शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

सोलापूरात डेंग्यूचा विळखा तरीही प्रशासनाकडून आकड्यांची धूळफेक, खासगी पॅथॉलॉजीतील नोंदी कुठे गेल्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 13:21 IST

एकीकडे रुग्णालयात दिसणारी गर्दी आणि दुसरीकडे सरकारी कागदांवरील नगन्य आकडा पाहता ही धूळफेक नेमकी आहे तरी कशासाठी, असा प्रश्न आता पडायला लागला आहे.

ठळक मुद्देवर्षभरात फक्त २१६ लोकांनाच डेंग्यू झाल्याची नोंद सरकारी कागदांवरील नगन्य आकडा पाहता ही धूळफेक नेमकी आहे तरी कशासाठीसंपूर्ण जिल्ह्याला डेंग्यूचा विळखा पडल्यासारखी स्थिती

गोपालकृष्ण मांडवकरसोलापूर दि ७ : संपूर्ण जिल्ह्याला डेंग्यूचा विळखा पडल्यासारखी स्थिती आहे. मागील चार महिन्यांपासून सर्व दवाखाने डेंग्यू, चिकन गुनियाच्या रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. स्वाईन फ्लूसारख्या आजाराने आतापर्यंत पाच जण दगावले आहेत. खुद्द एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यूही या आजाराने झाला आहे. असे असले तरी आरोग्य विभागाच्या कागदावर मात्र वर्षभरात फक्त २१६ लोकांनाच डेंग्यू झाल्याची नोंद आहे. एकीकडे रुग्णालयात दिसणारी गर्दी आणि दुसरीकडे सरकारी कागदांवरील नगन्य आकडा पाहता ही धूळफेक नेमकी आहे तरी कशासाठी, असा प्रश्न आता पडायला लागला आहे.मागील जुलै-आॅगस्ट महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात डेंग्यूने डोके वर काढले आहे. याच काळापासून स्वाईन फ्लूच्या आजाराचीही दहशत आहे. पंढरपूर तालुक्यातील एका जोडप्याला स्वाईन फ्लू झाल्याने पुण्यातील रुग्णालयात मृत्यू झाल्याची नोंद आहे. २०१७ मधील हा स्वाईन फ्लूचा जिल्ह्यातील पहिला बळी असला तरी हे सत्य लपविण्याचा खटाटोप मात्र आरोग्य विभागाकडून सातत्याने सुरू आहे.आरोग्य विभाग आणि जिल्हा हिवताप विभागाच्या शासकीय आकडेवारीनुसार, सोलापूर जिल्ह्यात या वर्षभरात फक्त २१६ जणांनाच डेंग्यू झाला आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आरोग्य विभागाला फक्त ६३२ रुग्ण संशयित आढळले. त्यातील २१६ जणांनाच डेंग्यू झाला होता, अशी नोंद आरोग्य विभागाच्या कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी आहे. दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मोहोळ या तालुक्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. या तालुक्यांसह अन्य तालुक्यांतून सोलापुरात आणि तालुका मुख्यालयातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या अधिक आहे. असे असतानाही केवळ आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाºया रुग्णांचे तेवढे आकडे सादर करून वस्तुस्थिती लपविण्याचा प्रकार आरोग्य विभागाकडून सुरू आहे.---------------------खासगी पॅथॉलॉजीतील नोंदी कुठे गेल्या?नियमानुसार सर्वच पॅथॉलॉजीचालकांना त्यांच्याकडे परिक्षणासाठी येणाºया रक्ताचा अहवाल आरोग्य विभागाला सादर करणे बंधनकारक असते. दररोज सायंकाळी हा अहवाल संबंधित यंत्रणेमार्फत सादर करणे आणि त्यानंतर साप्ताहिक अहवाल देणे हा यातील महत्वाचा भाग असतो. मात्र काही अपवाद वगळता अनेक पॅथालॉजी सेंटरकडून नियमित अहवाल येतच नाहीत. एवढेच नाही तर आरोग्य विभागालाही हा अहवाल मिळविण्यात स्वारस्य वाटत नाही. परिणामत: खासगी पॅथालॉजी आणि खासगी रुग्णालयात गर्दी अधिक दिसत असूनही रुग्णांचा खरा आकडा आरोग्य विभागाला मांडता येत नाही.