शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देवेंद्र फडणवीसांचा थेट फोन! थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घातलंय, २ दिवसात...

By संताजी शिंदे | Updated: April 1, 2023 14:47 IST

आमदार सुभाष देशमुखसह शेतकऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन

 

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये पाणी नसल्याकारणाने उद्भवलेल्या पाणी प्रश्नावर आमदार सुभाष देशमुखसह स्थानिक शेतकऱ्यांनी सिंचन भवन समोर ठिय्या आंदोलन केले. सुभाष देशमुखांनी फोन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना थोडा धीर धरा, आम्ही लक्ष घातलं आहे. दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सुटेल असे अश्वासन दिले.

पाणी प्रश्नावर भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांसमवेत शनिवारी दुपारी अचानक गुरूनानक चौक येथील सिंचन भवना समोर ठिय्या आंदोलन केले. कॅनलला पाणी नसल्यामुळे परिसरातील शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. उन्हाळा असल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उदभवलेला आहे. सध्या तीव्र उन्हाळा असताना देखील पाटबंधारे विभागामार्फत सिना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये टेल एंडपर्यंत पाणी सोडलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह आमदार सुभाष देशमुख यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व उपविभागीय अधिकारी शिरीष जाधव यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांनी ऐकले नाही. 

अखेर आमदार सुभाष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. स्पिकर ऑन ठेवून त्यांनी आंदोलनाची परस्थिती सांगितली. शेतकरी सगळे थांबले आहेत, अधिकाऱ्याशी बोलणे झाले आहे. तुम्हीही बोलण गरजेचे आहे असे म्हणाले, स्पिकर ऑन असलेल्या मोबाईलवर बोलताना फडणवीस म्हणाले की, सुभाष बापूंनी मला सगळी माहिती दिली आहे. माझ बोलण झाला आहे, पाणी आजपासून चालू करतोय २ ते ३ दिवसात सर्व व्यवस्थीत होईल. थोडा धिर धरा आता आम्ही लक्ष घातलं आहे, यातून नक्की मार्ग काढू असे अश्वासन दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी फडणवीस व देशमुख यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. यावेळी संदीप टेळे, रामचंद्र बिराजदार, पंडित बुळगुंडे, राजुरचे सरपंच लक्ष्‍मण गडदे, औरादचे सरपंच शांतकुमार गडदे, आप्पासाहेब पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmers Protestशेतकरी आंदोलन