शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

प्रवेशावरून नेहरू वसतिगृहात गोंधळ

By admin | Updated: June 21, 2014 01:12 IST

प्रवेश क्षमता ५६७ : अर्ज दिले फक्त १००

सोलापूर : पार्क चौक येथील जिल्हा परिषदेच्या नेहरू वसतिगृहात प्रवेश अर्ज घेण्यासाठी आलेल्यांना फक्त १०० अर्ज मिळाल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला; मात्र विद्यार्थ्यांना कूपन पद्धत सुरू केल्याने वाद निवळला. शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी नेहरू वसतिगृहात प्रवेश दिला जातो. या वसतिगृहाची प्रवेश क्षमता ५६७ इतकी आहे. ही प्रवेश प्रक्रिया दि. २० जूनपासून सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी अर्ज घेण्यासाठी ३०० ते ४०० विद्यार्थ्यांनी सकाळी ९.३० वा. मोठी गर्दी केली होती. मात्र वसतिगृहात शुक्रवारी फक्त १०० अर्जांची विक्री करण्यात आली. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी आम्हालाही अर्ज देण्यात यावेत, अशी मागणी करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली; मात्र वसतिगृह अधीक्षक एस. पी. चव्हाण यांनी मुलांची समजूत काढत सर्वांना अर्ज दिले जातील, सर्वांना प्रवेश मिळेल, असे सांगून पुन्हा उद्या अर्जांची विक्री केली जाईल, असे सांगितले. तरीही मुले ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे पाहून सर्वांना कूपन देण्यात आले. या कूपनवर शनिवारी त्यांना प्रवेश अर्ज दिला जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, अशी जाहिरात देण्यात आल्याने मुलांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली होती. वसतिगृहात १८९ खोल्या असून ५६७ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. एका विद्यार्थ्याला वर्षाकाठी १ हजार १५५ रुपये इतकी फी असल्याने ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना हे वसतिगृह अतिशय सोयीचे ठरते. पूर्वी याच वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अत्यंत कमी होती; मात्र शिक्षणाचे वाढते प्रमाण आणि महागाई लक्षात घेता ही गर्दी वाढत आहे.----------------वसतिगृहात प्रवेश देताना गोंधळ उडू नये यासाठी पहिल्या दिवशी फक्त १०० अर्ज विक्री करण्यात आले आहेत. त्यांची मागणी पाहता शनिवारी २०० ते २५० अर्जांची विक्री केली जाईल. प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत अर्ज विक्री चालू राहणार आहे. सर्व गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. - एस. पी. चव्हाणअधीक्षक, नेहरू वसतिगृह