयासमोर ही बाजू मांडणार आहे. ----------------------असा असेल कालावधी- प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर १० दिवस हरकतीसाठी, आलेल्या हरकतींवर सुनावणी घेणे व निर्णय देण्यासाठी १० दिवस, पाच दिवस अंतिम मतदार याद्या तयार करण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. निवडणूक प्राधिकरणाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी १० दिवसांचा कालावधी ठेवला असून, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पाच दिवस, सहाव्या दिवशी छाननी, ७ व्या दिवशी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी १५ दिवस, एक दिवस निवडणूक लढविणाºया उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, ७ ते १५ दिवसांनंतर मतदान व तीन दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे, असा अंदाजे निवडणूक कार्यक्रम प्राधिकरणाला पाठविला आहे. -------------------ई.व्ही.एम. मशीनचा होणार वापर?- लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ई.व्ही.एम. मशीनचा वापर करण्यात आला होता. आजपर्यंतच्या मतपत्रिकेद्वारे होणाºया या निवडणुका मशीनद्वारे होत असल्याने आता बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतपत्रिका की ई.व्ही.एम. मशीनद्वारे मतदान होणार?, याचा निर्णय झालेला नाही. निवडणूक प्राधिकरणाकडे याबाबत चौकशी केली असता मतदारांच्या संख्येवर निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती