शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अवकाळीच्या अतिवृष्टीमुळे डाळिंब, केळीच्या बागा भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

पंढरपूर : मान्सून दाखल होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी असला तरी शनिवारी वादळी वा-यासह झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार अवकाळी ...

पंढरपूर : मान्सून दाखल होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी असला तरी शनिवारी वादळी वा-यासह झालेल्या मान्सूनपूर्व मुसळधार अवकाळी पावसामुळे शेळवे, वाखरी परिसरातील डाळिंब, केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. या पावसात बेदाणा शेडवरील कागद उडून बेदाणा भिजल्याने शेकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्याचे तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

यावर्षीचा पावसाळा सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वीच मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील १५ दिवसांत सलग दुस-यांदा वादळी वा-यासह मुसळधार अवकाळी पाऊस झाला आहे. हा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेळवे येथील तात्यासाहेब सरडे, तुकाराम गाजरे, विकास आसबे या शेतक-यांच्या केळीच्या बाग उन्मळून पडल्या आहेत. याशिवाय वाखरी, भंडीशेगाव, गादेगाव, पटवर्धन कुरोली, कासेगाव, करकंब, भाळवणी, टाकळी, बोहाळी परिसरातील गावांमध्ये केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. वा-यामुळे काही केळीची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे हातातोंडाला आलेला घास हिरावल्याने केळी उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

---

डाळींबाची फळे गळाली

१ जूनपासून बाजार समित्या सुरू होतील, अशी शक्यता असताना त्यापूर्वीच वादळीवारे व अवकाळी पावसाने डाळिंबाची फळे गळून पडली आहेत. अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे खुल्या बाजारात स्वत:चा माल विकता आला नाही म्हणूण काही शेतक-यांचा बेदाणा निर्मितीकडे कल आहे. अनेकांनी आपल्या बागा उतरून बेदाण्यासाठी पत्रा शेडमध्ये माल टाकला आहे. मात्र वादळी वाऱ्यामुळे या पत्रा शेडवरील पत्रे, प्लास्टिक कागद उडून गेल्यामुळे बेदाणा भिजून अक्षरशा चिखल झाला आहे.

---

दोन हेक्टर केळीची बाग येत्या काही दिवसांत उतरण्यासाठी सज्ज होती. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बाग उतरली नव्हती. मात्र, शनिवारी झालेल्या अतिवृष्टी व वादळी वा-यामुळे संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली आहे. त्यातून सावरणे अवघड आहे. तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी.

- सागर गाजरे

केळी उत्पादक शेतकरी, शेळवे

--

फोटो : ३१ शेळवे, ३१ करकंब

शेळवे (ता. पंढरपूर) येथील शेतकऱ्यांचा केळीच्या बागा वादळी वारे व अतिवृष्टीमुळे अशा जमीनदोस्त झाल्या आहेत.