शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

अवकाळीच्या अतिवृष्टीमुळे डाळिंब, केळीच्या बागा भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

पंढरपूर : मान्सून दाखल होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी असला तरी शनिवारी वादळी वा-यासह झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार अवकाळी ...

पंढरपूर : मान्सून दाखल होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी असला तरी शनिवारी वादळी वा-यासह झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार अवकाळी पावसामुळे शेळवे, वाखरी परिसरातील डाळिंब, केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. या पावसात बेदाणा शेडवरील कागद उडून बेदाणा भिजल्याने शेकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्याचे तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

यावर्षीचा पावसाळा सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वीच मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील १५ दिवसांत सलग दुस-यांदा वादळी वा-यासह मुसळधार अवकाळी पाऊस झाला आहे. हा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेळवे येथील तात्यासाहेब सरडे, तुकाराम गाजरे, विकास आसबे या शेतक-यांच्या केळीच्या बाग उन्मळून पडल्या आहेत. याशिवाय वाखरी, भंडीशेगाव, गादेगाव, पटवर्धन कुरोली, कासेगाव, करकंब, भाळवणी, टाकळी, बोहाळी परिसरातील गावांमध्ये केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. वा-यामुळे काही केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे हातातोंडाला आलेला घास हिरावल्याने केळी उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

---

डाळींबाची फळे गळाली

१ जूनपासून बाजार समित्या सुरू होतील, अशी शक्यता असताना त्यापूर्वीच वादळीवारे व अवकाळी पावसाने डाळिंबाची फळे गळून पडली आहेत. अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे खुल्या बाजारात स्वत:चा माल विकता आला नाही म्हणूण काही शेतक-यांचा बेदाणा निर्मितीकडे कल आहे. अनेकांनी आपल्या बागा उतरून बेदाण्यासाठी पत्रा शेडमध्ये माल टाकला आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे या पत्रा शेडवरील पत्रे, प्लास्टिक कागद उडून गेल्यामुळे बेदाणा भिजून अक्षरशा चिखल झाला आहे.

---

दोन हेक्टर केळीची बाग येत्या काही दिवसांत उतरण्यासाठी सज्ज होती. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बाग उतरली नव्हती. मात्र, शनिवारी झालेल्या अतिवृष्टी व वादळी वा-यामुळे संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली आहे. त्यातून सावरणे अवघड आहे. तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी.

- सागर गाजरे

केळी उत्पादक शेतकरी, शेळवे

--

फोटो : ३१ शेळवे, ३१ करकंब

शेळवे (ता. पंढरपूर) येथील शेतकऱ्यांचा केळीच्या बागा वादळी वारे व अतिवृष्टीमुळे अशा जमीनदोस्त झाल्या आहेत.