शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

घाई करू नका नेत्यांचा सल्ला

By admin | Updated: May 30, 2014 00:44 IST

अध्यक्षांनी घेतली भेट

सोलापूर वारणा अथवा कोयना धरणातून पाणी हवे असेल तर आलमट्टीतून भीमा नदीत पाणी सोडावे लागेल, असा प्रस्ताव महाराष्टÑ सरकारने कर्नाटक सरकारसमोर ठेवला आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावाचा मसुदा सोलापुरात तयार झाला आहे. कर्नाटक सरकारने वारणा किंवा कोयना धरणातून पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी महाराष्टÑाकडे केली आहे. या मागणीवर चर्चा करण्यासाठी मुंबईत मंत्रालयात संबंधित खात्याच्या दोन्ही राज्यातील अधिकार्‍यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत कर्नाटकसाठी पाणी देणार असाल तर त्याच्या बदल्यात सोलापूरसाठी आलमट्टी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले पाहिजे, असा प्रस्ताव सोलापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी मांडला. उजनी धरणातून दरवर्षी १८ ते २० टीएमसी पाणी भीमा नदीपात्रात सोडले जाते. महाराष्टÑ-कर्नाटक सीमेवर असलेले आठ बंधारे या पाण्याने भरले जातात. त्यातील चार बंधारे महाराष्टÑाने तर चार कर्नाटक शासनाने बांधले आहेत. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सोडलेल्या या पाण्याचा बहुतांश वापर शेतीसाठीच होतो. भौगोलिकदृष्ट्या कर्नाटकच्या शेतकर्‍यांना त्याचा अधिक वापर होतो. पाणी सोडताना भीमा नदीकाठचा वीजपुरवठा खंडित केल्याने महाराष्ट्रातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहतात तर कर्नाटक हद्दीतील शेतकरी मुक्तपणे या पाण्याचा लाभ घेतात, ही वस्तुस्थिती अधीक्षक अभियंता दाभाडे यांनी मांडली. दाभाडे यांनी मांडलेला प्रस्ताव कर्नाटकच्या प्रशासकीय शिष्टमंडळाने तत्त्वत: मान्य केला. दोन्ही राज्याच्या संयुक्त पथकाकडून पाहणी दौरा आयोजित करावा. त्यांच्या अहवालानंतर पाण्याच्या देवाण-घेवाणीचा नवा प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, सहसचिव आर. डब्ल्यू. निकुंब, पुणे विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, उपसचिव संजय टाटू, सोलापूरचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे, सांगलीचे कार्यकारी अभियंता टी. टी. सूर्यवंशी तर कर्नाटकच्या वतीने जलसंपदा सचिव कपिल मोहन, बेळगावचे मुख्य अभियंता बी. बी. जलगसार, जलसंपदाचे कार्यकारी संचालक आर. रुद्रय्या, अनिल कुमार, आलमट्टीचे अधीक्षक अभियंता एस. एच. मुंजाप्पा आदी चर्चेत सहभागी झाले होते.

-------------------------

आव्हानाची भाषा

अध्यक्षांच्या आरोपामुळे घायाळ झालेल्या सहकारी पदाधिकार्‍यांकडून सुधारणेचा विचार येणे अपेक्षित असताना त्यांनाच आव्हान देण्याची भाषा केली जात आहे. यामुळे साहजिकच प्रशासनाला बळ मिळणार आहे. याचा फटका जि.प. चा कारभार सुधारण्याऐवजी बिघडण्यासाठी पोषक ठरणार आहे. यात राष्टÑवादी काँग्रेस व जि.प.चे नेतृत्व करणार्‍यांचेच नुकसान होणार आहे.