शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कामकाजाविनाच उत्तर सोलापूर तालुक्याची भ्रष्टाचार निर्मूलन समिती बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:51 IST

नव्याने समिती स्थापन करण्यासाठी नवे पत्र : चार महिन्यांपूर्वीच्या जिल्हाधिकाºयांच्या पत्राला मंडल अधिकारी जुमानेनात

ठळक मुद्दे नव्याने समिती स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया चार महिन्यांपासून सुरूजिल्हाधिकारी कार्यालयाने भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन करण्याबाबत नावे सुचवावीत असे पत्र उत्तर तहसील कार्यालयाला दिले

सोलापूर : तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी स्थापन केलेली भ्रष्टाचार निर्मूलन समिती कामकाजाला सुरुवात न करताच बरखास्त झाली असून नव्याने समिती स्थापन करण्याबाबतची प्रक्रिया चार महिन्यांपासून सुरू आहे. उत्तर सोलापूर तालुक्याची ही अवस्था आहे.

तत्कालीन जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी २१ जानेवारी २०१७ रोजी एका पत्रान्वये या समितीवर मार्डी येथील विष्णू जगताप, भागाईवाडीच्या सरपंच कविता शिवाजी घोडके-पाटील, तिºहे येथील गुरुदेव गायकवाड व शेळगीचे इरय्या पुराणिक यांची अशासकीय सदस्य म्हणून निवड केली होती. यापैकी काही सदस्यांना निवडीचे पत्र दिले तर काहींना अद्याप पत्रही दिले नाही; मात्र या समितीची अद्यापपर्यंत एकही बैठक झाली नाही.

दरम्यान, सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी उत्तर सोलापूर तहसीलदारांना ४ डिसेंबर २०१७ रोजीच्या पत्रान्वये भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्य निवडण्यासाठी १५ दिवसात नावे सुचवावीत व प्रांताधिकाºयांनी संबंधित व्यक्तीचे पोलीस अहवाल पडताळून इकडील कार्यालयाला मंजुरीसाठी सादर करावे, असे म्हटले आहे. याच  पत्रात शासकीय संरक्षण दलातील सेवानिवृत्त व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, लोकांचा विश्वास संपादन  केलेली व्यक्ती, लोकप्रतिनिधी, आण्णा हजारे सुचवतील ती व्यक्ती, प्राचार्य व समाजसेवक यांचा समितीमध्ये समावेश असावा असे म्हटले आहे. 

प्रांताधिकारी कार्यालय विसरभोळे - जिल्हाधिकारी कार्यालयाने भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन करण्याबाबत १५ दिवसात नावे सुचवावीत असे पत्र उत्तर तहसील कार्यालयाला ४ डिसेंबर २०१७ रोजी दिले.  सोलापूर प्रांताधिकाºयांनी २४ जानेवारी रोजी या पत्राचा संदर्भ देत तब्बल ५२ दिवसांनी उत्तर तहसीलला पत्र दिले आहे. जिल्हाधिकाºयांच्या पत्राचा ५२ दिवसांनी विचार करणाºया प्रांताधिकाºयांना समिती स्थापनेसाठी नावे येण्यासाठी पाठपुरावा करण्याचा विसर पडला आहे.

मंडल अधिकाºयाचे अजब पत्र- सोलापूर मंडलाचे तत्कालीन मंडलाधिकारी अनिल शहापुरे यांनी नेहरुनगर, सोलापूर तलाठी अखत्यारित पाच विभाग, मजरेवाडी, बाळे, खेड, कोंडी, केगाव व शिवाजीनगर या भागातील शासकीय संरक्षण दलातील सेवानिवृत्त व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींशी चर्चा केली असता एकही व्यक्ती  होकार देत नसल्याचे पत्र उत्तर तहसील कार्यालयाला दिले आहे. मार्डी व शेळगी मंडल अधिकाºयांनी अद्याप नावाच्या शिफारशीचे पत्रच दिले नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय