शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

बेंबळे, उपळवटे अन्‌ उजनीच्या लढतींची चर्चा जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:17 IST

कुर्डूवाडी : माढा तालुक्यात अनेक गावांतून ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सध्या रंगत येऊ लागली आहे. लक्षवेधी असणाऱ्या बेंबळे, ...

कुर्डूवाडी : माढा तालुक्यात अनेक गावांतून ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सध्या रंगत येऊ लागली आहे. लक्षवेधी असणाऱ्या बेंबळे, उपळवाटे, उजनी (मा), पालवन या गावच्या निवडणुकीत तर गावातील गट आमने-सामने मोठ्या चुरशीने एकमेकांना लढत देत आहेत. प्रचारात सर्वांनीच आघाडी घेतली असून, मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रलोभने दाखवले जात आहेत.

गावोगावच्या निवडणुकीत आपला गट किती चांगला आहे, समोरचा गट किती वाईट आहे हे पटवून देण्यास सुरुवात केली आहे. बेंबळे ग्रामपंचायतीत १५ जागांसाठी विमलेश्वर ग्रामविकास आघाडीचे व सिद्धेश्वर ग्रामविकास आघाडीचे एकास एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात एकजण अपक्ष म्हणून भाग्य आजमावत आहे. पार्टी लीडर दिलीप भोसले, गोविंद भोसले, विष्णू हुंबे, पोपट अनपट यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर उपळवाटे ग्रामपंचायत निवडणुकीत ९ जागांसाठी अतुल खूपसे-पाटील व उद्धव माळी, राहुल घाडगे गट या दोन्ही गटांतून एकास एक उमेदवार देऊन काट्याची टक्कर निर्माण केली आहे. पालवन येथील सात जागांसाठी माजी सरपंच परमेश्वर पाटील यांच्या श्री चांदोबा ग्रामविकास आघाडीचे व भारत साळुंखे यांच्या चांदोबा ग्रामविकास आघाडीचे एकास एक उमेदवार निवडून रिंगणात आहेत. येथेही एक अपक्ष उमेदवार आपले भाग्य आजमावत आहे. गाव छोटे असले तरी येथील लढत लक्षवेधी बनली आहे. याबरोबरच उजनी (मा) या मोठ्या प्रमाणावर ऊस बागायती असणाऱ्या गावात यंदा वाॅर्डावाॅर्डांत नेतृत्व बदल होऊन वेगवेगळे गट लढत आहेत. येथील एक जागा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येथे पार्टी लीडर संतोषबप्पा पाटील, अविनाश निकम, संतोष पाटील, संजय पाटील, समाधान लोकरे यांचीच शेवटी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. येथील निवडणुकीत यंदा गावपातळीवर गटातटाचे वातावरण तापले आहे. जो तो आपल्या वाॅर्डात लक्ष वेधून काम करीत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीतच सर्व निवडणुकीत आता प्रचारात आघाडी घेऊन चुरस निर्माण झाल्याचे दिसत आहे.

----बिनविरोध होता होता लागली अरणची निवडणूक---राजकीयदृष्ट्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली अरण ग्रामपंचायत बिनविरोध करायची म्हणून गावकऱ्यांनी व येथील पुढाऱ्यांनी एकमत केले होते. ग्रामसभा आयोजित केली होती. आपापल्या पार्टीचे ठरलेले उमेदवार बिनविरोध निवडून द्यायचे ठरले होते. त्यामुळे १३ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीमध्ये सर्वांच्या १३ जागेवर १३ फॉर्म भरण्यातही आले होते. इथली निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा झाली होती. परंतु फॉर्म भरण्याची मुदत संपण्याच्या अगोदरच काही कारणाने नाराज झालेल्या काही पदाधिकाऱ्यांनी दोन वाॅर्डातील पाच ठिकाणी अर्ज भरले आणि ते अर्ज माघारीच घेतले नाहीत. त्यामुळे येथे त्या पाच जागांची निवडणूक लागली आहे व इतर ८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. येथे त्या पाच जागांवर नाराज गट विरोधात बिनविरोध गट अशी लढत होत आहे.

.................