शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

सोलापूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर धान्याचा ‘दुष्काळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:30 IST

मंजूर केंद्रांवर धान्य खरेदी होईना; पाच केंद्र मंजुरीचे प्रस्ताव अधांतरीच

ठळक मुद्देकाही ठिकाणी आलेल्या धान्याची विक्रीअभावी परवड सुरू पाच केंद्रांवर आॅनलाईन नोंदणीही  सुरू झाली नाहीदोन केंद्रांवर नोंदणी होऊनही धान्य खरेदीच झाली नाही

सोलापूर : पाऊस नसल्याचे परिणाम खोलवर गेल्याचे जाणवू लागले आहे. उडीद, मूग व सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात तब्बल ७ हमीभाव केंदे्र प्रस्तावित असली तरी मंजूर असलेल्या अक्कलकोट व उत्तर तालुक्याच्या केंद्रांवर धान्याची खरेदी सुरू झाली नाही. अन्य पाच केंद्रे मंजुरीसाठी संस्थांचे शासनाकडे गेलेले प्रस्ताव मंजुरीविना अधांतरीच अडकले आहेत. धान्याची आॅनलाईन नोंदीसाठी अवघे ५ दिवस शिल्लक असताना हमीभाव केंद्रावर धान्याचा दुष्काळ दिसत आहे.

 शेतीमालाची आवक झाली की बाजारात दराची घसरण सुरू होते. हे नित्याचेच आहे. शेतीमालाची ºहास एकाचवेळी सुरू होते व  पैशाची गरज असल्याने शेतकरी धान्य बाजारात विक्रीला आणतात. खरीप हंगामातील धान्य बाजारात येण्याच्या सुरुवातीला उडीद, मूग, मका, सोयाबीन आदींना बºयापैकी दर असतो. नंतर मात्र दराची घसरण होते. दर परवडणारा नसला तरी बºयापैकी दर मिळत असल्याने शेतकरी धान्य विक्रीला आणतात, शेतकºयांकडून धान्याचा ओघ सुरू झाली की दराची घसरण सुरू होते. हे टाळण्यासाठी शासनाकडून हमीभाव केंद्रे सुरू केली जातात.

शेतकºयांनी उडीद, मूग, मका,  सोयाबीन व अन्य धान्याची हमीभाव केंद्रासाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागते. नोंदणी केलेल्या धान्याचीच हमीभाव केंद्रावर खरेदी केली जाते. यावर्षी उडीद, मूग या धान्याची आॅनलाईन नोंदणीची मुदत २५ सप्टेंबर ते २४ आॅक्टोबर तर सोयाबीनची  ३१ आॅक्टोबरपर्यंत शासनाने दिली आहे.

या मुदतीत फक्त लिंबीचिंचोली(सोलापूर) केंद्रात उडीदसाठी ५८ तर मूगसाठी २१, सोयाबीन २ व अक्कलकोट या केंद्रावर उडीद १११ व मुगासाठी २१ अशा दोन केंद्रावर २१३ शेतकºयांनी नोंद केली आहे. प्रत्यक्षात धान्य खरेदीला सुरुवात झाली नाही.  करमाळा, बार्शी, मंगळवेढा, कुर्डूवाडी व माळकवठे(दक्षिण सोलापूर) या ठिकाणी हमीभाव केंद्र खरेदीसाठी संस्था मंजुरीच शासनाने अद्याप केली नसल्याचे सांगण्यात आले. खरीप शेतीमाल नसल्याचीही हमीभाव केंद्र मंजुरीची अडचण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाच केंद्रांवर आॅनलाईन नोंदणीही  सुरू झाली नाही तर दोन केंद्रांवर नोंदणी होऊनही धान्य खरेदीच झाली नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे उडीद, मूग, सोयाबीन, मका व अन्य खरीप पिके वाया गेली आहेत. काही ठिकाणी आलेल्या धान्याची विक्रीअभावी परवड सुरू आहे. 

खरीप हंगाम संपला..- सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, करमाळा, बार्शी, मंगळवेढा, कुर्डूवाडी, सोलापूर बाजार समिती (उत्तर सोलापूर) व माळकवठे(दक्षिण सोलापूर) येथे हमीभाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित होते. - अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप पिके असतात त्यामुळे अक्कलकोट व दुधनी या ठिकाणी हमीभाव केंदे्र सुरू केली जातात; मात्र यावर्षी दुष्काळामुळे खरीप हंगाम संपला तरी मंजूर असलेल्या अक्कलकोट केंद्रावरही धान्याची खरेदी सुरू नाही.- मूग प्रतिक्विंटल ५ हजार ६०० रुपये, उडीद प्रतिक्विंटल ६ हजार ९७५ रुपये, मका १७०० रुपये क्विंटल तर सोयाबीनची खरेदी ३३९९ रुपयाने केली जाणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार