शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

माध्यमिक शाळांच्या गुणवत्तेत वाढ करण्याची शिक्षण उपसंचालकांची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:22 IST

कुर्डूवाडी : कोरोनाच्या काळात विद्यार्थी हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावेत म्हणून शिक्षकांची व मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढली आहे. पालकांचा विश्वास ...

कुर्डूवाडी : कोरोनाच्या काळात विद्यार्थी हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावेत म्हणून शिक्षकांची व मुख्याध्यापकांची जबाबदारी वाढली आहे. पालकांचा विश्वास संपादन करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण शिक्षण देऊन गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी कुर्डूवाडी येथील आयोजित कार्यशाळेत केले.

आदिशक्ती शिक्षण संस्था वेताळवाडी संचलित येथील आदर्श पब्लिक स्कूलच्या सभागृहात माढा तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची गुणवत्तेविषयी आढावा बैठक व कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे बोलत होते. त्यांंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीला सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुलभा वटारे, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, आदर्श पब्लिक स्कूलचे अध्यक्ष अमोल सुरवसे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना उपसंचालक उकिरडे यांनी माढा तालुक्यातून नामांकित शाळा नावारूपाला आणून क्रियाशील मुख्याध्यापक म्हणून कारकीर्दीचा ठसा उमठवण्याचे आवाहन केले. विद्यार्थी केंद्रित शिक्षण देऊन शालेय गुणवत्ता सुधारा. त्याचबरोबरच एन.टी.एस.स्कॉलरशिप यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत आपले विद्यार्थी चमकावा, असेही आवाहन सर्व मुख्याध्यापकांना केले.

यावेळी उपशिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी मुख्याध्यापकांना तंत्रस्नेही बना आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा व यावेळी पालकांच्या अडचणी समजून घ्या, अशा सूचना केल्या.

आदर्श पब्लिक स्कूलचे संस्थापक अमोल सुरवसे, संस्थेचे संचालक शिवाजी हावळे, प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे यांच्यासह माढा तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

................

१६ कुर्डूवाडी स्कूल

माढा तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांंना मार्गदर्शन करताना पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे.