कुडरूवाडी : माढा तालुका ठेव सुरक्षा लढा समितीच्या वतीने विविध पतसंस्थांतील ठेवीदारांची मुदत संपूनही अद्याप ज्येष्ठ नागरिकांना ठेवी मिळाल्या नाहीत. लवकरात लवकर ठेवी परत मिळाव्यात, यासाठी आंदोलन करण्याचा ठराव वार्षिक सभेत करण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष किरण गोडसे होते.
पतसंस्थांतील ठेवीदारांच्या ठेवींची मुदत संपून आठ वर्षे होत आहेत. तरीही ठेवी पतसंस्थांनी परत न केल्याने समितीच्या वतीने वारंवार आंदोलने, मोर्चे काढले आहेत. त्यावेळी सहकार केवळ खोटी आश्वासने देऊन ज्येष्ठ नागरिक, विधवा, महिला, अपंग ठेवीदार यांची क्रूर चेष्टा करण्यात आली. याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी वसंत भुडवे, संदिपान जगताप, भारत कन्हेरे, मारुती खटके, वसंत कुलकर्णी, शंकर लंगोटे, मोहन घळके,परमानंद कदम, रामभाऊ बागल, अशोक पाटील, कुसूम पवार, भगवान गावड, भारत गाडे, नारायण माने यांच्यासह अनेकजण उपस्थित होत्या. सूत्रसंचालन शंकर सुतार यांनी केले तर आभार अल्लाहुसेन शिकलगार यांनी मानले. (वार्ताहर)