शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना निधी वितरणाचाही दुष्काळ,  रब्बी हंगामातील मदतनिधीचे केवळ ३५ टक्के वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 13:59 IST

२०१५-१६ च्या रब्बी हंगामात दुष्काळ बाधित ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी राज्य शासनाने ५७ कोटी रुपयांच्या तुटपुंज्या निधीची तरतूद केली. ही तरतूदही लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात महसूल प्रशासनाला यश आलेले नाही.

ठळक मुद्दे राज्य शासनाने जिल्हा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील शेतकºयांना दुष्काळ मदतनिधी देण्याचे आश्वासन दिलेमहसूल प्रशासनाने ५ लाखांहून अधिक शेतकºयांची यादी सरकारकडे सादर केलीपीक विम्याचे पैसे मिळाले त्यांना वगळून यादी पाठविण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : २०१५-१६ च्या रब्बी हंगामात दुष्काळ बाधित ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी राज्य शासनाने ५७ कोटी रुपयांच्या तुटपुंज्या निधीची तरतूद केली. ही तरतूदही लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात महसूल प्रशासनाला यश आलेले नाही. १२ जानेवारीपर्यंत केवळ ३५ टक्के निधीचे वितरण झाले आहे. २०१५ हे वर्ष जिल्ह्यासाठी दुष्काळी ठरले. राज्य शासनाने जिल्हा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील शेतकºयांना दुष्काळ मदतनिधी देण्याचे आश्वासन दिले. महसूल प्रशासनाने ५ लाखांहून अधिक शेतकºयांची यादी सरकारकडे सादर केली. परंतु ज्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले त्यांना वगळून यादी पाठविण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने ४ लाख ५० हजार १९४ शेतकºयांची यादी सादर केली. या शेतकºयांसाठी ५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. या निधीचे वितरण करायचे झाल्यास शेतकºयांच्या हातात ८० रुपये ते ५०० रुपये पडणार आहेत. याविरुध्द जिल्ह्यातील शेतकºयांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मदतनिधीत वाढ करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात वाढीव निधी दिलाच नाही. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांकडे रक्कम वर्ग करून शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरण करण्याचे आदेश दिले. प्रत्यक्षात ३५ टक्के शेतकºयांच्या खात्यावर निधी वर्ग झाला आहे. ही मदत अगदीच किरकोळ स्वरुपाची आहे. तरीही ती पोहोचण्यास उशीर लागत आहे. करमाळा तालुक्यात ९२ हजार ८७८ शेतकरी बाधित आहेत. येथील तहसीलदारांनी निम्म्याहून अधिक शेतकºयांच्या खात्यावर निधी वर्ग केला आहे.---------------उत्तर सोलापूर तहसील सर्वात मागे- उत्तर सोलापूर तालुक्यात १६ हजार ४४६ शेतकरी बाधित ठरले आहेत. यापैकी केवळ २७२ शेतकºयांच्या खात्यावर निधी वितरित झाला आहे. उत्तर तहसीलने केवळ १ टक्का काम केले आहे. दक्षिण सोलापूर तहसीलने केवळ १६ टक्के काम केले आहे. या तालुक्यातील २६ हजार ७३६ शेतकरी बाधित ठरले आहेत. यापैकी ७ हजार ४८२ शेतकºयांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले आहेत. हे दोन्ही तालुके सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रभावाखाली आहेत. तरीही प्रशासन या तालुक्याविषयी किती गांभीर्याने काम करते हे दिसत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय