शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची डीएड्कडे पाठ डीएड्धारक त्रस्त

By admin | Updated: November 22, 2014 00:14 IST

२०१०पासून भरती प्रक्रियाच बंद

रत्नागिरी : राज्य शासनाने शिक्षक भरतीवर आणलेल्या बंदीमुळे डी. एड. महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. नोकरीसाठी सीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. सहा वर्षांपूर्वी सीईटी घेण्यात आली मात्र, २०१० पासून भरती प्रक्रियाच थांबविल्यामुळे डी. एड. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. डीएड करून नोकरी मिळणे अवघड असल्यामुळे विद्यार्थी डीएड करणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील डी. एड. महाविद्यालयात एकूण ८९० जागांपैकी ७१८ जागा रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे. प्राथमिक शिक्षकांसाठी डी. एड. तर माध्यमिक शिक्षकांसाठी बी. एड. अभ्यासक्रम सक्तिचा आहे. सुरूवातीला दहावीच्या गुणांवर डी. एड.साठी प्रवेश मिळत होता. परंतु त्यानंतर शिक्षणाचा दर्जा सुधारावा, या हेतूने शासनाने बारावीनंतर डी. एड. अभ्यासक्रम सुरू केला. डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी उपलब्ध होत होती. परंतु नोकरीसाठी शासनाने सीईटी परीक्षा डी. एड. उत्तीर्णधारकांना सक्तीची केली. २००८ साली सीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर ही परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे २००७ पासून जिल्ह्यात हजारो विद्यार्थी डी. एड. उत्तीर्ण झाले. परंतु नोकरीअभावी बेकारांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. गतवर्षीपासून शासनाने टीईटी परीक्षा डी. एड.धारकांना सक्तीची केली. गतवर्षी जिल्ह्यातून या परीक्षेला ८००० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मात्र, परीक्षेचा निकाल फक्त चार टक्के इतकाच लागला. बहुतांश विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. हजारो रूपये खर्च करून डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी डी. एड.कडे पाठ फिरविलेली दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयांतून ८९० जागा असताना यावर्षी केवळ १७२ विद्यार्थ्यांनीच डी. एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यामुळे तब्बल ७१२ जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. सन २००९-१०मध्ये ९८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०१०-११मध्ये १०१९, २०११-१२मध्ये ७२७, २०१३-१४मध्ये ९८, २०१४-१५मध्ये १७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७४ विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्हाभरातून ३९०० विद्यार्थ्यांनी त्यासाठी प्रवेश अर्ज सादर केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत टीईटीसाठीही विद्यार्थीसंख्या घटलेली दिसून येत आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात ८९० पैकी ७१८ जागा रिक्त सालविद्यार्थी संख्या २००९-१०९८८ २०१०-१११०१९ २०११-१२७२७ २०१३-१४९८ २०१४-१५१७२