शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

सोलापूरात निर्मलकुमार फडकुले राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण

By appasaheb.dilip.patil | Updated: July 29, 2017 12:00 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २९  : भारत महासत्ता व्हावे, असे वाटते; पण अनेकांना चिरडणारी महासत्ता आम्हाला नको आहे. आज जगभरात हिंसाचार आहे, भीती आहे. या स्थितीत हा देश आर्थिक महासत्तापेक्षा आध्यात्मिक महासत्ता व्हावा, अशी अपेक्षा फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आज येथे व्यक्त केली.शब्दप्रभू डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. फडकुले ...

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २९  : भारत महासत्ता व्हावे, असे वाटते; पण अनेकांना चिरडणारी महासत्ता आम्हाला नको आहे. आज जगभरात हिंसाचार आहे, भीती आहे. या स्थितीत हा देश आर्थिक महासत्तापेक्षा आध्यात्मिक महासत्ता व्हावा, अशी अपेक्षा फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आज येथे व्यक्त केली.शब्दप्रभू डॉ. निर्मलकुमार फडकुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा साहित्यसेवा पुरस्काराने सन्मान झाला; तर जलसंधारण, स्वच्छतेची चळवळ राबविणारे डॉ़ अविनाश पोळ यांचा समाजसेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सचिव बिपीनभाई पटेल, दत्ता गायकवाड, प्रा. विलास बेत, रविकिरण पोरे, बाबुराव मैंदर्गीकर, सुरेश पांढरे आदी मंचावर होते. प्रत्येकी पंचवीस हजार रूपये, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफल असे पुरस्कारांचे स्वरूप होते.फादर दिब्रिटो म्हणाले, सहिष्णुता हा आपला स्वभावधर्म आहे आणि असहिष्णुता हा अपघात. भारत सकल धर्मांचे माहेरघर आहे. या देशात अनेक धर्म आले, रूजले आणि ते या भूमीशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे भारत सांस्कृतिक उंची गाठू शकला. बहुधर्मीय, बहुसंस्कृतीच्या वातावरणातच आपण वाढलो आहोत. हे वातावरण आपल्या अंगवळणी पडलेले आहे; पण आजकाल कोणत्याच देशाला सीमा राहिल्या नाहीत. त्यामुळे एकधर्मीय असलेल्या युरोपमध्ये अन्य धर्मीयांशी जुळवून घेताना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. भारतात दोन टक्के ख्रिस्ती आहेत; पण त्यांना काही निराळे वाटत नाही. आमचे पूर्वज हिंदू होते, याचे मला भान आणि अभिमानही वाटतो. वैदिक धर्माकडून आम्हाला उच्च विचार मिळाले, बुध्दांची करूणा, शिखांचा भाईचारा, मुस्लिमांचा बंधुभाव या सर्व विचारांचा अमृतकलश म्हणजेच भारत आहे.भारतात हिंसेचे गौरवीकरण का होत आहे; केवळ राजकीय हत्याच होत नाहीत; तर अनेक कारणाने माणसं मारली जात आहेत. तुमच्या ताटात, शीतपेटीमध्ये काय असावे झुंडी ठरवू लागल्या आहेत. या विचाराने भारत पुढे जाऊ शकणार नाही.  रेल्वेतून जाणाºया निष्पाप युवकाची हत्या केली जाते, हा हिंसाचार येतो कुठून? समाजाला उन्मादासाठी कुठून इंधन पुरविले जाते, याचा विचार व्हायला हवा. जेव्हा हिंसाचार ‘डीएनए’मध्ये शिरतो, तेव्हा सारे कठीण होते, असे सांगून सज्जन मंडळी स्वस्थ का राहतात? भारताच्या भव्य वृक्षाला रक्ताची पाने अन् फळे येत आहेत कारण वृक्षाच्या मुळाशीच रक्ताचे सिंचन होत आहे, असे फादर म्हणाले.डॉ. पोळ यांनी जलसंवर्धन, ग्रामविकास आणि हागणदारीमुक्तीच्या कार्याचा प्रवास मोठ्या रंजकतेने सांगितला. ते म्हणाले की, या कामातून मला आनंद मिळतो. आज गावागावात समाज दुभंगलेला आहे. त्यामुळेच अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत; पण या सर्वच प्रश्नांची सोडवणूक एकटे सरकार करू शकत नाही. त्यामुळे समाज आणि सरकार एकत्र आले पाहिजे. आज समाजामध्ये जाऊन लोकांना एकत्र आणले जात नाही. सरकारच्या अनेक योजना आहेत; पण त्याबाबत जनजागरण होत नाही. त्यामुळेही अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. ज्या देशामध्ये व्यवस्थित ग्रामसभा भरू शकत नाहीत, तो देश महासत्ता कसा होणार? असा सवाल त्यांनी केला.शिंदे यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. सत्तापालट झाल्यानंतर जे बदल होतात, त्यामध्ये होणाºया चुका सांगण्यासाठी समाजामध्ये फादर दिब्रिटोसारखे चिंतक असावे लागतात. त्यांनी केलेले समाजाचे चिंतन योग्य दिशा देणारे आहे. डॉ. पोळ हे सातारा भागातील आहेत. तेथेच क्रांतीवीर नाना पाटलांनी कार्य केले. डॉ. पोळ हेही समाजात विकासाची क्रांती करत आहेत. एका अर्थाने हे काम नाना पाटलांसारखेच आहे, असा गौरव शिंदे यांनी केला.