शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यांच्या वैभवावरच राष्ट्राचे वैभव : सुभाष देशमुख, गांधी फोरम पुरस्काराचे थाटात वितरण

By admin | Updated: June 3, 2017 17:02 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : खेडी स्वयंपूर्ण झाली तरच राष्ट्र स्वयंपूर्ण होईल, असे महात्मा गांधी नेहमी म्हणायचे. खेड्यांच्या वैभवावरच राष्ट्राचे वैभव आहे, हेच शाश्वत सत्य आहे. गांधीजींचेच हेच कार्य आम्हीही करीत आहोत, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.गांधी फोरम नवी दिल्लीच्या वतीने हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये पत्रमहर्षी स्व. रंगाअण्णा वैद्य यांच्या २१ व्या स्मृतिनिमित्त गांधी फोरम पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. त्याप्रसंगी देशमुख बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी गांधी फोरम नवी दिल्लीचे केंद्रीय प्रभारी अध्यक्ष पुरूषोत्तम बलदवा होते. प्रमुख पाहुणे महापौर शोभा बनशेट्टी, माजी आमदार निर्मला ठोकळ, मुंबई फोरमचे अध्यक्ष अरूण कुलकर्णी यांच्यासह सत्कारमूर्ती लोकमतचे संपादक राजा माने, पंचांगकर्ते मोहन दाते, प्रभाकर वनकुद्रे, माजी महापौर डॉ. पुंजाल, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने व्यासपीठावर उपस्थित होते.प्रारंभी आदर्श समाजसेवा पुरस्काराने पाचही सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सुभाष देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना सहकारमंत्री पुढे म्हणाले, महात्मा गांधींनी खेड्याकडे चला, असा मंत्र दिला. तो अनुसरण्याची गरज आहे. आम्ही मंत्री झाल्याबरोबर खेड्यातील सोसायट्यांमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले. त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सातत्याने करीत असतो. अण्णांची आठवण सांगून ते म्हणाले, राज्यकर्ते म्हणून गरिबांची सेवा करा, असा संदेश त्यांनी अखेरच्या काळात आपणास दिला होता. लोकमंगलच्या माध्यमातून ही सेवा सुरू आहे. लोकमंगलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून जनसेवेचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. पुरूषोत्तम बलदवा यांनी आपल्या भाषणातून अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला. अण्णांच्या कार्याचे स्मरण महाराष्ट्राला सातत्याने होत राहावे यासाठी त्यांचा पुतळा शहरात उभारला जावा, अशी मागणी त्यांनी मंत्र्यांपुढे केली. यासोबतच दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र आणि ज्येष्ठ पत्रकार या नात्याने अण्णांच्या नावाने ग्रामीण पत्रकार अध्ययन केंद्र सुरू करावे आणि सोलापूरच्या दोन्ही मंत्र्यांनी फोरमच्या रक्तसंकलन मोहिमेसह सर्व सामाजिक उपक्रमात पाठीशी राहावे, अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली.माजी आमदार निर्मला ठोकळ यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गांधी फोरमचे अध्यक्ष मोहन वैद्य यांनी केले. संचालन नागेश खमितकर तर आभार सातलिंग शटगार यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान श्रीशैल हत्तुरे, बी.के. मुल्ला, दिलीप पतंगे, अभिजित संगावा, अरूण कुलकर्णी, रघुनाथ बनसोडे आदींचाही विशेष सत्कार करण्यात आला. वीणा बादरायणी यांनी महात्मा गांधींची आवडती भजने सादर केली.------------------ सत्काराला उत्तर देताना लोकमतचे संपादक राजा माने यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन आणि कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. हा धागा पकडून सुभाष देशमुख म्हणाले, सात-बारा कोरा करण्याच्या मागणीवर सरकार सहमत आहे. पण या मागणीवर चिंतन व्हावे. २००७-०८ मध्ये कुणाचे सात-बारा कोरे झाले हे आधी समजून घ्यावे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या गरजा कटाक्षाने जाणून घेत आहेत. वीज, पाणी, खत, हमीभाव, नाशिवंत मालाची विक्रीव्यवस्था याकडे आवर्जून लक्ष घालत आहेत. जलयुक्त शिवाराच्या यशस्वीतेसाठी स्वत: बांधावर पोहोचत आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. सध्याचा शेतकऱ्यांचा संप म्हणजे आताचा उद्रेक नव्हे तर, गेल्या अनेक वर्षांतील अन्यायाचा हा परिणाम आहे. अन्नदात्याच्या पाठीशी राहा, असे आवाहनही त्यांनी केले.