शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ऊसाच्या फडातही देशमुख शाहीचे राजकारण सहकारमंत्री: आठ दिवसांनी बैठक; पालकमंत्री: उद्याच घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 13:15 IST

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊस दराबाबत कोल्हापूरमध्ये रविवारी काढलेला तोडगा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना मान्य नाही.  सहकारमंत्री सुभाष देशमुख किंवा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून सोलापूर जिल्ह्यातही बैठक झाली पाहिजे, अशी शेतकरी संघटनांच्या नेत्यांची मागणी आहे.

ठळक मुद्देसहकारमंत्र्यांवर वेळकाढूपणाचा आरोप करीत शेतकरी संघटना संतापल्या साखर कारखानदार यांच्यात संघर्षाची चिन्हेपालकमंत्री म्हणाले, उद्याच बैठक लावू 

राकेश कदमसोलापूर दि ७ : साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊस दराबाबत कोल्हापूरमध्ये रविवारी काढलेला तोडगा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना मान्य नाही.  सहकारमंत्री सुभाष देशमुख किंवा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून सोलापूर जिल्ह्यातही बैठक झाली पाहिजे, अशी शेतकरी संघटनांच्या नेत्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू न तत्काळ बैठक घेण्याची तयारी दर्शविली आहे तर सहकारमंत्र्यांनी १३ नोव्हेंबरची वेळ दिली आहे. सहकारमंत्र्यांवर वेळकाढूपणाचा आरोप करीत शेतकरी संघटना अधिकच संतापल्या आहेत. पालकमंत्री देशमुख यावर काय डाव टाकतात याकडे लक्ष आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी १ नोव्हेंबरपासून ऊस गाळपास सुरुवात केली आहे. ऊस दरावरून अनेक ठिकाणी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात संघर्षाची चिन्हे आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून रविवारी कोल्हापुरात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. तीत एफआरपी अधिक २०० रुपये देण्यावर एकमत झाले. त्यामुळे राज्यभरातील ऊसदराची कोंडी फुटली, असे वाटत होते, परंतु सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी हा तोडगा मान्य केलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना अशा विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन याप्रश्नी पुढाकार घेण्याची विनंती केली. -------------------पालकमंत्री म्हणाले, उद्याच बैठक लावू च्पालकमंत्र्यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर उतारा, उसाचे वजन यात घोळ घातले जात असल्याच्या तक्रारी केल्या. गेल्यावर्षी साखर दर कोसळलेले असतानाही कारखानदारांनी २५०० रुपयांची पहिली उचल दिली होती. आता ते साखर उताराच कमी दाखवत आहेत. त्यामुळे आम्हाला प्रतिटन जास्तीत जास्त २१०० रुपये मिळतील. ही फसवणूक आहे. यंदा साखरेला क्विंटलमागे ३३०० रुपये मिळत असल्याने उसाला टनामागे ३ हजार रुपये मिळालेच पाहिजेत. त्यावर पालकमंत्र्यांनी वजन मापे प्रशासन, उत्पादन शुल्क अशा विविध खात्यांसोबत उद्याच बैठक लावतो, असे आश्वासन दिले. आमदार प्रशांत परिचारक यांनाही फोन लावला. परिचारकांनी त्यांना यात सहकारमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालून तोडगा काढू, असे आश्वासन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले. -------------------सहकारमंत्री म्हणाले, लवकर हवे असेल तर मुंबईला या च्शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची त्यांच्या सोलापुरातील कार्यालयात जाऊन भेट घेतली. ‘बापू , तुम्हीही कारखानदार आहात. तुम्हीच पहिली उचल जाहीर करू न आदर्श ठेवा’, अशी विनंती केली. साखरेचा दर, साखर उताºयाचा घोळ असे विषयही कानावर घालून तोडग्यासाठी बैठक बोलवा, अशी मागणी केली. सहकारमंत्र्यांनी एक आठवड्यानंतरची वेळ दिली. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एवढा उशीर नको. लवकर बैठक घ्या, असे म्हणताच लवकर हवे असेल तर मुंबईला या, असे सांगितले. त्यामुळे शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी संतापून बाहेर पडले.-----------------------मुख्यमंत्री लक्ष घालतीलपालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ऊसदर, साखर उताºयाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. यावर लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरूच राहील. - दीपक भोसले, रयत क्रांती संघटना, सोलापूर.  ------------------------सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडायला हवी                होती, परंतु ते वेळकाढूपणा करीत आहेत. ते साखर कारखानदार असल्यामुळे शेतकºयांच्या हिताचा निर्णय घेतील, असे वाटत नाही. तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. - संजय पाटील-घाटणेकर, प्रदेशाध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना.