शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वीरशैव समाजभूषण पुरस्कारांचे वितरण

By admin | Updated: June 23, 2014 01:11 IST

वीरशैव जीवन गौरव

सोलापूर : महाराष्ट्र वीरशैव सभेच्या वतीने समाजातील १९ जणांना वीरशैव जीवन गौरव तर बार्शीच्या माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांना मानाचा वीरशैव समाजभूषण पुरस्कार रविवारी सकाळी सिद्धेश्वर मंदिरात आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील-नागराळकर यांच्या हस्ते आणि सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा पार पडला. व्यासपीठावर आ. विजयकुमार देशमुख, आ. प्रणिती शिंदे, आ. सिद्रामप्पा पाटील, माजी आ. विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील-बिराजदार, रतिकांत पाटील, महादेव पाटील, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, वीरशैव सभेचे संस्थापक डॉ. शिवमूर्ती शाहीर, प्रांतिक अध्यक्ष बाबासाहेब कोरे, प्रबुद्धचंद्र झपके, परिवहनचे सभापती आनंद मुस्तारे, सुभाष मुनाळे, अनिल सिंदगी, इंदुमती अलगोंडा-पाटील, तम्मा गंभीरे, समाजातील नगरसेवक, वीरशैव सभेचे विविध तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते.प्रारंभी जिल्हाध्यक्ष सिद्रामप्पा उण्णद यांनी स्वागत तर शहराध्यक्ष नंदकुमार मुस्तारे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर बसवराज पाटील- नागराळकर यांच्या हस्ते शिक्षण महर्षी बसवंत भरले (भंडारकवठे), शंकरेप्पा तांबे (माढा), उल्हास पाटील (किणी), विश्वनाथ नष्टे (माळशिरस), मोहन ठिगळे (पंढरपूर), चंद्रशेखर शिलवंत (टेंभुर्णी), यशवंत पाटील (तळसंगी), अण्णासाहेब साखरे (साखरेवाडी), भीमाशंकर कुर्डे (मोहोळ), आप्पाराव दर्गोपाटील, अ‍ॅड. अशोक ठोकडे, करबसप्पा आलमेलकर, बसवराज शास्त्री-हिरेमठ, सिद्धेश्वर बमणी, डॉ. राजेंद्र घुली, श्रीमंत माळगे, महादेवी लोणी, सुगलाबाई वाकळे यांना स्मृतिचिन्ह, सिद्धरामेश्वरांची प्रतिमा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन समाजभूषण पुरस्काराने तर माजी आ. प्रभाताई झाडबुके यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, सिद्धरामेश्वरांची मूर्ती देऊन जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रभाताई झाडबुके यांनी आपल्या मनोगतातून समाजकारण, राजकारणातील आपल्या यशाची गुपिते मांडली. सत्ता मिळाल्यानंतर ती टिकवणे, तिचे संगोपन करणे मला जमल्याने आपण यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. शिस्त, वक्तशीरपणा आणि सर्वधर्मसमभाव हे तीन सूत्री मंत्र अवलंबल्यामुळेच २२ वर्षे नगराध्यक्ष तर १६ वर्षे आमदारकी भोगल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले- कापसे यांनी केले तर आभार राज पाटील यांनी मानले. यावेळी सिद्धय्या स्वामी, केदार उंबरजे, नरेंद्र गंभीरे, गुरुनाथ करजगीकर, महेश अंदेली, विजया थोबडे, पुष्पा गुंगे, सिद्रामप्पा अबदुलपूरकर, बाळासाहेब भोगडे, रेवणसिद्ध आवजे, मल्लिकार्जुन निरोळी, मदन झाडबुके, शिवलिंग पाटील, सोमनाथ चिवटे, उत्कर्ष शेटे, गिरीश नष्टे, अशोक करजाळे, बाळासाहेब आडके, मनोहर कवचाळे, श्रीधर कारंडे, अण्णासाहेब कोतली, डॉ. बसवराज बगले यांच्यासह देवस्थान पंच कमिटीचे पदाधिकारी, वीरशैव सभेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. -------------------------------------व्हायरस घुसू देऊ नका- झाडबुकेटक्केवारी हा शब्द आता प्रचलित झाला आहे. टक्केवारी दिल्याशिवाय आणि घेतल्याशिवाय कामे होतच नाहीत. नगराध्यक्ष, आमदार असताना टक्केवारीचा व्हायरस माझ्यापर्यंत येऊ दिलाच नाही. म्हणूनच बार्शी नगरपालिकेत असताना ९९ टक्के ठराव एकमताने झाले. त्यामुळे शहर विकासाला गती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. राजकारणातील मंडळींनी टक्केवारीचा व्हायरस तुमच्यात घुसू देऊ नका, असा सल्लाही प्रभाताई झाडबुके यांनी दिला.