शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

विद्यमान आमदारांची दिल्ली स्वारी, माजी आमदारांची मुंबई वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:23 IST

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे १७ वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले आहेत. त्यांच्या काळात अनेक कामे मार्गी लागल्या आहेत. काही निधीअभावी ...

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे १७ वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले आहेत. त्यांच्या काळात अनेक कामे मार्गी लागल्या आहेत. काही निधीअभावी अर्धवट आहेत. काही कामे तांत्रिक कारणामुळे रखडले आहेत. आता तालुक्यातील कामे मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. विद्यमान आमदार कल्याणशेट्टी हे पहिल्यांदाच तालुक्याचे नेतृत्व करीत आहेत. राज्यात भाजपाची सत्ता आली नाही. त्यामुळे कामे करताना अचडणी येणार हे ओळखून कल्याणशेट्टी केंद्रातील मंत्र्यांवर भिस्त ठेऊन विकासकामे मार्गी लावण्याचा खटाटाेप करीत आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची वारंवार भेट घेऊन रस्ते बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणले. तालुक्याला अनेक महामार्ग जोडले जात आहेत. नुकतेच नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांची भेट घेऊन बोरामणी विमानतळासाठी निधी मागणी केली आहे. विमानतळाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सिंधीया यांनीही निधी देण्याचा शब्द दिला आहे. याशिवाय राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांची ते भेट घेत आहेत.

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे हेही गेल्या काही दिवसांपासून मुंबईची वारी वाढविली आहे. कोरोनाशी चार हात करून सध्या म्हेत्रे तालुक्यात पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचा फायदा मतदारसंघासाठी घेण्यासाठी मंत्रालयात फिरत आहेत. नुकतेच त्यांनी सहा मंत्र्यांची भेट घेऊन विकासकामांसाठी निधींची मागणी केली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना भेटून बहुचर्चित देगाव जोडकालवा, एखरुख योजना या अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी १०० कोटींची मागणी केली. ओबीसी आरक्षणाविषयी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना भेटले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, यांचीही भेट घेत निधीची मागणी केली. इकडे तालुक्यातही मेळावे, विकामकामांच्या उद्घाटनांवर जोर देण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकारण सध्या ढवळू निघत आहेत.

....................

तानवडे, खेडगी यांचे भिस्त माजी पालकमंत्र्यांवर

जिल्हा परिषदेचे सदस्य आनंद तानवडे व मुत्तू खेडगी दोघेही माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे समर्थक मानले जातात. आमदार कल्याणशेट्टी यांच्याशी पटत नसल्याने दोघेही आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्हा परिषदेतील विविध हेडमधून निधी आणत वागदरी परिसरातील गावांना निधी देत आहेत. शिवाय खेडगी हेही मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरासाठी निधी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

.........

फोटो बातमीत कल्याणशेट्टी व म्हेत्रे व चौकटीत तानवडे, खेडगी यांचे फोटो)