शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अवकाळीच्या अतिवृष्टीमुळे डाळिंब, केळीच्या बागा भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

पंढरपूर : मान्सून दाखल होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी असला तरी शनिवारी वादळी वा-यासह झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार अवकाळी ...

पंढरपूर : मान्सून दाखल होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी असला तरी शनिवारी वादळी वा-यासह झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार अवकाळी पावसामुळे शेळवे, वाखरी परिसरातील डाळिंब, केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. या पावसात बेदाणा शेडवरील कागद उडून बेदाणा भिजल्याने शेकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्याचे तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

यावर्षीचा पावसाळा सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वीच मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील १५ दिवसांत सलग दुस-यांदा वादळी वा-यासह मुसळधार अवकाळी पाऊस झाला आहे. हा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेळवे येथील तात्यासाहेब सरडे, तुकाराम गाजरे, विकास आसबे या शेतक-यांच्या केळीच्या बाग उन्मळून पडल्या आहेत. याशिवाय वाखरी, भंडीशेगाव, गादेगाव, पटवर्धन कुरोली, कासेगाव, करकंब, भाळवणी, टाकळी, बोहाळी परिसरातील गावांमध्ये केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. वा-यामुळे काही केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे हातातोंडाला आलेला घास हिरावल्याने केळी उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

---

डाळींबाची फळे गळाली

१ जूनपासून बाजार समित्या सुरू होतील, अशी शक्यता असताना त्यापूर्वीच वादळीवारे व अवकाळी पावसाने डाळिंबाची फळे गळून पडली आहेत. अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे खुल्या बाजारात स्वत:चा माल विकता आला नाही म्हणूण काही शेतक-यांचा बेदाणा निर्मितीकडे कल आहे. अनेकांनी आपल्या बागा उतरून बेदाण्यासाठी पत्रा शेडमध्ये माल टाकला आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे या पत्रा शेडवरील पत्रे, प्लास्टिक कागद उडून गेल्यामुळे बेदाणा भिजून अक्षरशा चिखल झाला आहे.

---

दोन हेक्टर केळीची बाग येत्या काही दिवसांत उतरण्यासाठी सज्ज होती. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बाग उतरली नव्हती. मात्र, शनिवारी झालेल्या अतिवृष्टी व वादळी वा-यामुळे संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली आहे. त्यातून सावरणे अवघड आहे. तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी.

- सागर गाजरे

केळी उत्पादक शेतकरी, शेळवे

--

फोटो : ३१ शेळवे, ३१ करकंब

शेळवे (ता. पंढरपूर) येथील शेतकऱ्यांचा केळीच्या बागा वादळी वारे व अतिवृष्टीमुळे अशा जमीनदोस्त झाल्या आहेत.