शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थांच्या ठेवींना विमासुरक्षेचा ठेंगा

By admin | Updated: December 11, 2014 23:46 IST

सहकार आयुक्तांचे आदेश : विमा संरक्षण नसल्याचे फलक झळकविण्याची सूचना

सदानंद औंधे -मिरज -बुडित पतसंस्थांतील ठेवी परत देण्याच्या ठेवीदारांच्या तगाद्यामुळे वैतागलेल्या सहकार विभागाने आता पतसंस्थांतील ठेवींना विमा संरक्षण नसल्याचा इशारा फलक लावण्याचे आदेश सर्व पतसंस्थांना दिले आहेत. सहकार आयुक्तांच्या या परिपत्रकानुसार, पतसंस्थांत ठेवी ठेवल्यास शासन जबाबदार नसल्याचा इशारा अप्रत्यक्षरित्या ठेवीदारांना देऊन सहकार विभागाने हात झटकले आहेत.आर्थिक अडचणीत असलेल्या पतसंस्थांत ठेवीदारांची फसवणूक टाळण्यासाठी पतसंस्थांनी त्यांची आर्थिक स्थिती जाहीर करावयाची आहे. सहकारी पतसंस्थांमधील ठेवीस कोणतेही विमा संरक्षण नाही, असा फलक लावून संस्थेची आर्थिक माहिती उघड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आर्थिक अडचणीमुळे बंद पडलेल्या पतसंस्थांमध्ये ठेवीदारांचे हजारो कोटी रूपये अडकले आहेत. पतसंस्थांमध्ये मोठ्याप्रमाणात ठेवी अडकल्याने ठेवीदारांत असंतोष आहे. ठेवीदारांच्या असंतोषाचा सामना करणाऱ्या सहकार विभागाने गेल्या दोन वर्षात सहकार अधिनियमात सुधारणा करून, पतसंस्थेचे दैनंदिन कामकाज, ठेव संकलन, कर्जवाटप, वसुलीचे अधिकार व सर्व जबाबदारी संस्थांच्या संचालक मंडळावर टाकली आहे. मात्र बँकांप्रमाणे पतसंस्थांतील ठेवींना विमा संरक्षण नसल्याने पतसंस्थेत ठेव ठेवून ठेवीदार अडचणीत येऊ नयेत, यासाठी पतसंस्थेतील ठेवीस कोणतेही विमा संरक्षण नसल्याचा ठळक अक्षरातील फलक पतसंस्थेत लावण्याचा आदेश सहकार आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे. ठेवीदारांना सहकार विभागाने दिला अप्रत्यक्ष इशारापतसंस्थेच्या मागील तीन वर्षांच्या लेखापरीक्षणाचा, वर्ग तीन वर्षातील नफा-तोटा, संस्थेने केलेल्या गुंतवणुकीचा तपशील, ठेवी, कर्जाचे प्रमाण, कर्जवसुली रक्कम व प्रमाण अनुत्पादित कर्जे आदींची माहिती फलकावर लिहून, वेळोवेळी ती अद्ययावत करावयाची आहे. पतसंस्थेची ही सर्व आर्थिक माहिती इंटरनेटवरही प्रसिध्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या पतसंस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. पतसंस्थांनी ठेवीदारांच्या प्रबोधनासाठी संस्थेची आर्थिक माहिती उघड करावी, असेही परिपत्रकात म्हटले असले तरी, ठेवींची जबाबदारी टाळण्यासाठी सहकार विभागाने ठेवीदारांना इशारा दिल्याचे मानले जात आहे. सहकार आयुक्तांच्या आदेशामुळे आता पतसंस्थांना आर्थिक स्थितीची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रसिध्द करावी लागणार आहे.सांगली जिल्ह्यात ८८ संस्थांचे वाजले बारासांगली जिल्ह्यात ८८ पतसंस्था अडचणीत आल्याने त्यातील ठेवीदारांच्या १२१ कोटीच्या ठेवी अडकल्या होत्या. शासनाचे पॅकेज व कर्जवसुलीद्वारे गेल्या पाच वर्षात सुमारे ८० कोटी वसूल झाले, तरी अद्याप पतसंस्थांत अडकलेल्या ४० कोटींच्या ठेवी असुरक्षित आहेत. पतसंस्थांवर नियंत्रण ठेवणे शासनाला जमत नाही. त्यामुळे इशाऱ्याचे फलक लावण्यासारख्या किरकोळ उपाययोजना करण्यात येत आहेत. बँकांप्रमाणे पतसंस्थांच्या आर्थिक व्यवहाराचे नियंत्रण रिझर्व बँकेकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे रवींद्र ढोबळे यांनी केली आहे.