शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

तारणाच्या धोरणाने ऊस उत्पादक निराश

By admin | Updated: May 11, 2015 23:48 IST

शासनाचा निर्णय : एफआरपीनुसार दर मिळणार का?

अशोक डोंबाळे - सांगली  दर गडगडल्यामुळे साखर कारखाने ऊस उत्पादकांना किमान वैधानिक किंमत (एफआरपी) देऊ शकत नसल्याने राज्य शासनाने एप्रिलमध्ये दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. यामुळे ऊस उत्पादक एफआरपी रकमेकडे दीड महिन्यापासून डोळे लावून बसला होता. त्यांच्या पदरी शासनाच्या आदेशामुळे निराशाच पडली आहे. कारण, जो साखर कारखाना शासनाला तारण देईल, त्यांनाच पॅकेजचा लाभ मिळणार आहे. काही कारखानदार पॅकेजच्या मोबदल्यात शासनाला काहीही तारण देण्यास इच्छुक नाहीत. यामुळे शासन आणि कारखानदारांच्या संघर्षात ऊस उत्पादकांचा मात्र ‘फुटबॉल’ झाल्याचे चित्र दिसत आहे.जिल्ह्यात यंदा गेल्या दहा वर्षातील विक्रमी ७७ लाख २६ हजार ३६९ टन उसाचे गाळप झाले असून, ९४ लाख २६ हजार १९८ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखरेचे दर गडगडल्यामुळे कारखान्यांकडे पूर्वीची साखरही शिल्लक आहे. यातच नवीन साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे त्यांची गोदामे भरली आहेत. साखरेचे दर उतरले म्हणून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला नाही. या शेतकऱ्यांच्या उसाला शासनाने ठरवून दिलेला हमी भाव तर मिळालाच पाहिजे. परंतु, साखर कारखान्यांनी साखरेचे दर उतरल्यामुळे कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढल्याचे सांगितले आहे. कारखाने आर्थिक अडचणीत असल्याचे कारण पुढे करून एफआरपीनुसार दर देण्यास टाळाटाळ करीत आहेत. सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांपैकी १२ साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार दर दिला नाही. या कारखान्यांकडे शेतकऱ्यांची सुमारे २०४ कोटींची थकबाकी आहे. साखर कारखान्यांना एफआरपी दर शेतकऱ्यांना देणे सोयीस्कर व्हावे म्हणून दोन हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याची सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एप्रिल महिन्यात घोषणा केली होती. या घोषणेस महिना झाला तरीही साखर कारखान्यांना पॅकेजची रक्कम मिळाली नाही. याबद्दल साखर कारखान्यांकडे विचारणा केली असता, शासनाने बिनव्याजी कर्जासाठी तुम्ही तारण काय देणार, अशी विचारणा केली आहे. जो साखर कारखाना कर्जासाठी तारण देईल, त्यांनाच पॅकेजची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. अनेक साखर कारखाने पॅकेजच्या रकमेसाठी तारण देण्यास इच्छुक नसल्याचे कळत आहे. कारण, साखरेचे दर वाढलेच नाहीत तर घेतलेले कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.साखर कारखान्यांचा नकार बहुतांशी कारखान्यांनी शासनाच्या पॅकेजला तारण देण्यास नकार दिल्याची खात्रीशीर माहिती आहे. शासन आणि साखर कारखानदारांच्या पॅकेजच्या या वादात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मात्र ‘फुटबॉल’ झाला आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी रणशिंग फुंकले आहे. पण, त्यांच्या आंदोलनाची ठोस दिशा ठरल्याचे दिसत नाही. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मात्र साखर कारखान्यांची साखर अडवण्यापासून ते मंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा इशारा दिला आहे. तथापि सर्व संघटना केवळ इशारेच देत आहेत.