शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सोलापूर विद्यापीठ नामांतराच्या निर्णयाने धनगर समाज खूष तर लिंगायत समाज नाराज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 14:07 IST

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्टÑातील धनगर समाजबांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठाची स्थापना ४ आॅगस्ट २००४ साली झाली२०१७ साल उजाडले आणि विद्यापीठाच्या नामांतराचा विषय गाजू लागलालिंगायत समाजबांधवांचा रोष मात्र शासनाने ओढवून घेतला

शंकर जाधवसोलापूर दि ६ : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्टÑातील धनगर समाजबांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे समस्त लिंगायत समाज नाराज झाल्याने या समाजाच्या कोंडीत सरकार सापडले आहे. या दोन्ही समाजातील बहुतांश मतदार भाजपच्या मागे असल्याने ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेत होती़ दहावी, बारावीचे बोर्ड पुणे येथे तर महाविद्यालये कोल्हापूरकडे अशी सोलापूर जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती  होती. आजही दहावी, बारावीचे बोर्ड पुणे येथेच आहे. मात्र २००४ साली सुशीलकुमार शिंदे हे महाराष्टÑाचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयांची अडचण लक्षात घेऊन सोलापूरसाठी स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती करुन तशी घोषणा केली. केवळ एका जिल्ह्यापुरते स्वतंत्र विद्यापीठ म्हणून महाराष्टÑाच्या शैक्षणिक क्षेत्रात सोलापूरची ओळख निर्माण झाली.सोलापूर विद्यापीठाची स्थापना ४ आॅगस्ट २००४ साली झाली. त्याचा उद्घाटन समारंभही सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती मंदिरात झाला. त्यानंतर अनेक अडचणींवर मात करुन पुणे रस्त्यावरील केगावजवळ सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली. तेव्हापासूनच सोलापूर विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न गाजू लागला. सर्वप्रथम शिवा संघटनेने सोलापूर विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर किंवा श्री सिध्देश्वर यांचे नाव देण्याची मागणी लावून धरली. कालांतराने जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचे नाव देण्यासाठी बाह्या सरसावल्या. अहिल्यादेवींचे विद्यापीठाला नाव देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) यांनी धनगर समाजबांधवांना पाठिंबा दिला. शिवसेनेने तर २०१३ साली राजमाता अहिल्यादेवी यांचे नाव असलेले बॅनरच विद्यापीठाच्या गेटला लावून नामांतराचे रणशिंग फुंकले.२०१७ साल उजाडले आणि विद्यापीठाच्या नामांतराचा विषय गाजू लागला. प्रथम धनगर समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आणि त्यानंतर लिंगायत समाजाची मोट बांधलेल्या ‘शिवा’ संघटनेनेही आपली ताकद पणाला लावून मोठा मोर्चा काढला. त्यामुळे शासनासमोर महात्मा बसवेश्वर, श्री सिध्देश्वर की राजमाता अहिल्यादेवी यांच्यापैकी कुणाचे नाव विद्यापीठाला द्यावे?, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला. असे असले तरी विद्यापीठाच्या सिनेट समितीने सोलापूर विद्यापीठच नाव असावे, असा आग्रह धरला.दरम्यानच्या काळात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठाकडे एका नावाचा प्रस्ताव आला असल्याचे सांगून सर्वांचीच उत्सुकता वाढवली. एवढेच नाहीतर विद्यापीठाला श्री सिध्देश्वर, राजमाता अहिल्यादेवी होळकर किंवा जिजाऊ यांचे नाव पुढे येण्याची शक्यता असल्याचे सांगून त्या उत्सुकतेत भर घातली. आणि आज (रविवारी) दुपारी अचानक मुख्यमंत्र्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव विद्यापीठाला देण्याची घोषणा  करुन धनगर समाजबांधवांना दिलासा दिला. यामुळे शहर आणि जिल्ह्यातील लिंगायत समाजबांधवांचा रोष मात्र शासनाने ओढवून घेतला.------------------------आजवरचे कुलगुरु- डॉ. इरेश स्वामी - २००४ ते २००७- डॉ. एन. एन. मालदार - २००७ (प्रभारी एक महिन्यासाठी)- डॉ. बी. पी. बंडगर - २००७ ते २०१२- डॉ. एन. जे. पवार - २०१२ (प्रभारी दोन महिन्यासाठी)- डॉ. एन. एन. मालदार - २०१२ पासून