शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

माऊलींच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान

By admin | Updated: June 11, 2014 00:22 IST

आषाढी: शितोळे-अंकलीहून १९ जूनला आळंदीत दाखल होणार

अकलूज : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याकरिता श्रीमंत ऊर्जितसिंंह शितोळे सरकार यांच्या अश्वांनी मंगळवारी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले. हे अश्व गुरुवार दि. १९ जून रोजी आळंदीत दाखल होतील.श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा शुक्रवार दि. २० जून रोजी आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पालखी सोहळ्याकरिता अंकोलीचे श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या अश्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोमवारी सकाळी ९.३० वाजता श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या माऊली मंदिरातून एक दिंडी शितोळे सरकार यांच्या राजवाड्यावर पोहोचली. त्यानंतर शितोळे सरकार यांनी माऊली व जरीपटक्याची विधिवत पूजा व आरती केली. त्यानंतर जरीपटका स्वाराकडे सुपूर्द करण्यात आला. श्रीमंत महादजीराजे शितोळे सरकार यांनी सकाळी ९.४५ वाजता अश्वांची विधिवत पूजा केली. यावर्षी माऊलींच्या सेवेत माऊलींचा अश्व म्हणून हिरा नावाचा तर स्वाराचा अश्व म्हणून गजानन दाखल झाले आहेत. प्रथमच माऊलींच्या अश्वावर चांदीचे सिंहासन व छत्र बसविण्यात आले आहे.या सिंहासन व छत्राची विधिवत पूजा करण्यात येऊन गावामधून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर अश्व श्री क्षेत्र आळंदीकडे मार्गस्थ झाले. शितोळे सरकार यांचे प्रतिनिधी म्हणून तुकाराम कोळी हे अश्वासह आळंदीकडे मार्गस्थ झाले.म्हैसाळ मुक्कामानंतर अश्व तुंग, पेठनाका, वाहगाव, सातारा, भुर्इंज, शिरवळ, शिंदेवाडी, पुणेमार्गे शुक्रवार दि. १९ रोजी श्री क्षेत्र आळंदीत दाखल होणार आहेत.