शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विकास सोसायट्यांनी पूरक व्यवसाय सुरू करावेत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, वडवळ येथे विविध विकासकामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 16:16 IST

राज्यात ५ हजार विकास सोसायट्यांच्या मार्फत हे धोरण राबविण्याचा आपला प्रयत्न आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासाचे चित्र नक्की बदलेल. यासाठी जिल्हा बँकांनी पुढाकार घ्यावा, आपण त्यास सर्वतोपरी सहकार्य करू, असे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले.

ठळक मुद्देउजनीच्या पाण्याचे नियोजन व ऊसदराबाबत बैठक घेण्याचे नियोजन सुरूसध्याचे एफआरपी धोरण बदलणे गरजेचे असून एफआरपी मागील वर्षीच्या रिकव्हरीवर न देता चालू वर्षाच्या रिकव्हरीवर देणे योग्य ठरणार आहेग्रामीण उद्योजकता कार्यक्रम अंतर्गत बचत गटांना ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.  

आॅनलाइन लोकमत सोलापूरवडवळ दि १ : राज्यातील विकास सोसायट्यांनी केवळ कर्ज वाटप करणे व वसूल करणे, हीच पारंपरिक कामे न करता गाव पातळीवर पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करून त्याचे मार्केटिंग करावे. अशा प्रकारे राज्यात ५ हजार विकास सोसायट्यांच्या मार्फत हे धोरण राबविण्याचा आपला प्रयत्न आहे. यामुळे ग्रामीण भागातील विकासाचे चित्र नक्की बदलेल. यासाठी जिल्हा बँकांनी पुढाकार घ्यावा, आपण त्यास सर्वतोपरी सहकार्य करू, असे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले.मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतर व नूतनीकरण, शहीद जवान विश्वनाथ मोरे स्मारक भूमिपूजन, बजाज आॅटो व स्वयंशिक्षण प्रयोग पुणे यांचे शुद्ध पाणी प्रकल्प, १४ व्या वित्त आयोगातून विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील होते.पुढे बोलताना देशमुख यांनी उजनीच्या पाण्याचे नियोजन व ऊसदराबाबत बैठक घेण्याचे नियोजन सुरू असून पुढील पाणीटंचाई होऊ नये, यासाठी पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवणे गरजेचे आहे, असे सांगितले.जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी शेतकºयांना सरसकट कर्जमाफी हाच पर्याय योग्य आहे. यामुळे त्यांना न्याय मिळणार असून सध्या उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही शेतीला पाणी वाटपाचे नियोजन झाले नसून पिकांसाठी पाच पाण्याच्या पाळ्या सोडणे आवश्यक आहे. सध्याचे एफआरपी धोरण बदलणे गरजेचे असून एफआरपी मागील वर्षीच्या रिकव्हरीवर न देता चालू वर्षाच्या रिकव्हरीवर देणे योग्य ठरणार आहे. ग्रामीण भागातील अर्थकारण ऊस कारखानदारीवर अवलंबून आहे. जर हे साखर कारखाने उद्ध्वस्त झाले तर शेतकरी उद्ध्वस्त होतील, यासाठी शासनाने आपल्या एफआरपी धोरणात बदल करणे गरजेचे आहे, असे सांगितले.यावेळी ग्रामपंचायत व स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने प्रारंभ ग्रामीण उद्योजकता कार्यक्रम अंतर्गत बचत गटांना ५० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.  यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, जि. प. सदस्य तानाजी खताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, सभापती समता गावडे, उपसभापती साधना देशमुख, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, सतीश काळे, पो. नि. राजेंद्र मस्के, प्रकाश चव्हाण, सुरेश शिवपूजे, नागनाथ मोरे, दिलीप बाबर, हरिदास पवार, सचिन चव्हाण, श्रीकांत शिवपूजे, शहाजी देशमुख, देविदास लेंगरे, सरपंच स्वप्नाली लेंगरे, उपसरपंच धनाजी चव्हाण, आबा बाबर, शिवाजी साळुंखे, राजेंद्र माने, अज्ञान माने, ग्रा. पं. सदस्य साधना देशमुख, पोपट मळगे, प्रीती माने, तात्या नाईकनवरे, शाहू धनवे, नामदेव पवार, अमोल शिंदे, राहुल मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी व्ही. आर. देशमुख, किरण माने, रेश्मा कांबळे, नंदकिशोर बागवाले,  दशरथ मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन राजाराम बाबर यांनी केले. आभार शहाजी देशमुख यांनी मानले.---------------शहीद स्मारकासाठी ५ लाख रूपये-शहीद जवान विश्वनाथ मोरे यांच्या स्मारकासाठी जि. प. सदस्य तानाजी खताळ, अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे यांनी जि. प. मधून ५ लाख रुपये तरतूद केली असून हे स्मारक आता वेळेत पूर्ण होणार आहे. -शुद्ध पाणी प्रकल्पामुळे आता दर एक तासाला १ हजार लिटर पाणी शुद्ध स्वरूपात मिळणार असून ६ रुपयांमध्ये २० लिटर पाणी आता भाविक व ग्रामस्थांना मिळणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख