शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ऊसाच्या फडातही देशमुख शाहीचे राजकारण सहकारमंत्री: आठ दिवसांनी बैठक; पालकमंत्री: उद्याच घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 13:15 IST

साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊस दराबाबत कोल्हापूरमध्ये रविवारी काढलेला तोडगा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना मान्य नाही.  सहकारमंत्री सुभाष देशमुख किंवा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून सोलापूर जिल्ह्यातही बैठक झाली पाहिजे, अशी शेतकरी संघटनांच्या नेत्यांची मागणी आहे.

ठळक मुद्देसहकारमंत्र्यांवर वेळकाढूपणाचा आरोप करीत शेतकरी संघटना संतापल्या साखर कारखानदार यांच्यात संघर्षाची चिन्हेपालकमंत्री म्हणाले, उद्याच बैठक लावू 

राकेश कदमसोलापूर दि ७ : साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी ऊस दराबाबत कोल्हापूरमध्ये रविवारी काढलेला तोडगा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांना मान्य नाही.  सहकारमंत्री सुभाष देशमुख किंवा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून सोलापूर जिल्ह्यातही बैठक झाली पाहिजे, अशी शेतकरी संघटनांच्या नेत्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू न तत्काळ बैठक घेण्याची तयारी दर्शविली आहे तर सहकारमंत्र्यांनी १३ नोव्हेंबरची वेळ दिली आहे. सहकारमंत्र्यांवर वेळकाढूपणाचा आरोप करीत शेतकरी संघटना अधिकच संतापल्या आहेत. पालकमंत्री देशमुख यावर काय डाव टाकतात याकडे लक्ष आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी १ नोव्हेंबरपासून ऊस गाळपास सुरुवात केली आहे. ऊस दरावरून अनेक ठिकाणी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात संघर्षाची चिन्हे आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून रविवारी कोल्हापुरात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. तीत एफआरपी अधिक २०० रुपये देण्यावर एकमत झाले. त्यामुळे राज्यभरातील ऊसदराची कोंडी फुटली, असे वाटत होते, परंतु सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी हा तोडगा मान्य केलेला नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना अशा विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सोमवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन याप्रश्नी पुढाकार घेण्याची विनंती केली. -------------------पालकमंत्री म्हणाले, उद्याच बैठक लावू च्पालकमंत्र्यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी साखर उतारा, उसाचे वजन यात घोळ घातले जात असल्याच्या तक्रारी केल्या. गेल्यावर्षी साखर दर कोसळलेले असतानाही कारखानदारांनी २५०० रुपयांची पहिली उचल दिली होती. आता ते साखर उताराच कमी दाखवत आहेत. त्यामुळे आम्हाला प्रतिटन जास्तीत जास्त २१०० रुपये मिळतील. ही फसवणूक आहे. यंदा साखरेला क्विंटलमागे ३३०० रुपये मिळत असल्याने उसाला टनामागे ३ हजार रुपये मिळालेच पाहिजेत. त्यावर पालकमंत्र्यांनी वजन मापे प्रशासन, उत्पादन शुल्क अशा विविध खात्यांसोबत उद्याच बैठक लावतो, असे आश्वासन दिले. आमदार प्रशांत परिचारक यांनाही फोन लावला. परिचारकांनी त्यांना यात सहकारमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालून तोडगा काढू, असे आश्वासन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना दिले. -------------------सहकारमंत्री म्हणाले, लवकर हवे असेल तर मुंबईला या च्शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची त्यांच्या सोलापुरातील कार्यालयात जाऊन भेट घेतली. ‘बापू , तुम्हीही कारखानदार आहात. तुम्हीच पहिली उचल जाहीर करू न आदर्श ठेवा’, अशी विनंती केली. साखरेचा दर, साखर उताºयाचा घोळ असे विषयही कानावर घालून तोडग्यासाठी बैठक बोलवा, अशी मागणी केली. सहकारमंत्र्यांनी एक आठवड्यानंतरची वेळ दिली. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एवढा उशीर नको. लवकर बैठक घ्या, असे म्हणताच लवकर हवे असेल तर मुंबईला या, असे सांगितले. त्यामुळे शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी संतापून बाहेर पडले.-----------------------मुख्यमंत्री लक्ष घालतीलपालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी ऊसदर, साखर उताºयाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. यावर लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरूच राहील. - दीपक भोसले, रयत क्रांती संघटना, सोलापूर.  ------------------------सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडायला हवी                होती, परंतु ते वेळकाढूपणा करीत आहेत. ते साखर कारखानदार असल्यामुळे शेतकºयांच्या हिताचा निर्णय घेतील, असे वाटत नाही. तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. - संजय पाटील-घाटणेकर, प्रदेशाध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना.