शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

सोलापूर शहरात दहा दिवस संचारबंदी करा; मनपा आयुक्तांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 17:36 IST

पालकमंत्र्याकडे केली शिफारस; संचारबंदी लागू केल्याने कोरोना संपणार नाही, लोकप्रतिनिधींची भूमिका

ठळक मुद्देशिवसेनेचे कामगार नेते विष्णू कारमपुरी यांना पोलिसांनी फरपटत नेल्याबद्दल पालकमंत्री भरणे यांच्यासमोर नाराजी व्यक्त केलीआनंद चंदनशिवे यांनीही अधिकारी वरिष्ठांचे गैरसमजूत करून देतात अशी कैफियत मांडली विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांनी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने कठोरपणे उपाययोजना केल्या पाहिजेत

सोलापूर : संचारबंदी लागू केल्याने कोरोना संपणार नाही. लोकांनी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स, गर्दी न करणे अशी काळजी घेतल्याशिवाय संसर्ग कमी होणार नाही, लोकांची ही मानसिकता बदलण्याची आपली जबाबदारी आहे अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांसमोर शुक्रवारी दुपारी मांडली.

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी सोलापुरात संचारबंदी लागू करावी का या विषयावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महापालिकेतील गटनेते आमदार व अधिकाºयांची जिल्हा नियोजन भवनात बैठक घेऊन मते जाणून घेतली. महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आरोग्य विभागाने गांभीर्याने चाचण्या करणे गरजेचे असल्याचे सांगितले़ चाचणी घेतल्यानंतर लोकांना घरी सोडून दिले जाते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी लोक फिरत असतात, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी कसा होणार. महसूल प्रशासनाने महापालिकेलासहकार्य करण्याची गरज आहे. गरिबांसाठी सुविधा देण्यात याव्यात अशी सूचना केली. 

सभागृहनेते श्रीनिवास करली यांनी शुक्रवारी सकाळी सातरस्ता येथे शिवसेनेचे कामगार नेते विष्णू कारमपुरी यांना पोलिसांनी फरपटत नेल्याबद्दल पालकमंत्री भरणे यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. आनंद चंदनशिवे यांनीही अधिकारी वरिष्ठांचे गैरसमजूत करून देतात अशी कैफियत मांडली. त्यावर पालकमंत्री भरणे यांनी असे प्रकार पुन्हा घडू नयेत याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. विरोधी पक्ष नेते महेश कोठे यांनी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने कठोरपणे उपाययोजना केल्या पाहिजेत.

चाचण्या व्यवस्थित करून संबंधित लोकांना वेळेत क्वारंनटाईन करणे गरजेचे असल्याचे मत मांडले. आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लोकांनीही  जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. संचारबंदी लागू केली म्हणून लगेच कोरोना संपणार नाही.  संचारबंदी काळात गरीब लोकांना  धान्य मिळावे अशी प्रशासनाने व्यवस्था करावी अशी सूचना केली. महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रॅपिड टेस्ट करण्यासाठी व संसर्ग कमी करण्यासाठी शहरात दहा दिवस संचारबंदी लागू करावी अशी मागणी केली. पोलीस आयुक्त शिंदे यांनी संचारबंदी लागू झाल्यावर लोकांनी पोलीस प्रशासनाने सहकार्य करण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस