शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सोलापूर विद्यापीठ नामांतराच्या निर्णयाने धनगर समाज खूष तर लिंगायत समाज नाराज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 14:07 IST

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्टÑातील धनगर समाजबांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठाची स्थापना ४ आॅगस्ट २००४ साली झाली२०१७ साल उजाडले आणि विद्यापीठाच्या नामांतराचा विषय गाजू लागलालिंगायत समाजबांधवांचा रोष मात्र शासनाने ओढवून घेतला

शंकर जाधवसोलापूर दि ६ : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्टÑातील धनगर समाजबांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे समस्त लिंगायत समाज नाराज झाल्याने या समाजाच्या कोंडीत सरकार सापडले आहे. या दोन्ही समाजातील बहुतांश मतदार भाजपच्या मागे असल्याने ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालये कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेत होती़ दहावी, बारावीचे बोर्ड पुणे येथे तर महाविद्यालये कोल्हापूरकडे अशी सोलापूर जिल्ह्याची शैक्षणिक स्थिती  होती. आजही दहावी, बारावीचे बोर्ड पुणे येथेच आहे. मात्र २००४ साली सुशीलकुमार शिंदे हे महाराष्टÑाचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयांची अडचण लक्षात घेऊन सोलापूरसाठी स्वतंत्र विद्यापीठाची निर्मिती करुन तशी घोषणा केली. केवळ एका जिल्ह्यापुरते स्वतंत्र विद्यापीठ म्हणून महाराष्टÑाच्या शैक्षणिक क्षेत्रात सोलापूरची ओळख निर्माण झाली.सोलापूर विद्यापीठाची स्थापना ४ आॅगस्ट २००४ साली झाली. त्याचा उद्घाटन समारंभही सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती मंदिरात झाला. त्यानंतर अनेक अडचणींवर मात करुन पुणे रस्त्यावरील केगावजवळ सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली. तेव्हापासूनच सोलापूर विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न गाजू लागला. सर्वप्रथम शिवा संघटनेने सोलापूर विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर किंवा श्री सिध्देश्वर यांचे नाव देण्याची मागणी लावून धरली. कालांतराने जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचे नाव देण्यासाठी बाह्या सरसावल्या. अहिल्यादेवींचे विद्यापीठाला नाव देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) यांनी धनगर समाजबांधवांना पाठिंबा दिला. शिवसेनेने तर २०१३ साली राजमाता अहिल्यादेवी यांचे नाव असलेले बॅनरच विद्यापीठाच्या गेटला लावून नामांतराचे रणशिंग फुंकले.२०१७ साल उजाडले आणि विद्यापीठाच्या नामांतराचा विषय गाजू लागला. प्रथम धनगर समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला आणि त्यानंतर लिंगायत समाजाची मोट बांधलेल्या ‘शिवा’ संघटनेनेही आपली ताकद पणाला लावून मोठा मोर्चा काढला. त्यामुळे शासनासमोर महात्मा बसवेश्वर, श्री सिध्देश्वर की राजमाता अहिल्यादेवी यांच्यापैकी कुणाचे नाव विद्यापीठाला द्यावे?, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला. असे असले तरी विद्यापीठाच्या सिनेट समितीने सोलापूर विद्यापीठच नाव असावे, असा आग्रह धरला.दरम्यानच्या काळात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठाकडे एका नावाचा प्रस्ताव आला असल्याचे सांगून सर्वांचीच उत्सुकता वाढवली. एवढेच नाहीतर विद्यापीठाला श्री सिध्देश्वर, राजमाता अहिल्यादेवी होळकर किंवा जिजाऊ यांचे नाव पुढे येण्याची शक्यता असल्याचे सांगून त्या उत्सुकतेत भर घातली. आणि आज (रविवारी) दुपारी अचानक मुख्यमंत्र्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव विद्यापीठाला देण्याची घोषणा  करुन धनगर समाजबांधवांना दिलासा दिला. यामुळे शहर आणि जिल्ह्यातील लिंगायत समाजबांधवांचा रोष मात्र शासनाने ओढवून घेतला.------------------------आजवरचे कुलगुरु- डॉ. इरेश स्वामी - २००४ ते २००७- डॉ. एन. एन. मालदार - २००७ (प्रभारी एक महिन्यासाठी)- डॉ. बी. पी. बंडगर - २००७ ते २०१२- डॉ. एन. जे. पवार - २०१२ (प्रभारी दोन महिन्यासाठी)- डॉ. एन. एन. मालदार - २०१२ पासून