शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

सोलापूर विद्यापीठ नामांतराच्या निर्णयाने धनगर समाज खूष तर लिंगायत समाज नाराज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 14:07 IST

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्टÑातील धनगर समाजबांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठाची स्थापना ४ आॅगस्ट २००४ साली झाली२०१७ साल उजाडले आणि विद्यापीठाच्या नामांतराचा विषय गाजू लागलालिंगायत समाजबांधवांचा रोष मात्र शासनाने ओढवून घेतला

शंकर जाधवसोलापूर दि ६ : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्टÑातील धनगर समाजबांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे समस्त लिंगायत समाज नाराज झाल्याने या समाजाच्या कोंडीत सरकार सापडले आहे. या दोन्ही समाजातील बहुतांश मतदार भाजपच्या मागे असल्याने ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेत होती़ दहावी, बारावीचे बोर्ड पुणे येथे तर महाविद्यालये कोल्हापूरकडे अशी सोलापूर जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती  होती. आजही दहावी, बारावीचे बोर्ड पुणे येथेच आहे. मात्र २००४ साली सुशीलकुमार शिंदे हे महाराष्टÑाचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयांची अडचण लक्षात घेऊन सोलापूरसाठी स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती करुन तशी घोषणा केली. केवळ एका जिल्ह्यापुरते स्वतंत्र विद्यापीठ म्हणून महाराष्टÑाच्या शैक्षणिक क्षेत्रात सोलापूरची ओळख निर्माण झाली.सोलापूर विद्यापीठाची स्थापना ४ आॅगस्ट २००४ साली झाली. त्याचा उद्घाटन समारंभही सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती मंदिरात झाला. त्यानंतर अनेक अडचणींवर मात करुन पुणे रस्त्यावरील केगावजवळ सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली. तेव्हापासूनच सोलापूर विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न गाजू लागला. सर्वप्रथम शिवा संघटनेने सोलापूर विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर किंवा श्री सिध्देश्वर यांचे नाव देण्याची मागणी लावून धरली. कालांतराने जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचे नाव देण्यासाठी बाह्या सरसावल्या. अहिल्यादेवींचे विद्यापीठाला नाव देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) यांनी धनगर समाजबांधवांना पाठिंबा दिला. शिवसेनेने तर २०१३ साली राजमाता अहिल्यादेवी यांचे नाव असलेले बॅनरच विद्यापीठाच्या गेटला लावून नामांतराचे रणशिंग फुंकले.२०१७ साल उजाडले आणि विद्यापीठाच्या नामांतराचा विषय गाजू लागला. प्रथम धनगर समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आणि त्यानंतर लिंगायत समाजाची मोट बांधलेल्या ‘शिवा’ संघटनेनेही आपली ताकद पणाला लावून मोठा मोर्चा काढला. त्यामुळे शासनासमोर महात्मा बसवेश्वर, श्री सिध्देश्वर की राजमाता अहिल्यादेवी यांच्यापैकी कुणाचे नाव विद्यापीठाला द्यावे?, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला. असे असले तरी विद्यापीठाच्या सिनेट समितीने सोलापूर विद्यापीठच नाव असावे, असा आग्रह धरला.दरम्यानच्या काळात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठाकडे एका नावाचा प्रस्ताव आला असल्याचे सांगून सर्वांचीच उत्सुकता वाढवली. एवढेच नाहीतर विद्यापीठाला श्री सिध्देश्वर, राजमाता अहिल्यादेवी होळकर किंवा जिजाऊ यांचे नाव पुढे येण्याची शक्यता असल्याचे सांगून त्या उत्सुकतेत भर घातली. आणि आज (रविवारी) दुपारी अचानक मुख्यमंत्र्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव विद्यापीठाला देण्याची घोषणा  करुन धनगर समाजबांधवांना दिलासा दिला. यामुळे शहर आणि जिल्ह्यातील लिंगायत समाजबांधवांचा रोष मात्र शासनाने ओढवून घेतला.------------------------आजवरचे कुलगुरु- डॉ. इरेश स्वामी - २००४ ते २००७- डॉ. एन. एन. मालदार - २००७ (प्रभारी एक महिन्यासाठी)- डॉ. बी. पी. बंडगर - २००७ ते २०१२- डॉ. एन. जे. पवार - २०१२ (प्रभारी दोन महिन्यासाठी)- डॉ. एन. एन. मालदार - २०१२ पासून