शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेला सामोरे जा, यशदाचे माजी संचालक सतीश पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:59 IST

लोकसेवा किंवा राज्यसेवा या स्पर्धा परीक्षेत लवकर यश संपादन करायचे असेल तर दहावी-बारावीपासूनच तयारी करावी

ठळक मुद्देडॉक्टर, इंजिनिअरचा मार्ग सोडून कला शाखेतील पदवी घ्या : सतीश पाटील कला शाखेतून पदवी घेतल्यास अभ्यासाला वेळ मिळेल

डी. एस. गायकवाड 

टेंभुर्णी : लोकसेवा किंवा राज्यसेवा या स्पर्धा परीक्षेत लवकर यश संपादन करायचे असेल तर दहावी-बारावीपासूनच तयारी करावी. डॉक्टर, इंजिनिअरचा मार्ग सोडून कला शाखेतील पदवी घ्या आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जा, असे आवाहन पुणे येथील यशदाचे माजी संचालक सतीश पाटील यांनी केले.

टेंभुर्णी येथे ‘स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी विक्रीकर निरीक्षक सुप्रिया भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, मंत्रालयाचे सहायक कक्षाधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा उपनिबंधक सतीश देवकाते, सोमेश्वर नवले, सुरेखा नानेकर, अश्विनी नाळे, सतीश कटोरे, उमेश देवकते, नरेंद्र शिंदे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष रावसाहेब देशमुख, सागर देशमुख, बाळासाहेब बारवे, विलास देशमुख उपस्थित होते.

 प्रश्न - स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी काय केले पाहिजे?पाटील- तुमच्याकडे गुणवत्ता असली पाहिजे. त्यानंतर तुमचे ध्येय निश्चित असले पाहिजे. एकदा स्पर्धा परीक्षा देऊन करिअर करण्याचे निश्चित झाल्यानंतर दहावी-बारावीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर यश लवकर मिळू शकते.

प्रश्न- कोणत्या शाखेतील पदवी घेऊन स्पर्धा परीक्षा द्यावी?पाटील- लोकसेवा किंवा राज्यसेवा स्पर्धा परीक्षा देऊन करिअर करायचे निश्चित असेल तर डॉक्टर, इंजिनिअर होण्यापेक्षा सरळ कला शाखेतील मराठी, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र हे विषय घेऊन पदवी घेतली तर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खूप वेळ मिळतो.

प्रश्न-शिक्षणाचे माध्यम कोणते असावे?

पाटील- कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतले तरी स्पर्धा परीक्षा कोणत्याही माध्यमातून दिली तरी इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे.

प्रश्न- अनेक विद्यार्थी सहा-सातवेळा स्पर्धा परीक्षा देऊनही त्यांना यश मिळत नाही, अशावेळी काय करावे ?पाटील- पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना आपल्या क्षमता ओळखता आल्या पाहिजेत. यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व अभ्यासातील सातत्य आवश्यक आहे. एवढे असूनही यश मिळाले नाही तर निराश न होता आपला बी प्लॅन तयार पाहिजे.

 प्रश्न-ग्रामीण विद्यार्थ्यांनी आर्थिक अडचणींवर कशी मात करावी?पाटील- ध्येय निश्चित असेल तर या अडचणीवर मात करणे शक्य आहे. राज्यात दोनशे ते अडीचशे आमदार आहेत. प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील गुणवत्ता असलेले पाच विद्यार्थी दत्तक घेतले तर १ हजार ४०० ते १ हजार ५०० विद्यार्थ्यांची सोय होईल, यासाठी आमदारांनी पुढाकार घेतला पाहिजे.

टॅग्स :Solapurसोलापूर