शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना निधी वितरणाचाही दुष्काळ,  रब्बी हंगामातील मदतनिधीचे केवळ ३५ टक्के वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 13:59 IST

२०१५-१६ च्या रब्बी हंगामात दुष्काळ बाधित ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी राज्य शासनाने ५७ कोटी रुपयांच्या तुटपुंज्या निधीची तरतूद केली. ही तरतूदही लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात महसूल प्रशासनाला यश आलेले नाही.

ठळक मुद्दे राज्य शासनाने जिल्हा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील शेतकºयांना दुष्काळ मदतनिधी देण्याचे आश्वासन दिलेमहसूल प्रशासनाने ५ लाखांहून अधिक शेतकºयांची यादी सरकारकडे सादर केलीपीक विम्याचे पैसे मिळाले त्यांना वगळून यादी पाठविण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७ : २०१५-१६ च्या रब्बी हंगामात दुष्काळ बाधित ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांसाठी राज्य शासनाने ५७ कोटी रुपयांच्या तुटपुंज्या निधीची तरतूद केली. ही तरतूदही लाभार्थी शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यात महसूल प्रशासनाला यश आलेले नाही. १२ जानेवारीपर्यंत केवळ ३५ टक्के निधीचे वितरण झाले आहे. २०१५ हे वर्ष जिल्ह्यासाठी दुष्काळी ठरले. राज्य शासनाने जिल्हा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील शेतकºयांना दुष्काळ मदतनिधी देण्याचे आश्वासन दिले. महसूल प्रशासनाने ५ लाखांहून अधिक शेतकºयांची यादी सरकारकडे सादर केली. परंतु ज्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले त्यांना वगळून यादी पाठविण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने ४ लाख ५० हजार १९४ शेतकºयांची यादी सादर केली. या शेतकºयांसाठी ५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. या निधीचे वितरण करायचे झाल्यास शेतकºयांच्या हातात ८० रुपये ते ५०० रुपये पडणार आहेत. याविरुध्द जिल्ह्यातील शेतकºयांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठविला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मदतनिधीत वाढ करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात वाढीव निधी दिलाच नाही. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांकडे रक्कम वर्ग करून शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरण करण्याचे आदेश दिले. प्रत्यक्षात ३५ टक्के शेतकºयांच्या खात्यावर निधी वर्ग झाला आहे. ही मदत अगदीच किरकोळ स्वरुपाची आहे. तरीही ती पोहोचण्यास उशीर लागत आहे. करमाळा तालुक्यात ९२ हजार ८७८ शेतकरी बाधित आहेत. येथील तहसीलदारांनी निम्म्याहून अधिक शेतकºयांच्या खात्यावर निधी वर्ग केला आहे.---------------उत्तर सोलापूर तहसील सर्वात मागे- उत्तर सोलापूर तालुक्यात १६ हजार ४४६ शेतकरी बाधित ठरले आहेत. यापैकी केवळ २७२ शेतकºयांच्या खात्यावर निधी वितरित झाला आहे. उत्तर तहसीलने केवळ १ टक्का काम केले आहे. दक्षिण सोलापूर तहसीलने केवळ १६ टक्के काम केले आहे. या तालुक्यातील २६ हजार ७३६ शेतकरी बाधित ठरले आहेत. यापैकी ७ हजार ४८२ शेतकºयांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात आले आहेत. हे दोन्ही तालुके सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रभावाखाली आहेत. तरीही प्रशासन या तालुक्याविषयी किती गांभीर्याने काम करते हे दिसत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय