शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

तालमी पडल्या ओस.. पैलवानांचे सुरु झाले हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:21 IST

करमाळा तालुक्याला कुस्तीची परंपरा आहे. तालुक्यातील ११८ गावांसह वाड्यावस्त्यांवर लोकसहभागातून तालीम बांधण्यात आलेल्या आहेत. जवळपास चार ते पाच हजार ...

करमाळा तालुक्याला कुस्तीची परंपरा आहे. तालुक्यातील ११८ गावांसह वाड्यावस्त्यांवर लोकसहभागातून तालीम बांधण्यात आलेल्या आहेत. जवळपास चार ते पाच हजार पैलवान या सर्व तालमीत दैनंदिन सराव करतात. तालुक्यात केम, जेऊर, वांगी, जिंती, देवीचामाळ, साडे, सालसे, आवाटी, कंदर, चिखलठाण, पांडे या गावांतील यात्रा, जत्रा व उरुसानिमित्त भव्य कुस्त्यांचे आखाडे भरवले जातात. यात्रा, जत्रा व उरुसानिमित्त होणाऱ्या कुस्त्याच्या स्पर्धांतून हे सर्व पैलवान आपला खुराक भागवतात.

कोरोना संसर्गाने गतवर्षी व यंदाच्या वर्षी कुस्त्यांचे आखाडे भरविले गेले नसल्याने पैलवानांचे आर्थिक रसद बंद पडली आहे. परिणामी, पैलवान मंडळी आर्थिक संकटात सापडली आहे. एक तर कोरोनाच्या भीतीने सराव बंद आहे. त्यातच कुस्त्यांचे आखाडे भरविले जात नसल्याने पैलवानांसमोर ‘इकडे आड, तिकडे विहीर’ असा पेच निर्माण झाला आहे. खुराकासाठी घरासमोर किती वेळा हात पसरावेत याचीही लाज पैलवानांना वाटू लागली आहे.

----

पैलवानांची परंपरा...

करमाळा तालुक्यातील जेऊरवाडीचे चंद्रहास निमगिरे व खडकी च बालारफी शेख हे दोघे महाराष्ट्र केसरी झाले, तर करमाळ्यातील विकी जाधव उपमहाराष्ट्र केसरी, तर लव्हे येथील अतुल पाटील डबल उपमहाराष्ट्र केसरी बनले होते. माजी आ. नारायण पाटील, पं.स.चे उपसभापती दत्ता सरडे, अफसर जाधव महाराष्ट्र चॅम्पियन होते. स्व. अण्णासाहेब जगताप, नामदेवराव जगताप, दिगंबरराव बागल, गोविंदबापू पाटील यांनी कुस्तीला राजकीय आश्रय मिळवून दिला.

--------

खुराकासाठी मदत करा

एका मल्लास खुराक व सरावसाठी महिन्याला साधारण २० हजार रुपये खर्च येतो. यात्रा, जत्रा व उरुसानिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्तीच्या आखाड्यातून मिळणाऱ्या बक्षीस रकमेतून गरीब पैलवान हा खर्च भागवतो. काही मल्ल तर या बक्षीस रकमेवरच विसंबून आहेत. स्पर्धा होत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. शासनाने अथवा दानशूर व्यक्तींनी मल्लांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र केसरी बालारफी शेख यांनी केली आहे.

----

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने कुस्ती स्पर्धांचा दुसरा सिझनही जात आहे. त्यामुळे पैलवानांसमोर आर्थिक अडचण निर्माण होऊ लागली आहे. आयपीएलची स्पर्धा होते. मात्र, कुस्तीचे आखाडे होत नाहीत. प्रेक्षकांशिवाय कुस्तीच्या स्पर्धा व्हाव्यात.

-अतुल पाटील, डबल उपमहाराष्ट्र केसरी

१७करमाळा

कोरोना संसर्गामुळे कुस्तीचे आखाडे ओस पडले आहेत.