शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

थकबाकी वसुलीत ‘महावितरण’ची सौजन्यशीलता; पेपरलेस अन् डिजिटल कारभारावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 12:49 IST

कोरोना अन् अतिवृष्टीतून वीजमंडळ सावरतेय...

सोलापूर :अनलॉकनंतर वीज बिल वसुलीला परवानगी मिळाली असली तरी वीज बिल माफ होईल, या आशेने ग्राहक बिल भरण्यास तयार होईनात. अशातच महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.एरव्ही बिलाची थकबाकी राहिली तर ग्राहकांची जोडणी कापली जायची; पण कोरोना काळाने महावितरणच्या वसुली धोरणातही नरमता आली आहे. कंपनीचे कर्मचारी व अधिकारी ग्राहकांना सौजन्यशीलतेने बिल भरण्याची विनंती करताना दिसून येेत आहेत.

कोरोनाकाळात सर्वकाही बंद होते, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह कारखानदारांची आर्थिक घडी विस्कटलेली होती. त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या वीज बिलांची वसुली करण्यास शासनाने स्थगिती दिली. त्यामुळे महावितरणचे प्रचंड नुकसान झाले. अशातच अतिवृष्टीमुळे घरगुती ग्राहकांसह शेतीपंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोरोनासारखी गंभीर परिस्थिती व अतिवृष्टीसारखं संकट असताना महावितरणने मोठ्या धैर्याने ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न केला अन् यशस्वी झाला. कोरोनाकाळात फोनव्दारे तक्रार घेऊन ग्राहकांच्या तक्रारीचे निराकारण केले, मोबाईलवरून रीडिंग पाठविणे, एसएमएसव्दारे बिल, ऑनलाइन वीज बिल भरणा, वीजपुरवठा खंडित झाल्यास स्काडाप्रणालीच्या माध्यमातून आवश्यक त्याठिकाणी दुरुस्तीची कामे केली.

कोरोना अन् अतिवृष्टीतून वीजमंडळ सावरतेय...

कोरोनाकाळात वीज बिल वसुली झाली नाही. आधीच नुकसानीत असलेल्या महावितरणचे अतिवृष्टीने १३ ते १५ कोटींचे नुकसान केले. वीज बिल वसुलीला शासनाने स्थगिती दिल्याने महावितरणच्या वसुलीच्या मोहिमा बंद करण्यात आलेल्या आहेत. शासनाने नुकसानीपोटी भरपाईची रक्कम दिली असली तरी थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान आता महावितरणसमोर आहे. मात्र कोरोना व अतिवृष्टीच्या काळातील नुकसानीतून महावितरण आता हळूहळू सावरू लागलेले आहे.

कोरोना अन् अतिवृष्टीने महावितरणचे मोठे नुकसान झाले. कोरोनाकाळातही जिवाची पर्वा न करता महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, जनमित्रांनी रात्रंदिवस काम करून सुरळीत वीजपुरवठा करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला. कोरोनानंतर महावितरणमध्ये डिजिटल व पेपरलेस कारभारावर अधिकचा भर दिला आहे.

- ज्ञानदेव पडळकर,

अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर मंडल

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणdigitalडिजिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या