शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पतसंस्थांच्या ठेवींना विमासुरक्षेचा ठेंगा

By admin | Updated: December 11, 2014 23:46 IST

सहकार आयुक्तांचे आदेश : विमा संरक्षण नसल्याचे फलक झळकविण्याची सूचना

सदानंद औंधे -मिरज -बुडित पतसंस्थांतील ठेवी परत देण्याच्या ठेवीदारांच्या तगाद्यामुळे वैतागलेल्या सहकार विभागाने आता पतसंस्थांतील ठेवींना विमा संरक्षण नसल्याचा इशारा फलक लावण्याचे आदेश सर्व पतसंस्थांना दिले आहेत. सहकार आयुक्तांच्या या परिपत्रकानुसार, पतसंस्थांत ठेवी ठेवल्यास शासन जबाबदार नसल्याचा इशारा अप्रत्यक्षरित्या ठेवीदारांना देऊन सहकार विभागाने हात झटकले आहेत.आर्थिक अडचणीत असलेल्या पतसंस्थांत ठेवीदारांची फसवणूक टाळण्यासाठी पतसंस्थांनी त्यांची आर्थिक स्थिती जाहीर करावयाची आहे. सहकारी पतसंस्थांमधील ठेवीस कोणतेही विमा संरक्षण नाही, असा फलक लावून संस्थेची आर्थिक माहिती उघड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे बंद पडलेल्या पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे हजारो कोटी रूपये अडकले आहेत. पतसंस्थांमध्ये मोठ्याप्रमाणात ठेवी अडकल्याने ठेवीदारांत असंतोष आहे. ठेवीदारांच्या असंतोषाचा सामना करणाऱ्या सहकार विभागाने गेल्या दोन वर्षात सहकार अधिनियमात सुधारणा करून, पतसंस्थेचे दैनंदिन कामकाज, ठेव संकलन, कर्जवाटप, वसुलीचे अधिकार व सर्व जबाबदारी संस्थांच्या संचालक मंडळावर टाकली आहे. मात्र बँकांप्रमाणे पतसंस्थांतील ठेवींना विमा संरक्षण नसल्याने पतसंस्थेत ठेव ठेवून ठेवीदार अडचणीत येऊ नयेत, यासाठी पतसंस्थेतील ठेवीस कोणतेही विमा संरक्षण नसल्याचा ठळक अक्षरातील फलक पतसंस्थेत लावण्याचा आदेश सहकार आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे. ठेवीदारांना सहकार विभागाने दिला अप्रत्यक्ष इशारापतसंस्थेच्या मागील तीन वर्षांच्या लेखापरीक्षणाचा, वर्ग तीन वर्षातील नफा-तोटा, संस्थेने केलेल्या गुंतवणुकीचा तपशील, ठेवी, कर्जाचे प्रमाण, कर्जवसुली रक्कम व प्रमाण अनुत्पादित कर्जे आदींची माहिती फलकावर लिहून, वेळोवेळी ती अद्ययावत करावयाची आहे. पतसंस्थेची ही सर्व आर्थिक माहिती इंटरनेटवरही प्रसिध्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या पतसंस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. पतसंस्थांनी ठेवीदारांच्या प्रबोधनासाठी संस्थेची आर्थिक माहिती उघड करावी, असेही परिपत्रकात म्हटले असले तरी, ठेवींची जबाबदारी टाळण्यासाठी सहकार विभागाने ठेवीदारांना इशारा दिल्याचे मानले जात आहे. सहकार आयुक्तांच्या आदेशामुळे आता पतसंस्थांना आर्थिक स्थितीची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रसिध्द करावी लागणार आहे.सांगली जिल्ह्यात ८८ संस्थांचे वाजले बारासांगली जिल्ह्यात ८८ पतसंस्था अडचणीत आल्याने त्यातील ठेवीदारांच्या १२१ कोटीच्या ठेवी अडकल्या होत्या. शासनाचे पॅकेज व कर्जवसुलीद्वारे गेल्या पाच वर्षात सुमारे ८० कोटी वसूल झाले, तरी अद्याप पतसंस्थांत अडकलेल्या ४० कोटींच्या ठेवी असुरक्षित आहेत. पतसंस्थांवर नियंत्रण ठेवणे शासनाला जमत नाही. त्यामुळे इशाऱ्याचे फलक लावण्यासारख्या किरकोळ उपाययोजना करण्यात येत आहेत. बँकांप्रमाणे पतसंस्थांच्या आर्थिक व्यवहाराचे नियंत्रण रिझर्व बँकेकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे रवींद्र ढोबळे यांनी केली आहे.