शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोलापूर जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर धान्याचा ‘दुष्काळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:30 IST

मंजूर केंद्रांवर धान्य खरेदी होईना; पाच केंद्र मंजुरीचे प्रस्ताव अधांतरीच

ठळक मुद्देकाही ठिकाणी आलेल्या धान्याची विक्रीअभावी परवड सुरू पाच केंद्रांवर आॅनलाईन नोंदणीही  सुरू झाली नाहीदोन केंद्रांवर नोंदणी होऊनही धान्य खरेदीच झाली नाही

सोलापूर : पाऊस नसल्याचे परिणाम खोलवर गेल्याचे जाणवू लागले आहे. उडीद, मूग व सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात तब्बल ७ हमीभाव केंदे्र प्रस्तावित असली तरी मंजूर असलेल्या अक्कलकोट व उत्तर तालुक्याच्या केंद्रांवर धान्याची खरेदी सुरू झाली नाही. अन्य पाच केंद्रे मंजुरीसाठी संस्थांचे शासनाकडे गेलेले प्रस्ताव मंजुरीविना अधांतरीच अडकले आहेत. धान्याची आॅनलाईन नोंदीसाठी अवघे ५ दिवस शिल्लक असताना हमीभाव केंद्रावर धान्याचा दुष्काळ दिसत आहे.

 शेतीमालाची आवक झाली की बाजारात दराची घसरण सुरू होते. हे नित्याचेच आहे. शेतीमालाची ºहास एकाचवेळी सुरू होते व  पैशाची गरज असल्याने शेतकरी धान्य बाजारात विक्रीला आणतात. खरीप हंगामातील धान्य बाजारात येण्याच्या सुरुवातीला उडीद, मूग, मका, सोयाबीन आदींना बºयापैकी दर असतो. नंतर मात्र दराची घसरण होते. दर परवडणारा नसला तरी बºयापैकी दर मिळत असल्याने शेतकरी धान्य विक्रीला आणतात, शेतकºयांकडून धान्याचा ओघ सुरू झाली की दराची घसरण सुरू होते. हे टाळण्यासाठी शासनाकडून हमीभाव केंद्रे सुरू केली जातात.

शेतकºयांनी उडीद, मूग, मका,  सोयाबीन व अन्य धान्याची हमीभाव केंद्रासाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागते. नोंदणी केलेल्या धान्याचीच हमीभाव केंद्रावर खरेदी केली जाते. यावर्षी उडीद, मूग या धान्याची आॅनलाईन नोंदणीची मुदत २५ सप्टेंबर ते २४ आॅक्टोबर तर सोयाबीनची  ३१ आॅक्टोबरपर्यंत शासनाने दिली आहे.

या मुदतीत फक्त लिंबीचिंचोली(सोलापूर) केंद्रात उडीदसाठी ५८ तर मूगसाठी २१, सोयाबीन २ व अक्कलकोट या केंद्रावर उडीद १११ व मुगासाठी २१ अशा दोन केंद्रावर २१३ शेतकºयांनी नोंद केली आहे. प्रत्यक्षात धान्य खरेदीला सुरुवात झाली नाही.  करमाळा, बार्शी, मंगळवेढा, कुर्डूवाडी व माळकवठे(दक्षिण सोलापूर) या ठिकाणी हमीभाव केंद्र खरेदीसाठी संस्था मंजुरीच शासनाने अद्याप केली नसल्याचे सांगण्यात आले. खरीप शेतीमाल नसल्याचीही हमीभाव केंद्र मंजुरीची अडचण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पाच केंद्रांवर आॅनलाईन नोंदणीही  सुरू झाली नाही तर दोन केंद्रांवर नोंदणी होऊनही धान्य खरेदीच झाली नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे उडीद, मूग, सोयाबीन, मका व अन्य खरीप पिके वाया गेली आहेत. काही ठिकाणी आलेल्या धान्याची विक्रीअभावी परवड सुरू आहे. 

खरीप हंगाम संपला..- सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, करमाळा, बार्शी, मंगळवेढा, कुर्डूवाडी, सोलापूर बाजार समिती (उत्तर सोलापूर) व माळकवठे(दक्षिण सोलापूर) येथे हमीभाव केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित होते. - अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप पिके असतात त्यामुळे अक्कलकोट व दुधनी या ठिकाणी हमीभाव केंदे्र सुरू केली जातात; मात्र यावर्षी दुष्काळामुळे खरीप हंगाम संपला तरी मंजूर असलेल्या अक्कलकोट केंद्रावरही धान्याची खरेदी सुरू नाही.- मूग प्रतिक्विंटल ५ हजार ६०० रुपये, उडीद प्रतिक्विंटल ६ हजार ९७५ रुपये, मका १७०० रुपये क्विंटल तर सोयाबीनची खरेदी ३३९९ रुपयाने केली जाणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार