शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सोलापुरची भिमाई ; तीन बुद्धविहार अन् ३३ बौद्धाचार्यांकडून होतोय जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 11:49 IST

रमाबाई आंबेडकर नगर : मीराताई, प्रकाश, आनंदराज आंबेडकर, जोगेंद्र कवाडेंनी दिल्या भेटी

ठळक मुद्देबुधवार पेठ परिसरात १९७५ साली रमाबाई आंबेडकर नगर वसले़आंबेडकरी विचाराच्या प्रेरणेतून ‘मातोश्री रमाबाई आंबेडकर वाचनालय’ सुरूभारतीय बौद्ध महासभेचे कामकाज १९८० पासून येथून चालते़

काशिनाथ वाघमारे सोलापूर : रमाबाई आंबेडकर नगरातील तीन बुद्धविहारातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर होतोय. या बुद्धविहारात ३३ बौद्धाचार्यांकडून नव्या पिढीवर संस्कार आणि धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर होत आहे. ४३ वर्षांपूर्वीच्या या नगरात मीराताई आंबेडकर, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडेंपासून चळवळीतील अनेक नेत्यांनी या नगराला भेटी देऊन येथील आंबेडकरप्रेमींशी संवाद साधला आहे.

बुधवार पेठ परिसरात १९७५ साली रमाबाई आंबेडकर नगर वसले़ या नगराने समता सैनिक दलाचे बाबा कांबळे, माजी परिवहन सभापती मल्लप्पा शिंदे, भारतीय बौद्ध महासभेच्या शहर अध्यक्षा धम्मरक्षिता कांबळे, यशवंत साबळे, माजी नगरसेवक सुनीताताई भोसले यांच्यासह डॉक्टर, वकील, पोलीस आणि अनेक उद्योजक दिले़ या साºयांनी आपल्या नगराची वेगळी ओळख निर्माण केली आहे़ १९७८ साली पहिले तरुण मंडळ येथे अस्तित्वात आले़ आंबेडकरी विचाराच्या प्रेरणेतून ‘मातोश्री रमाबाई आंबेडकर वाचनालय’ सुरू झाले आणि आजच्या पिढीच्या जडणघडणीत ते योगदान देणारे ठरले आहे़ तसेच या नगरातील तरुणांनी बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखणारे रोजा इफ्तार पार्टी, सामुदायिक विवाह असे अनेक उपक्रम राबवित असतात़

आंबेडकर उद्यानातून संघटन - या नगराला दुसरी एक ओळख मिळाली, ती म्हणजे डॉ़ बाबासाहेब आंबेडकर उद्याऩ १९९२ साली या उद्यानाच्या उभारणीला सुरुवात झाली़ या नगराला वेस (कमान) नसली तरी आंबेडकर उद्यान हीच सध्याची ओळख आणि प्रवेशद्वार ठरली आहे़ बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे अजित गादेकर यांनी या उद्यानाच्या दोन्ही बाजूला नवी कमान व्हावी आणि आणखी एक ओळख मिळावी म्हणून प्रयत्न करताहेत़ उद्यानात आबालवृद्धापासून सारीच मंडळी या ठिकाणी जमतात़ अनेक कार्यक्रमांची आखणी, विचारांची पेरणी या उद्यानातून होते़ त्यामुळे आंबेडकर उद्यान हे सध्या चळवळीचे संघटन केंद्र ठरले आहे.

 चळवळीचे जिल्ह्याचे केंद्रस्थान - या नगरातून अनेकांनी आपली वेगळी ओळख समाजापुढे आणली आहे़ भारतीय बौद्ध महासभेचे कामकाज १९८० पासून येथून चालते़ नामांतराच्या चळवळीत या नगरात राहणारे कै़ शिवाजी कसबे, बबन आहेरकर, मल्लप्पा शिंदे, अर्जुन गायकवाड अशा अनेक आंबेडकरप्रेमींनी सहभाग नोंदविला़ यापैकी शिवाजी कसबे आणि बबन आहेरकर यांना मथुरेत अटक करून दिल्लीच्या जेलमध्ये एक महिना ठेवण्यात आले होते़ या दोघांना झालेली ही शिक्षा समाज आज विसरू शकत नाही़ अशा अनेक चळवळींची चर्चा या नगरात आजही होते़ त्यामुळे रमाबाई आंबेडकर नगर हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान बनले.

  • - विशेषत: शिवा-भिवा गायन पार्टी येथे तयार झाली़ राजू गायकवाड, कै़ विजय कांबळे या कलावंतांनी गाण्यातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार, प्रसारही केला़ याबरोबरच धम्मगंध बुद्धविहार, आम्रपाली बुद्धविहार आणि रमांजली बुद्धविहार असे तीन विहार उभे झाले़ या विहारातून बाबासाहेबांची शिकवण, विचार, आचरण, त्यांच्या कार्याची महती ३३ बौद्धाचार्यांकडून नव्या पिढीला दिली जाते आहे़ त्यांच्याकडून दररोज पाठांतर आणि विधी सोहळा होतो़
टॅग्स :Solapurसोलापूर