शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

पंढरपुरात आजपासून संचारबंदी; आषाढीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलिसांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 10:39 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या दरम्यान कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी १७ जुलै ते २५ जुलै अशी संचारबंदी करण्याबाबत आदेश आले होते. मात्र संचारबंदीचा कालावधी कमी करावा अशी मागणी अनेक लोकांमधून होत होती. त्यानुसार पंंढरपूर तालुक्यातील ९ गावातील संचारबंदीचा कालावधी आता १८ जुलै ते २२ जुलै असा चार दिवसांचा करण्यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी काढले आहेत.

शासनाने चालू वर्षी आषाढी वारीसाठी मानाच्या १० मानाच्या पालख्यांचे पादुकांना ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत १९ जुलै रोजी पंढरपूर मध्ये येण्यास परवानगी दिली आहे. पादुका ठराविक लोकांसमवेत वाखरी (ता. पंढरपूर) येथे आल्यावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पादुकांसोबत गर्दी राहणार नाही. यामुळे पंढरपूर शहरातील व शहरास लागून असलेल्या भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोटी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी या गावतील लोक हे पादुकाच्या दर्शनासाठी वाखरी व पालखी मार्गावर एकत्र येण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर पादुका विठ्ठल मंदिराकडे जात असताना शहरातील व आजुबाजुच्या परिसरातील लहान - सहान मार्गावरुन किंवा चोरट्या मार्गाने लोक पादुकांचे दर्शनासाठी गर्दी करुन शकतात. यामुळे १७ जुलै ते २५ जुलै या कालावधीत पंढरपूरकडे जाणारी व येणारी एस.टी.सेव, खाजगी बससेवा बंद करण्यात आली आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे कोणी उल्लखन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी हजारोंचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

असा आहे संचारबंदीच्या कालावधीतील बदल

पंढरपूर शहर व गोपाळपूर मध्ये १८ जुलैच्या सकाळी ६ वाजल्यापासून २४ जुलैच्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत अशी ६ दिवस संचार बंदी करण्यात आली आहे. पंढरपूर शहरातील नगरप्रदक्षिणाचे आतील बाजूस, सर्व घाट, वाळवंट परिसर, मंदिर परिसरामध्ये १८ जुलै रोजीच्या सकाळी ६ वाजल्यापासून २४ जुलैच्या सायंकाळी ४ वाजेपर्यंत अशी ७ दिवस संचार बंदी करण्यात आली आहे.पंढरपूर तालुक्यातील भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण व कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत १८ जुलैच्या सकाळी ६ वाजल्यापासून २२ जुलैच्या सकाळी ६ वाजेपर्यंत अशी ४ दिवस संचारबंदी करण्यात आली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर