शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

विद्यार्थ्यांची डीएड्कडे पाठ डीएड्धारक त्रस्त

By admin | Updated: November 22, 2014 00:14 IST

२०१०पासून भरती प्रक्रियाच बंद

रत्नागिरी : राज्य शासनाने शिक्षक भरतीवर आणलेल्या बंदीमुळे डी. एड. महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. नोकरीसाठी सीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. सहा वर्षांपूर्वी सीईटी घेण्यात आली मात्र, २०१० पासून भरती प्रक्रियाच थांबविल्यामुळे डी. एड. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. डीएड करून नोकरी मिळणे अवघड असल्यामुळे विद्यार्थी डीएड करणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील डी. एड. महाविद्यालयात एकूण ८९० जागांपैकी ७१८ जागा रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे. प्राथमिक शिक्षकांसाठी डी. एड. तर माध्यमिक शिक्षकांसाठी बी. एड. अभ्यासक्रम सक्तिचा आहे. सुरूवातीला दहावीच्या गुणांवर डी. एड.साठी प्रवेश मिळत होता. परंतु त्यानंतर शिक्षणाचा दर्जा सुधारावा, या हेतूने शासनाने बारावीनंतर डी. एड. अभ्यासक्रम सुरू केला. डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी उपलब्ध होत होती. परंतु नोकरीसाठी शासनाने सीईटी परीक्षा डी. एड. उत्तीर्णधारकांना सक्तीची केली. २००८ साली सीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर ही परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे २००७ पासून जिल्ह्यात हजारो विद्यार्थी डी. एड. उत्तीर्ण झाले. परंतु नोकरीअभावी बेकारांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. गतवर्षीपासून शासनाने टीईटी परीक्षा डी. एड.धारकांना सक्तीची केली. गतवर्षी जिल्ह्यातून या परीक्षेला ८००० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मात्र, परीक्षेचा निकाल फक्त चार टक्के इतकाच लागला. बहुतांश विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. हजारो रूपये खर्च करून डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी डी. एड.कडे पाठ फिरविलेली दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयांतून ८९० जागा असताना यावर्षी केवळ १७२ विद्यार्थ्यांनीच डी. एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यामुळे तब्बल ७१२ जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. सन २००९-१०मध्ये ९८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०१०-११मध्ये १०१९, २०११-१२मध्ये ७२७, २०१३-१४मध्ये ९८, २०१४-१५मध्ये १७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७४ विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्हाभरातून ३९०० विद्यार्थ्यांनी त्यासाठी प्रवेश अर्ज सादर केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत टीईटीसाठीही विद्यार्थीसंख्या घटलेली दिसून येत आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात ८९० पैकी ७१८ जागा रिक्त सालविद्यार्थी संख्या २००९-१०९८८ २०१०-१११०१९ २०११-१२७२७ २०१३-१४९८ २०१४-१५१७२