शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची डीएड्कडे पाठ डीएड्धारक त्रस्त

By admin | Updated: November 22, 2014 00:14 IST

२०१०पासून भरती प्रक्रियाच बंद

रत्नागिरी : राज्य शासनाने शिक्षक भरतीवर आणलेल्या बंदीमुळे डी. एड. महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. नोकरीसाठी सीईटी परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे. सहा वर्षांपूर्वी सीईटी घेण्यात आली मात्र, २०१० पासून भरती प्रक्रियाच थांबविल्यामुळे डी. एड. उत्तीर्ण विद्यार्थ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. डीएड करून नोकरी मिळणे अवघड असल्यामुळे विद्यार्थी डीएड करणे टाळत असल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील डी. एड. महाविद्यालयात एकूण ८९० जागांपैकी ७१८ जागा रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे. प्राथमिक शिक्षकांसाठी डी. एड. तर माध्यमिक शिक्षकांसाठी बी. एड. अभ्यासक्रम सक्तिचा आहे. सुरूवातीला दहावीच्या गुणांवर डी. एड.साठी प्रवेश मिळत होता. परंतु त्यानंतर शिक्षणाचा दर्जा सुधारावा, या हेतूने शासनाने बारावीनंतर डी. एड. अभ्यासक्रम सुरू केला. डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी उपलब्ध होत होती. परंतु नोकरीसाठी शासनाने सीईटी परीक्षा डी. एड. उत्तीर्णधारकांना सक्तीची केली. २००८ साली सीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर ही परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे २००७ पासून जिल्ह्यात हजारो विद्यार्थी डी. एड. उत्तीर्ण झाले. परंतु नोकरीअभावी बेकारांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. गतवर्षीपासून शासनाने टीईटी परीक्षा डी. एड.धारकांना सक्तीची केली. गतवर्षी जिल्ह्यातून या परीक्षेला ८००० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. मात्र, परीक्षेचा निकाल फक्त चार टक्के इतकाच लागला. बहुतांश विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. हजारो रूपये खर्च करून डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरी मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी डी. एड.कडे पाठ फिरविलेली दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालयांतून ८९० जागा असताना यावर्षी केवळ १७२ विद्यार्थ्यांनीच डी. एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यामुळे तब्बल ७१२ जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. सन २००९-१०मध्ये ९८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०१०-११मध्ये १०१९, २०११-१२मध्ये ७२७, २०१३-१४मध्ये ९८, २०१४-१५मध्ये १७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७४ विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. जिल्हाभरातून ३९०० विद्यार्थ्यांनी त्यासाठी प्रवेश अर्ज सादर केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत टीईटीसाठीही विद्यार्थीसंख्या घटलेली दिसून येत आहे. (प्रतिनिधी) जिल्ह्यात ८९० पैकी ७१८ जागा रिक्त सालविद्यार्थी संख्या २००९-१०९८८ २०१०-१११०१९ २०११-१२७२७ २०१३-१४९८ २०१४-१५१७२