शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसदादा भाविक, रुग्णांची अडवणूक थांबवा अन्‌ दिलासा द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:18 IST

वाहतूक शाखेचे पोलीस शहरापासून लांब एक ते दोन किलोमीटर अंतरावर तेही रोज एका मार्गावर थांबतात. राज्यातून स्वामी समर्थ महाराजांच्या ...

वाहतूक शाखेचे पोलीस शहरापासून लांब एक ते दोन किलोमीटर अंतरावर तेही रोज एका मार्गावर थांबतात. राज्यातून स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे वाहन थांबवून तपासणी करतात. तपासणी करण्यास काहीच हरकत नाही. पण सर्व कागदपत्रे सोबत असतानाही विनाकारण त्याच ठिकाणी थांबवून ठेवतात. यामुळे आमचा वेळ वाया जातोच, शिवाय पुढील नियोनजही कोलमडते. याचा आम्हाला त्रास होतो, असे पुणे येथील बालाजी चव्हाण या भाविकाने सांगितले.

हे वाहतूक पोलीस कधी गाणगापूर रोडवर तर कधी हैद्रा रोडवर, तर कधी वागदरी, नागणसूर, तोळणूर, सोलापूर, उडगी, सलगर, जेऊर, तडवळ, चप्पळगाव अशा वेगवेगळ्या मार्गावर थांबतात. यापैकी हैद्रा, गाणगापूर, सोलापूर मार्गावर सतत भाविकांची वर्दळ असते. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या भाविकांना त्रास होतो, असे चौधरी यांनी सांगितले.

वनस्पती औषधांसाठी रुग्णांची ये-जा

अक्कलकोट तालुक्यातील भोसगे, साफळे, मदगुणकी, इब्राहिमपूर या गावात प्रत्येक बुधवारी व रविवारी असे आठवड्यातून दोन दिवस लकवा व कावीळ झालेल्या रुग्णांना वनस्पती औषध दिले जाते. यासाठी दूरवरून रुग्ण व त्यांचे नातेवाईक खासगी वाहन करून येतात. त्यांचे वाहनही अडविले जाते, असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

कोट ::::::::

काही दिवसांपूर्वी मला लकवा मारला होता. त्यामुळे इब्राहिमपूर येथे उपचारासाठी टमटम भाड्याने करून जात होतो. तेव्हा अक्कलकोट एमएसईबी कार्यालयाजवळ वाहतूक पोलिसांनी अडवले. त्यांना सत्य परिस्थिती सांगितली. शिवाय वाहकाकडे सर्व कागदपत्रेसुद्धा होती, तरीही आमचे काहीही न ऐकता पुढे जाण्यास मज्जाव केला. यात्रा आम्हाला त्रास झाला.

- मल्लिनाथ मेटगे, रुग्ण

कोट :::::::

वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करावी. विनाकारण भाविक किंवा रुग्णांना त्रास देणे चुकीचे आहे. असे कोण करीत असेल तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल.

- सूर्यकांत कोकणे,

जिल्हा वाहतूक विभाग प्रमुख