शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

बेंबळे, उपळवटे अन्‌ उजनीच्या लढतींची चर्चा जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:17 IST

कुर्डूवाडी : माढा तालुक्यात अनेक गावांतून ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सध्या रंगत येऊ लागली आहे. लक्षवेधी असणाऱ्या बेंबळे, ...

कुर्डूवाडी : माढा तालुक्यात अनेक गावांतून ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सध्या रंगत येऊ लागली आहे. लक्षवेधी असणाऱ्या बेंबळे, उपळवाटे, उजनी (मा), पालवन या गावच्या निवडणुकीत तर गावातील गट आमने-सामने मोठ्या चुरशीने एकमेकांना लढत देत आहेत. प्रचारात सर्वांनीच आघाडी घेतली असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभने दाखवले जात आहेत.

गावोगावच्या निवडणुकीत आपला गट किती चांगला आहे, समोरचा गट किती वाईट आहे हे पटवून देण्यास सुरुवात केली आहे. बेंबळे ग्रामपंचायतीत १५ जागांसाठी विमलेश्वर ग्रामविकास आघाडीचे व सिद्धेश्वर ग्रामविकास आघाडीचे एकास एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात एकजण अपक्ष म्हणून भाग्य आजमावत आहे. पार्टी लीडर दिलीप भोसले, गोविंद भोसले, विष्णू हुंबे, पोपट अनपट यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर उपळवाटे ग्रामपंचायत निवडणुकीत ९ जागांसाठी अतुल खूपसे-पाटील व उद्धव माळी, राहुल घाडगे गट या दोन्ही गटांतून एकास एक उमेदवार देऊन काट्याची टक्कर निर्माण केली आहे. पालवन येथील सात जागांसाठी माजी सरपंच परमेश्वर पाटील यांच्या श्री चांदोबा ग्रामविकास आघाडीचे व भारत साळुंखे यांच्या चांदोबा ग्रामविकास आघाडीचे एकास एक उमेदवार निवडून रिंगणात आहेत. येथेही एक अपक्ष उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे. गाव छोटे असले तरी येथील लढत लक्षवेधी बनली आहे. याबरोबरच उजनी (मा) या मोठ्या प्रमाणावर ऊस बागायती असणाऱ्या गावात यंदा वाॅर्डावाॅर्डांत नेतृत्व बदल होऊन वेगवेगळे गट लढत आहेत. येथील एक जागा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येथे पार्टी लीडर संतोषबप्पा पाटील, अविनाश निकम, संतोष पाटील, संजय पाटील, समाधान लोकरे यांचीच शेवटी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. येथील निवडणुकीत यंदा गावपातळीवर गटातटाचे वातावरण तापले आहे. जो तो आपल्या वाॅर्डात लक्ष वेधून काम करीत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीतच सर्व निवडणुकीत आता प्रचारात आघाडी घेऊन चुरस निर्माण झाल्याचे दिसत आहे.

----बिनविरोध होता होता लागली अरणची निवडणूक---राजकीयदृष्ट्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली अरण ग्रामपंचायत बिनविरोध करायची म्हणून गावकऱ्यांनी व येथील पुढाऱ्यांनी एकमत केले होते. ग्रामसभा आयोजित केली होती. आपापल्या पार्टीचे ठरलेले उमेदवार बिनविरोध निवडून द्यायचे ठरले होते. त्यामुळे १३ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये सर्वांच्या १३ जागेवर १३ फॉर्म भरण्यातही आले होते. इथली निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा झाली होती. परंतु फॉर्म भरण्याची मुदत संपण्याच्या अगोदरच काही कारणाने नाराज झालेल्या काही पदाधिकाऱ्यांनी दोन वाॅर्डातील पाच ठिकाणी अर्ज भरले आणि ते अर्ज माघारीच घेतले नाहीत. त्यामुळे येथे त्या पाच जागांची निवडणूक लागली आहे व इतर ८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. येथे त्या पाच जागांवर नाराज गट विरोधात बिनविरोध गट अशी लढत होत आहे.

.................