शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

वीज जोडणीस तीन वर्षे विलंब

By admin | Updated: May 19, 2014 00:11 IST

नुकसानभरपाईचे महावितरणला ग्राहक मंचाचे आदेश

सोलापूर : वीज जोडणीची रक्कम भरून घेतल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी कनेक्शन देऊन त्रुटीयुक्त सेवा दिल्याबद्दल मानसिक त्रासापोटी ५ हजार रुपये तर खर्चापोटी २ हजार रुपये ग्राहकाला द्यावेत, असे आदेश जिल्हा ग्राहक न्याय मंचाने महावितरण कंपनीला दिले आहेत़ याबाबत टेंभुर्णीतील महिला ग्राहक जयश्री माळी यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती़ याबाबत अधिक माहिती अशी, १७ आॅक्टोबर २००९ रोजी माळी यांनी महावितरणकडे रक्कम भरून वीज जोडणी मागितली होती़ मात्र महावितरणने रक्कम भरून घेतल्यानंतर चक्क तीन वर्षांनंतर वीज जोडणी दिली़ याबरोबरच फॉल्टीमीटर बसवून त्रुटीयुक्त सेवा दिली़ त्यानंतर देयक भरण्यासाठी तगादा लावून वीज पुरवठा खंडित केला़ यावेळी माळी यांनी जिल्हा ग्राहक न्याय मंचात त्रुटीयुक्त सेवा दिल्याबद्दल, वीज पुरवठा खंडित करु नये, असा अर्ज केला़ यावर सुनावणी होऊन तक्रारदाराने २००९ पासून आकारलेले वीज आकार देयक रद्द करण्याचे आदेश दिले़ तसेच २००९ पासून देयक सरासरी स्वतंत्र देयक आकारणीचे आदेश दिले़ तेव्हापासून भरलेली रक्कम ही समायोजित करून मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्यापोटी ५ हजार रुपये तर खर्चापोटी २ हजार रुपये देण्याचे आदेश दिले़ या प्रकरणात ग्राहकाच्या वतीने अ‍ॅड़ वामनराव कुलकर्णी, अ‍ॅड़ पंकज कुलकर्णी तर महावितरणच्या वतीने अ‍ॅड़ एस़ एस़ कालेकर यांनी काम पाहिले़

-----------------------------------

ग्राहकांना दिलासा

महावितरणकडून ग्राहकांना नीट सेवा मिळत नाही. कधी जादा बिल तर कधी वीज न वापरताही मोठे बिल असे प्रकार काही नवीन नाहीत. मात्र वीजजोडणीचे पैसे भरूनही वीज न देणार्‍या महावितरण कंपनीला या निकालाने चपराक तर बसली आहे. शिवाय ग्राहकांना दिलासाही मिळाला.