शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
2
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
3
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
4
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
6
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
7
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
8
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
9
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
10
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
11
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
13
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
14
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
15
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
16
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
17
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
18
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
19
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
20
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार

देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन! थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घातलंय, २ दिवसात...

By संताजी शिंदे | Updated: April 1, 2023 14:47 IST

आमदार सुभाष देशमुखसह शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन

 

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये पाणी नसल्याकारणाने उद्भवलेल्या पाणी प्रश्नावर आमदार सुभाष देशमुखसह स्थानिक शेतकऱ्यांनी सिंचन भवन समोर ठिय्या आंदोलन केले. सुभाष देशमुखांनी फोन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घातलं आहे. दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सुटेल असे अश्वासन दिले.

पाणी प्रश्नावर भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांसमवेत शनिवारी दुपारी अचानक गुरूनानक चौक येथील सिंचन भवना समोर ठिय्या आंदोलन केले. कॅनलला पाणी नसल्यामुळे परिसरातील शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. उन्हाळा असल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभवलेला आहे. सध्या तीव्र उन्हाळा असताना देखील पाटबंधारे विभागामार्फत सिना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये टेल एंडपर्यंत पाणी सोडलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह आमदार सुभाष देशमुख यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व उपविभागीय अधिकारी शिरीष जाधव यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांनी ऐकले नाही. 

अखेर आमदार सुभाष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. स्पिकर ऑन ठेवून त्यांनी आंदोलनाची परस्थिती सांगितली. शेतकरी सगळे थांबले आहेत, अधिकाऱ्याशी बोलणे झाले आहे. तुम्हीही बोलण गरजेचे आहे असे म्हणाले, स्पिकर ऑन असलेल्या मोबाईलवर बोलताना फडणवीस म्हणाले की, सुभाष बापूंनी मला सगळी माहिती दिली आहे. माझ बोलण झाला आहे, पाणी आजपासून चालू करतोय २ ते ३ दिवसात सर्व व्यवस्थीत होईल. थोडा धिर धरा आता आम्ही लक्ष घातलं आहे, यातून नक्की मार्ग काढू असे अश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी फडणवीस व देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी संदीप टेळे, रामचंद्र बिराजदार, पंडित बुळगुंडे, राजुरचे सरपंच लक्ष्‍मण गडदे, औरादचे सरपंच शांतकुमार गडदे, आप्पासाहेब पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmers Protestशेतकरी आंदोलन