शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

तारणाच्या धोरणाने ऊस उत्पादक निराश

By admin | Updated: May 11, 2015 23:48 IST

शासनाचा निर्णय : एफआरपीनुसार दर मिळणार का?

अशोक डोंबाळे - सांगली  दर गडगडल्यामुळे साखर कारखाने ऊस उत्पादकांना किमान वैधानिक किंमत (एफआरपी) देऊ शकत नसल्याने राज्य शासनाने एप्रिलमध्ये दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. यामुळे ऊस उत्पादक एफआरपी रकमेकडे दीड महिन्यापासून डोळे लावून बसला होता. त्यांच्या पदरी शासनाच्या आदेशामुळे निराशाच पडली आहे. कारण, जो साखर कारखाना शासनाला तारण देईल, त्यांनाच पॅकेजचा लाभ मिळणार आहे. काही कारखानदार पॅकेजच्या मोबदल्यात शासनाला काहीही तारण देण्यास इच्छुक नाहीत. यामुळे शासन आणि कारखानदारांच्या संघर्षात ऊस उत्पादकांचा मात्र ‘फुटबॉल’ झाल्याचे चित्र दिसत आहे.जिल्ह्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी ७७ लाख २६ हजार ३६९ टन उसाचे गाळप झाले असून, ९४ लाख २६ हजार १९८ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखरेचे दर गडगडल्यामुळे कारखान्यांकडे पूर्वीची साखरही शिल्लक आहे. यातच नवीन साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे त्यांची गोदामे भरली आहेत. साखरेचे दर उतरले म्हणून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला नाही. या शेतकऱ्यांच्या उसाला शासनाने ठरवून दिलेला हमी भाव तर मिळालाच पाहिजे. परंतु, साखर कारखान्यांनी साखरेचे दर उतरल्यामुळे कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढल्याचे सांगितले आहे. कारखाने आर्थिक अडचणीत असल्याचे कारण पुढे करून एफआरपीनुसार दर देण्यास टाळाटाळ करीत आहेत. सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांपैकी १२ साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार दर दिला नाही. या कारखान्यांकडे शेतकऱ्यांची सुमारे २०४ कोटींची थकबाकी आहे. साखर कारखान्यांना एफआरपी दर शेतकऱ्यांना देणे सोयीस्कर व्हावे म्हणून दोन हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याची सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एप्रिल महिन्यात घोषणा केली होती. या घोषणेस महिना झाला तरीही साखर कारखान्यांना पॅकेजची रक्कम मिळाली नाही. याबद्दल साखर कारखान्यांकडे विचारणा केली असता, शासनाने बिनव्याजी कर्जासाठी तुम्ही तारण काय देणार, अशी विचारणा केली आहे. जो साखर कारखाना कर्जासाठी तारण देईल, त्यांनाच पॅकेजची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. अनेक साखर कारखाने पॅकेजच्या रकमेसाठी तारण देण्यास इच्छुक नसल्याचे कळत आहे. कारण, साखरेचे दर वाढलेच नाहीत तर घेतलेले कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.साखर कारखान्यांचा नकार बहुतांशी कारखान्यांनी शासनाच्या पॅकेजला तारण देण्यास नकार दिल्याची खात्रीशीर माहिती आहे. शासन आणि साखर कारखानदारांच्या पॅकेजच्या या वादात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मात्र ‘फुटबॉल’ झाला आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी रणशिंग फुंकले आहे. पण, त्यांच्या आंदोलनाची ठोस दिशा ठरल्याचे दिसत नाही. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मात्र साखर कारखान्यांची साखर अडवण्यापासून ते मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा इशारा दिला आहे. तथापि सर्व संघटना केवळ इशारेच देत आहेत.