शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन! थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घातलंय, २ दिवसात...

By संताजी शिंदे | Updated: April 1, 2023 14:47 IST

आमदार सुभाष देशमुखसह शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन

 

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये पाणी नसल्याकारणाने उद्भवलेल्या पाणी प्रश्नावर आमदार सुभाष देशमुखसह स्थानिक शेतकऱ्यांनी सिंचन भवन समोर ठिय्या आंदोलन केले. सुभाष देशमुखांनी फोन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घातलं आहे. दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सुटेल असे अश्वासन दिले.

पाणी प्रश्नावर भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांसमवेत शनिवारी दुपारी अचानक गुरूनानक चौक येथील सिंचन भवना समोर ठिय्या आंदोलन केले. कॅनलला पाणी नसल्यामुळे परिसरातील शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. उन्हाळा असल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभवलेला आहे. सध्या तीव्र उन्हाळा असताना देखील पाटबंधारे विभागामार्फत सिना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये टेल एंडपर्यंत पाणी सोडलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह आमदार सुभाष देशमुख यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व उपविभागीय अधिकारी शिरीष जाधव यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांनी ऐकले नाही. 

अखेर आमदार सुभाष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. स्पिकर ऑन ठेवून त्यांनी आंदोलनाची परस्थिती सांगितली. शेतकरी सगळे थांबले आहेत, अधिकाऱ्याशी बोलणे झाले आहे. तुम्हीही बोलण गरजेचे आहे असे म्हणाले, स्पिकर ऑन असलेल्या मोबाईलवर बोलताना फडणवीस म्हणाले की, सुभाष बापूंनी मला सगळी माहिती दिली आहे. माझ बोलण झाला आहे, पाणी आजपासून चालू करतोय २ ते ३ दिवसात सर्व व्यवस्थीत होईल. थोडा धिर धरा आता आम्ही लक्ष घातलं आहे, यातून नक्की मार्ग काढू असे अश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी फडणवीस व देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी संदीप टेळे, रामचंद्र बिराजदार, पंडित बुळगुंडे, राजुरचे सरपंच लक्ष्‍मण गडदे, औरादचे सरपंच शांतकुमार गडदे, आप्पासाहेब पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmers Protestशेतकरी आंदोलन