शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

डीपी जळाला.. पाच दिवसांपासून अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:23 IST

करमाळा : महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे कंदरसह परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ४-५ दिवसांपासून निम्मे गाव अंधारात ...

करमाळा : महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे कंदरसह परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ४-५ दिवसांपासून निम्मे गाव अंधारात असल्याने नागरिकांत चीड निर्माण झाली आहे. तर उर्वरित असणारे रोहित्र (डीपी) ही रविवारी रात्री जळाल्याने पूर्ण गाव अंधारात आहे. यामुळे महावितरण विरोधात नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे लाईट वारंवार बंद होत असल्याचे प्रकार घडत आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित थांबवावा. लाईट वारंवार जात असल्याने नागरिकांना उपकरणे बंद ठेवावी लागत आहेत. पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणारे दुकानदार यांची अडचण झाली आहे, असे गाऱ्हाणे नागिरकांमधून मांडले जात आहे.

---

काही महिन्यापासून गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकासमोर मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत. आमच्या उद्योगावर परिणाम होत आहे. महावितरणणे या सोडवणे गरजेचे आहेत.

- सूर्यकांत झिंगाडे, व्यावसायिक

---

चांगले अधिकारी द्या...

कंदर उपकेंद्रात कायमस्वरूपी अधिकारी नसल्यामुळे या उपकेंद्रावर कायम समस्या उद्‌भवत आहेत. प्रभारीवर कामकाज सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी या गावाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्वरित गावातील समस्या सोडविण्यासाठी चांगला अधिकारी देणे गरजेचे आहे.

-----