शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

सोलापुरची भिमाई ; तीन बुद्धविहार अन् ३३ बौद्धाचार्यांकडून होतोय जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 11:49 IST

रमाबाई आंबेडकर नगर : मीराताई, प्रकाश, आनंदराज आंबेडकर, जोगेंद्र कवाडेंनी दिल्या भेटी

ठळक मुद्देबुधवार पेठ परिसरात १९७५ साली रमाबाई आंबेडकर नगर वसले़आंबेडकरी विचाराच्या प्रेरणेतून ‘मातोश्री रमाबाई आंबेडकर वाचनालय’ सुरूभारतीय बौद्ध महासभेचे कामकाज १९८० पासून येथून चालते़

काशिनाथ वाघमारे सोलापूर : रमाबाई आंबेडकर नगरातील तीन बुद्धविहारातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर होतोय. या बुद्धविहारात ३३ बौद्धाचार्यांकडून नव्या पिढीवर संस्कार आणि धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर होत आहे. ४३ वर्षांपूर्वीच्या या नगरात मीराताई आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडेंपासून चळवळीतील अनेक नेत्यांनी या नगराला भेटी देऊन येथील आंबेडकरप्रेमींशी संवाद साधला आहे.

बुधवार पेठ परिसरात १९७५ साली रमाबाई आंबेडकर नगर वसले़ या नगराने समता सैनिक दलाचे बाबा कांबळे, माजी परिवहन सभापती मल्लप्पा शिंदे, भारतीय बौद्ध महासभेच्या शहर अध्यक्षा धम्मरक्षिता कांबळे, यशवंत साबळे, माजी नगरसेवक सुनीताताई भोसले यांच्यासह डॉक्टर, वकील, पोलीस आणि अनेक उद्योजक दिले़ या साºयांनी आपल्या नगराची वेगळी ओळख निर्माण केली आहे़ १९७८ साली पहिले तरुण मंडळ येथे अस्तित्वात आले़ आंबेडकरी विचाराच्या प्रेरणेतून ‘मातोश्री रमाबाई आंबेडकर वाचनालय’ सुरू झाले आणि आजच्या पिढीच्या जडणघडणीत ते योगदान देणारे ठरले आहे़ तसेच या नगरातील तरुणांनी बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखणारे रोजा इफ्तार पार्टी, सामुदायिक विवाह असे अनेक उपक्रम राबवित असतात़

आंबेडकर उद्यानातून संघटन - या नगराला दुसरी एक ओळख मिळाली, ती म्हणजे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर उद्याऩ १९९२ साली या उद्यानाच्या उभारणीला सुरुवात झाली़ या नगराला वेस (कमान) नसली तरी आंबेडकर उद्यान हीच सध्याची ओळख आणि प्रवेशद्वार ठरली आहे़ बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे अजित गादेकर यांनी या उद्यानाच्या दोन्ही बाजूला नवी कमान व्हावी आणि आणखी एक ओळख मिळावी म्हणून प्रयत्न करताहेत़ उद्यानात आबालवृद्धापासून सारीच मंडळी या ठिकाणी जमतात़ अनेक कार्यक्रमांची आखणी, विचारांची पेरणी या उद्यानातून होते़ त्यामुळे आंबेडकर उद्यान हे सध्या चळवळीचे संघटन केंद्र ठरले आहे.

 चळवळीचे जिल्ह्याचे केंद्रस्थान - या नगरातून अनेकांनी आपली वेगळी ओळख समाजापुढे आणली आहे़ भारतीय बौद्ध महासभेचे कामकाज १९८० पासून येथून चालते़ नामांतराच्या चळवळीत या नगरात राहणारे कै़ शिवाजी कसबे, बबन आहेरकर, मल्लप्पा शिंदे, अर्जुन गायकवाड अशा अनेक आंबेडकरप्रेमींनी सहभाग नोंदविला़ यापैकी शिवाजी कसबे आणि बबन आहेरकर यांना मथुरेत अटक करून दिल्लीच्या जेलमध्ये एक महिना ठेवण्यात आले होते़ या दोघांना झालेली ही शिक्षा समाज आज विसरू शकत नाही़ अशा अनेक चळवळींची चर्चा या नगरात आजही होते़ त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान बनले.

  • - विशेषत: शिवा-भिवा गायन पार्टी येथे तयार झाली़ राजू गायकवाड, कै़ विजय कांबळे या कलावंतांनी गाण्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार, प्रसारही केला़ याबरोबरच धम्मगंध बुद्धविहार, आम्रपाली बुद्धविहार आणि रमांजली बुद्धविहार असे तीन विहार उभे झाले़ या विहारातून बाबासाहेबांची शिकवण, विचार, आचरण, त्यांच्या कार्याची महती ३३ बौद्धाचार्यांकडून नव्या पिढीला दिली जाते आहे़ त्यांच्याकडून दररोज पाठांतर आणि विधी सोहळा होतो़
टॅग्स :Solapurसोलापूर