शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

तुरीच्या उत्पादकांना दराची चिंता

By admin | Updated: January 2, 2017 15:23 IST

खंदा खरीप हंगामातील तुरीचे वाढलेले क्षेत्र, उत्पादनात सरासरी वाढ यामुळे आनंदात असलेल्या शेतक-यांना ढासळलेल्या दरामुळे चिंतेचे ग्रहण लागले आहे.

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 2 - खंदा खरीप हंगामातील तुरीचे वाढलेले क्षेत्र, उत्पादनात सरासरी वाढ यामुळे आनंदात असलेल्या शेतक-यांना ढासळलेल्या दरामुळे चिंतेचे ग्रहण लागले आहे. सोलापूर जिल्ह्यात विक्रमी तूर उत्पादनाचा अंदाज असून नाफेडने आधारभूत भावाऐवजी तूर खरेदीसाठी खुल्या बाजारात उतरण्याची मागणी शेतक-यांकडून केली जात आहे.
 
राज्यात यंदा तुरीचे लागवड क्षेत्र वाढले आहे. सोलापूर जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत तूर लागवड क्षेत्रात ४५१ टक्के इतकी विक्रमी वाढ झाली आहे. गतवर्षी २०१५-१६ साली जिल्ह्यात १९ हजार २८२ हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती. यंदा तब्बल १ लाख ८ हजार ३६४ हेक्टर क्षेत्रात तुरीचा पेरा झाला आहे. हे प्रमाण गतवर्षी ७७ टक्के होते़ तर यंदा गतवर्षीच्या तुलनेत ४५ पटीने अधिक म्हणजे ४५१ टक्के आहे. 
 
आजपर्यंत ज्या तालुक्यात तूर पीक कधीच घेतले जात नव्हते. मोहोळ, दक्षिण सोलापूर, माढा, मंगळवेढा या तालुक्यातही तुरीचे क्षेत्र वाढले आहे. समाधानकारक पाऊस आदी तुर डाळींचे वाढते दर यामुळे शेतकरी तुर पीकाकडे अधिक वळल्याचे दिसून येते. शासनाच्या पणन खात्याने राज्यात किमान आधारभूत भावाने तुरीची खरेदी करणारी केंद्रे सुरू केली आहेत. सध्या प्रति किवंटल ५ हजार ५० रूपये दराने ही खरेदी केली जाते. 
 
गतवर्षी तुरीचे उत्पादन घटल्याने १३ हजारावर हा दर गेला होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने तुरडाळ आयात केली. आता पेरणीक्षेत्र आणि उत्पादनातही वाढ झाल्याने भावात घसरण झाली. त्यामुळे शेतक-यांना खुल्या बाजारात विक्री करण्याऐवजी आधारभूत खरेदी केंद्राच्या आधार घ्यावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात नाफेडने बाजार समित्या आणि खरेदी विक्री संघामार्फत ही खरेदी सुरू केली आहे. मात्र सरकारने नियोजन अपुरे पडण्याची शक्यता आहे. उत्पादनातील वाढ लक्षात घेता ही केंद्रे अपुरी पडण्याची शक्यता आहे. 
 
नाफेडने खुल्या बाजारात उतरावे
आधारभूत भावाने खरेदी करण्याऐवजी नाफेडने ते तुर खरेदीसाठी खुल्या बाजारात उतरण्याची मागणी पुढे येत आहे. त्यासाठी सीसीआय अर्थात कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाचे उदाहरण देण्यात येते. आतापर्यंत सीसीआय आधारभूत किंमतीवर कापसाची खरेदी करीत असे, परंतु यावर्षीपासून सीसीआय त्यापेक्षा अधिक भावाने खरेदी करीत आहे. याच धर्तीवर नाफेडने तुरीची खुल्या बाजारात खरेदी केल्यास शेतक-यांना चांगला दर मिळू शकतो.
 
तूर उत्पादनाचा उच्चांक
यंदा जिल्ह्यात १ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्रात तुरीचा पेरा झाला आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने केलेल्या शेतीमध्ये हेक्टरी सरासरी ३ ते ४ क्विंटल तुरीचे उत्पादन होत असे. आता कृषीतंत्रज्ञानामुळे संकरित बियाणे, ठिंबक सिंचन, लागवड पद्धतीत बदल यामुळे सरासरी उत्पादन हेक्टरी १० क्विंटलपर्यत जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर इतिहासात तुरीचे उच्चांकी उत्पादन यावर्षी होण्याची शक्यता आहे. हंगामात १० लाख ८० हजार क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे़
 
यंदा तुरीच्या पेरणी क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होणार आहे. नवीन संकरित वाणाचा वापर, ठिबक सिंचन यामुळे सरासरी उत्पादन वाढले आहे. राज्यात सोलापूर जिल्हा तुरीच्या उत्पादनात आघाडीवर राहील असे वाटते. -  बसवराज बिराजदार, जिल्हा कृषी अधिक्षक, सोलापूर