शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

संगणक परिचालकांनो ई-ग्रामचे काम पूर्ण करा, सोलापूर जि़प़ चे सीईओ राजेंद्र भारूड यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 11:56 IST

जिल्ह्यातील १०२९ पैकी १९३ ग्रामपंचायतींमध्ये १ ते ३३ नमुना वहीतील हस्तलिखितांच्या नोंदी पूर्ण केल्याचा दावा सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने केला आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाने शासन निर्देशानुसार हे काम वेळेत पूर्ण करण्याचा दावाजिल्ह्यात संगणक परिचालकांच्या वेतनाच्या अडचणी

राकेश कदम सोलापूर: आपले सरकार सेवा केंद्रांना दिलेले ई-ग्राम सॉफ्टवेअर बोगस असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने केला आहे. परंतु, या सॉफ्टवेअरच्या आधारे जिल्ह्यातील १०२९ पैकी १९३ ग्रामपंचायतींमध्ये १ ते ३३ नमुना वहीतील हस्तलिखितांच्या नोंदी पूर्ण केल्याचा दावा सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने केला आहे. सॉफ्टवेअरच्या वापरात काही अडचणी असतील तर त्या दूर करू. एप्रिलअखेरसर्वच ग्रामपंचायतींमधील नोंदी पूर्ण करून घेऊ, असेही प्रशासनाने सांगितले आहे. 

आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामपंचायतीकडील सर्व प्रकारचे दाखले संगणकीकृत प्रणालीद्वारे दिले जाणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीमधील १ ते ३३ प्रकारच्या नोंदवह्यांतील हस्तलिखितांच्या नोंदी ई-ग्राम सॉफ्टवेअरमध्ये भरून घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

जिल्हा परिषदेचे प्रशासन ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्रचालकांकडून हे काम करून घेत आहे. १ एप्रिलपासून हस्तलिखित नोंदी बंद करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. यादरम्यान, ई-ग्राम सॉफ्टवेअर बोगस आहे. सॉफ्टवेअरमधील अडचणी दूर होत नाहीत तोपर्यंत नोंदी पूर्ण करणार नाही, असे निवेदन राज्य संगणक परिचालन संघटनेने ग्रामसचिवांना दिले आहे. त्यामुळे हे काम ठप्प होण्याची चिन्हे आहेत. 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने शासन निर्देशानुसार हे काम वेळेत पूर्ण करण्याचा दावा केला आहे. काही जिल्ह्यात संगणक परिचालकांच्या वेतनाच्या अडचणी आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेने सर्वप्रथम वेतनाचा विषय मार्गी लावला आहे. त्यामुळे परिचालकांनी कामे तातडीने सुरू करावीत, असे आवाहनही प्रशासन करीत आहे. 

विरोध कामाला की सॉफ्टवेअरला ?च्संगणक परिचालक संघटनेच्या आरोपामागे राजकारण असल्याची चर्चा प्रशासकीय अधिकाºयांमार्फत आहे. परिचालकांचा विरोध कामाला की सॉफ्टवेअरला हे प्रथम निश्चित झाले पाहिजे. जे काम करणार नाहीत त्यांना घरी बसविण्यात येणार आहे. सॉफ्टवेअरमधील अडचणींसाठी समन्वयक नेमले आहेत. या समन्वयकांशी चर्चा करून अडचणी सोडवून घ्या आणि कामाला सुरुवात करा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात १०२९ ग्रामपंचायती आहेत. यापैकी १९३ ग्रामपंचायतींमधील नोंदींचे काम पूर्ण झाले आहे. ३० ग्रामपंचायतींनी गटविकास अधिकाºयांना काम पूर्ण झाल्याचे पत्रही दिले आहे. या ग्रामपंचायतींकडील दफ्तर पंचायत समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. सॉफ्टवेअरमधील अडचणींबाबत जिल्हा समन्वयकांशी चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न व्हावा. -चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जि. प. सोलापूर. 

 शासनाच्या निर्देशानुसार ई-ग्राम सॉफ्टवेअरचे काम करून घेत आहोत. या कामात काही अडचणी असतील तर त्या शासन स्तरावरून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर.

शासनाच्या निर्देशानुसार ई-ग्राम सॉफ्टवेअरचे काम करून घेत आहोत. या कामात काही अडचणी असतील तर त्या शासन स्तरावरून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. -डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद