शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेला सामोरे जा, यशदाचे माजी संचालक सतीश पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 17:59 IST

लोकसेवा किंवा राज्यसेवा या स्पर्धा परीक्षेत लवकर यश संपादन करायचे असेल तर दहावी-बारावीपासूनच तयारी करावी

ठळक मुद्देडॉक्टर, इंजिनिअरचा मार्ग सोडून कला शाखेतील पदवी घ्या : सतीश पाटील कला शाखेतून पदवी घेतल्यास अभ्यासाला वेळ मिळेल

डी. एस. गायकवाड 

टेंभुर्णी : लोकसेवा किंवा राज्यसेवा या स्पर्धा परीक्षेत लवकर यश संपादन करायचे असेल तर दहावी-बारावीपासूनच तयारी करावी. डॉक्टर, इंजिनिअरचा मार्ग सोडून कला शाखेतील पदवी घ्या आणि आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जा, असे आवाहन पुणे येथील यशदाचे माजी संचालक सतीश पाटील यांनी केले.

टेंभुर्णी येथे ‘स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी विक्रीकर निरीक्षक सुप्रिया भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, मंत्रालयाचे सहायक कक्षाधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा उपनिबंधक सतीश देवकाते, सोमेश्वर नवले, सुरेखा नानेकर, अश्विनी नाळे, सतीश कटोरे, उमेश देवकते, नरेंद्र शिंदे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष रावसाहेब देशमुख, सागर देशमुख, बाळासाहेब बारवे, विलास देशमुख उपस्थित होते.

 प्रश्न - स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी काय केले पाहिजे?पाटील- तुमच्याकडे गुणवत्ता असली पाहिजे. त्यानंतर तुमचे ध्येय निश्चित असले पाहिजे. एकदा स्पर्धा परीक्षा देऊन करिअर करण्याचे निश्चित झाल्यानंतर दहावी-बारावीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर यश लवकर मिळू शकते.

प्रश्न- कोणत्या शाखेतील पदवी घेऊन स्पर्धा परीक्षा द्यावी?पाटील- लोकसेवा किंवा राज्यसेवा स्पर्धा परीक्षा देऊन करिअर करायचे निश्चित असेल तर डॉक्टर, इंजिनिअर होण्यापेक्षा सरळ कला शाखेतील मराठी, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र हे विषय घेऊन पदवी घेतली तर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी खूप वेळ मिळतो.

प्रश्न-शिक्षणाचे माध्यम कोणते असावे?

पाटील- कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतले तरी स्पर्धा परीक्षा कोणत्याही माध्यमातून दिली तरी इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे.

प्रश्न- अनेक विद्यार्थी सहा-सातवेळा स्पर्धा परीक्षा देऊनही त्यांना यश मिळत नाही, अशावेळी काय करावे ?पाटील- पहिली गोष्ट विद्यार्थ्यांना आपल्या क्षमता ओळखता आल्या पाहिजेत. यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व अभ्यासातील सातत्य आवश्यक आहे. एवढे असूनही यश मिळाले नाही तर निराश न होता आपला बी प्लॅन तयार पाहिजे.

 प्रश्न-ग्रामीण विद्यार्थ्यांनी आर्थिक अडचणींवर कशी मात करावी?पाटील- ध्येय निश्चित असेल तर या अडचणीवर मात करणे शक्य आहे. राज्यात दोनशे ते अडीचशे आमदार आहेत. प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील गुणवत्ता असलेले पाच विद्यार्थी दत्तक घेतले तर १ हजार ४०० ते १ हजार ५०० विद्यार्थ्यांची सोय होईल, यासाठी आमदारांनी पुढाकार घेतला पाहिजे.

टॅग्स :Solapurसोलापूर